शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

२०१८ विधानसभा निवडणूक कर्नाटकात जनता दल ठरणार किंगमेकर ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 15:15 IST

मामाश्री गायकवाड विजयपूर : २०१८ कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपत आला असून, यावेळी सरकार बनवण्यासाठीचे सर्व पत्ते माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या जनता दला(सेक्युलर)कडे असतील, असे चित्र आहे. काँग्रेस अथवा भाजप यापैकी कोणीही स्वबळावर सरकार स्थापन करू शकणार नाही, असे अंदाज निवडणूकपूर्व सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. साहजिकच काँग्रेस आणि भाजप या ...

ठळक मुद्देकाँग्रेस आणि भाजप या दोघांचीही मदार देवेगौडांच्या जनता दलावरकर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपत आला

मामाश्री गायकवाड विजयपूर : २०१८ कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपत आला असून, यावेळी सरकार बनवण्यासाठीचे सर्व पत्ते माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या जनता दला(सेक्युलर)कडे असतील, असे चित्र आहे. काँग्रेस अथवा भाजप यापैकी कोणीही स्वबळावर सरकार स्थापन करू शकणार नाही, असे अंदाज निवडणूकपूर्व सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. 

साहजिकच काँग्रेस आणि भाजप या दोघांचीही मदार देवेगौडांच्या जनता दलावर आहे. आम्ही स्वत:च सरकार स्थापन करू शकू, असे देवेगौडा आणि त्यांचे चिरंजीव व माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी म्हटले असले, तरी त्या दोघांशिवाय कोणालाही तसे वाटत नाही. पण गोवा, मेघालय अशा ठिकाणी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने जी तत्परता दाखवली, चपळाई दाखवली ती पाहता कर्नाटकातही त्याचीच पुनरावृत्ती करणे हा बहुमत न मिळाल्यास भाजपचा पर्याय असू शकतो. त्यामुळे धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली देवेगौडांचा राजकीय ब्लॅकमेलिंगचा धंदा बरकतीस येईल अशीही शंका व्यक्त होताना दिसते आहे. 

काँग्रेस वा भाजप यापैकी कोणाचेही अल्पमतातील सरकार आले, तर राज्याच्या राजकीय स्थैयार्साठी आम्ही नाइलाजाने त्यास पाठिंबा देत आहोत, अशी भूमिका जनता दल घेऊ शकते किंवा जनता दलालाच सरकार बनवण्याची संधी देण्यासाठी भाजपने पुढाकार घेतल्यास आश्चर्य वाटायला नको. हे भगवे राजकारण करायला देवेगौडांना काहीही वाईट वाटणार नाही. सगळी राजकीय अस्पृश्यता सोडून ते हा मार्ग स्वीकारतील. महाराष्ट्रात फडणवीस सरकार टिकावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवातीला त्यांच्या पाठिंब्याची भूमिका नव्हती का घेतली? तसाच काही प्रकार कर्नाटकातही घडू शकतो.

तसे पाहतात आज जनता दल (एस) म्हणजे भाजपची बी टीम आहे, असा हल्ला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रचाराच्या आरंभीच चढवला. भाजप विरोधासाठी जनता दलाला समर्थन देणा-या लोकांनी त्या पक्षाऐवजी काँग्रेसकडे वळावे, यासाठी राहुल गांधींनी केलेली ही खेळी होती. शिवाय जो पक्ष जिंकून येणारच नाही आणि जो भाजपच्या हातातील खेळणे बनणार आहे त्या पक्षामागे जाऊ नका, असा संदेश राहुल गांधी देत होते. त्यामुळे जनता दल एकदम बॅकफूटवर न जाता त्याचे महत्वच वाढत गेले. राहुल गांधींनी धर्मनिरपेक्षतेच्या नावावर जनता दलाला आपल्यासोबत घेतले असते तर सत्ता मिळवणे तसे अवघड नव्हते. पण देवेगौडांवर घसरून आणि जनता दलाला भाजपची बी टीम संबोधून ही संधी राहुल गांधींनी गमावली आणि मंदीर, मठात जाऊन दर्शन घेण्यामुळे आपल्या धर्मनिरपेक्षतेच्या कल्पनांनाही तिलांजली दिली. त्यामुळे धर्मनिरपेक्ष जनता दलाचे वजन वाढवण्याचेच काम राहुल गांधींनी केले.

मोदींची स्तुती करत देवेगौडा व कुमारस्वामी सातत्याने काँग्रेसवरच तोफ डागत होते. कर्नाटकमधील काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारने सर्वात खालची पातळी गाठली आहे. काँग्रेसने लोकायुक्त ही संस्था खालसा केली आहे, असे बरेच आरोप देवेगौडा करत आहेत. काँग्रेस व भाजप हे समान शत्रू आहेत, असे ते दाखवत असले, तरी त्यांचा काँग्रेसलाच अधिक विरोध आहे. वास्तविक धर्मनिरपेक्षता निदान नावातच असलेल्या जनता दलाने, भाजपपेक्षा काँग्रेसला समर्थन देणे हे अधिक तर्कसंगत ठरते. परंतु जनता दल भाजपबद्दल सौम्य टीका करताना दिसतो. कारण राहुल गांधींनी हे घरोब्याचे मार्ग अगोदरच बंद केलेले आहेत. देवेगौडा जेव्हा माज्या भेटीची वेळ मागतात, तेव्हा त्यांना मी ती वेळ देतो. एवढेच नव्हे, तर कापर्यंत सोडायला जातो. कारण माजी पंतप्रधान आणि वयस्क नेते म्हणून त्यांच्याबद्दल मला आदर आहे, असे उद्गार मोदी यांनी काढले. उलट राहुल गांधींनी देवेगौडांचा अपमान केला आहे, अशी टीका मोदी यांनी केली. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस यांच्या सत्तास्पर्धेत देवेगौडा आणि जनता दल आपोआप चर्चेत राहतो आहे.

कर्नाटक भाजपा अध्येक्ष   बी. एस. येडियुरप्पा यांनी २००८ साली कर्नाटकातील भाजपचे सरकार स्थापन केले, तेव्हा दक्षिण कर्नाटकात ५५ पैकी केवळ ७ जागा भाजपच्या पारड?ात पडल्या होत्या आणि एवढाही आकडा त्यापूर्वी भाजपने साध्य केलेला नव्हता. पाच वषार्नंतर भाजपच्या जागा सातवरून दोनवर आल्या. दक्षिण विभागात भाजपचा आधार आजही वाढलेला नाही. या भागात भाजपने जनता दलाला टार्गेट केलेले नाही. एकप्रकारे जनता दलाला मदत करून काँग्रेसला नुकसान पोहोचवणे हीच भाजपची व्यूहरचना आहे. त्यामुळे कर्नाटकात भाजपचे किंवा भाजप प्रस्तावित सरकार येऊन काँग्रेसला रोखणे हे काम भाजप करणार हे स्पष्ट आहे. 

भाजपशी छुपी हातमिळवणी करून देवेगौडा काँग्रेसला धडा शिकवू पहात आहेत. देवेगौडा यांचा काँग्रेसवर राग असण्याचे कारण म्हणजे, सिद्धरामय्या एकेकाळी त्यांच्या पक्षात होते. जनता दलातून बाहेर पडून, काँग्रेसमध्ये जाऊन ते मुख्यमंत्री झाले. एम. पी. प्रकाश या आणखी एका बड?ा नेत्याला काँग्रेसने जनला दलामधून आपल्याकडे खेचले. याशिवाय १९९६ मध्ये वाजपेयींचे १३ दिवसांचे सरकार पडल्यावर देवेगौडा हे आघाडीचे पंतप्रधान असताना काँग्रेसने अचानकपणे समर्थन काढून घेतल्यामुळे देवेगौडांना पुन्हा घरी जावे लागले होते. स्वत:चे केंद्रातील संयुक्त आघाडी सरकार कोसळल्यावर, खवळलेल्या देवेगौडांनी देशव्यापी दौरा करून, काँग्रेसविरोधी आपण रान पेटवू, अशी गर्जना केली होती. तो सूड उगवायची हीच वेळ आहे हे आता देवेगौडांनी ठरवलेले दिसते.

कर्नाटकात काही वषार्पूर्वी देवेगौडापुत्र कुमारस्वामींनी भाजपशी समझोता केला, याचे

टॅग्स :SolapurसोलापूरKarnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८