शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

महावितरणच्या अभय योजनेचा २ लाख ४० हजार वीजग्राहकांना होणार लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 3:49 PM

कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या घरगुती व कृषी ग्राहकांसाठी महावितरणने नवीन अभय योजना जाहीर केली आहे. यात ग्राहकाला थकबाकीची रक्कम पाच हप्त्यात भरण्याची सवलत राहणार आहे. तसेच थकीत रकमेवरील व्याज व विलंब आकार १०० टक्के माफ करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देथकीत रकमेवरील व्याज व विलंब आकार १०० टक्के माफ करण्यात येणार थकबाकीची रक्कम पाच हप्त्यात भरण्याची सवलतरक्कम भरल्यानंतर ग्राहकाचा वीजपुरवठा सुरू करण्यात येईल

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १४ : कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या घरगुती व कृषी ग्राहकांसाठी महावितरणने नवीन अभय योजना जाहीर केली आहे. यात ग्राहकाला थकबाकीची रक्कम पाच हप्त्यात भरण्याची सवलत राहणार आहे. तसेच थकीत रकमेवरील व्याज व विलंब आकार १०० टक्के माफ करण्यात येणार आहे. बारामती परिमंडलात २ लाख ४० हजारांहून अधिक वीजग्राहकांना या योजनेचा लाभ होणार आहे. महावितरणच्या ज्या घरगुती व कृषी ग्राहकांचा वीजपुरवठा ३१ मार्च २०१७ पूर्वी कायमस्वरूपी खंडित करण्यात आलेला आहे, अशा ग्राहकांसाठी ही नवीन योजना आहे. योजनेत सहभागी होणाºया ग्राहकांच्या मूळ थकीत रकमेची पाच हप्त्यात विभागणी करण्यात येणार आहे. त्यापैकी मूळ थकीत रकमेचा पहिला हप्ता व वीज जोडणीसाठी आवश्यक असणारी रक्कम भरल्यानंतर ग्राहकाचा वीजपुरवठा सुरू करण्यात येईल. उर्वरित मूळ थकबाकीच्या ४ हप्त्यांचा भरणा ग्राहकाने त्याला येणाºया मासिक वीज बिलासोबत करणे आवश्यक आहे. ग्राहकांनी थकीत रकमेचा पूर्ण भरणा निर्धारित पाच हप्त्यात पूर्ण केला तरच संबंधित ग्राहकाला थकीत रकमेवर व्याज व विलंब आकारात १०० टक्के माफी मिळणार आहे.बारामती परिमंडलात ३१ मार्च २०१७ पूर्वी कायमस्वरूपी खंडित करण्यात आलेल्या २ लाख ६ हजार ५९१ ग्राहकांना या योजनेत सहभागी होता येईल. त्यांच्याकडे ८५ कोटी ८६ लाखांची मूळ थकबाकी आहे. ही थकबाकी रक्कम भरल्यास त्यांच्याकडील व्याज व विलंब आकाराचे १२ कोटी ७५ लाख रुपये माफ केले जाणार आहेत. दोन्ही वर्गवारीत मिळून २ लाख ४० हजार १३० ग्राहकांकडे १६४ कोटी ९६ लाख रुपये मूळ थकबाकी तसेच व्याज व विलंब आकाराचे ६४ कोटी ८० लाख रुपये थकलेले आहेत. यातील मूळ थकबाकी भरल्यास व्याज व विलंब आकारात १०० टक्के माफी मिळणार आहे. कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या कृषी व घरगुती ग्राहकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.---------------------५२ कोटी रूपये माफ केले जाणाऱ़़च्कृषी वर्गवारीतील ३१ मार्च २०१७ पूर्वी कायमस्वरूपी खंडित करण्यात आलेल्या ३३ हजार ५३९ ग्राहकांना या योजनेत सहभागी होता येईल. त्यांच्याकडे ७९ कोटी १० लाखांची मूळ थकबाकी आहे. ही थकबाकी रक्कम भरल्यास त्यांच्याकडील व्याज व विलंब आकाराचे सुमारे ५२ कोटी ५ लाख रुपये माफ केले जाणार आहेत.