शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातील जिल्ह्यात २ लाख ७३ हजार मजुरांना रोजगाराची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 15:18 IST

दुष्काळाची दाहकता: झेडपीने दिले ५४५१ मजुरांना जॉबकार्ड

ठळक मुद्देजिल्ह्याला टंचाई स्थिती लागू झाल्यावर मागेल त्या मजुराला काम देण्याची व्यवस्थासोलापूर जिल्ह्यात २ लाख ७३ हजार ४३४ मजुरांना काम लागणार पावसाअभावी जिल्ह्यात भूमीहीन मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला

सोलापूर : पावसाअभावी जिल्ह्यात भूमीहीन मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून, २ लाख ७३ हजार ४३४ मजुरांना रोजगाराची गरज निर्माण झाली आहे. याबाबत झेडपीने शासनाला अहवाल सादर केला असून, टंचाई स्थिती घोषित झाल्यावर या लोकांना तातडीने काम दिले जाणार आहे.  

जिल्हा प्रशासनाने पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन सर्व त्या उपाययोजना सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्याचा दौरा करून आढावा घेतला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांना टंचाईमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची जाणीव करून देण्यात आली आहे.

सोलापूर जिल्ह्यात २ लाख ७३ हजार ४३४ मजुरांना काम लागणार आहे. यातील ३३ हजार ८०३ मजुरांनी कामाची मागणी केलेली आहे. तसेच जिल्ह्यात १ लाख ६२ हजार ८९९ भूमीहीन मजूर असल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. त्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. रोजगारांची अत्यंत गरज असलेल्या ५ हजार १२८ मजुरांना ग्रामपंचायतीमार्फत जॉबकार्डचे वाटप करण्यात आले असून, त्यांना त्यांच्या गरजेप्रमाणे काम देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अद्याप १ लाख ६१ हजार ३२८ मजूर कामाच्या व जॉबकार्डच्या प्रतीक्षेत आहेत.

जिल्ह्याला टंचाई स्थिती लागू झाल्यावर मागेल त्या मजुराला काम देण्याची व्यवस्था करण्यात आली असून, जॉबकार्डही देण्यात येणार आहे. रोजगार हमी योजना राबविण्यात राज्यात सोलापूर अग्रेसर असल्याची माहिती झेडपीचे सीईओ डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिली. सोलापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा केवळ ४० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप पिके तर हातची गेली. याशिवाय रब्बी हंगामात पाऊसच झाला नाही. त्यामुळे पेरणी खोळंबली. खरीप हंगामाचा हा काढणीचा काळ असतो. त्यामुळे ग्रामीण भागात मजुरांना या काळात हाताला काम मिळते. 

बाजरी, मूग, उडीद, मका, सोयाबीन, सूर्यफूल, भुईमूग काढणीच्या हंगामात अनेकांना काम मिळते. पण शेती ओसाड असल्याने शेतमजुरांना काम नाही. याशिवाय रब्बीच्या काळात ज्वारी, गहू, हरभरा, पेरणी, खुरपणी, कोळपणीचे काम लागते. पण दुष्काळामुळे पेरणीच न झाल्याने मजुरांना हेही काम मिळालेले नाही. त्यामुळे महिला व मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे ग्रामीण भागातील रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे.  

तालुकानिहाय मजुरांची संख्या - तालुकानिहाय मजुरांची संख्या व त्यातील कार्यान्वित झालेले मजूर पुढीलप्रमाणे आहेत. अक्कलकोट: २३३०३, कार्यान्वित: २६७७, बार्शी: ३४२६५ (७१४१), करमाळा: ३४७११ (४३४२), माढा: २८७६७ (४३८५), माळशिरस: २४८९९ (४०२२), मंगळवेढा: १९९३१( ३०२३), मोहोळ: २३१०८ (२२४६), पंढरपूर: २९९४७ (१७८९), सांगोला: २७०६९ (१२७५), दक्षिण सोलापूर: १९०२५ (२२३०), उत्तर सोलापूर: ८४०८ (६७३).

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळFarmerशेतकरीagricultureशेतीjobनोकरी