शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
7
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
8
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
9
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
10
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
11
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
12
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
13
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
14
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
15
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
16
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
17
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
18
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
19
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
20
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड

सोलापुरातील जिल्ह्यात २ लाख ७३ हजार मजुरांना रोजगाराची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 15:18 IST

दुष्काळाची दाहकता: झेडपीने दिले ५४५१ मजुरांना जॉबकार्ड

ठळक मुद्देजिल्ह्याला टंचाई स्थिती लागू झाल्यावर मागेल त्या मजुराला काम देण्याची व्यवस्थासोलापूर जिल्ह्यात २ लाख ७३ हजार ४३४ मजुरांना काम लागणार पावसाअभावी जिल्ह्यात भूमीहीन मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला

सोलापूर : पावसाअभावी जिल्ह्यात भूमीहीन मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून, २ लाख ७३ हजार ४३४ मजुरांना रोजगाराची गरज निर्माण झाली आहे. याबाबत झेडपीने शासनाला अहवाल सादर केला असून, टंचाई स्थिती घोषित झाल्यावर या लोकांना तातडीने काम दिले जाणार आहे.  

जिल्हा प्रशासनाने पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन सर्व त्या उपाययोजना सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्याचा दौरा करून आढावा घेतला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांना टंचाईमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची जाणीव करून देण्यात आली आहे.

सोलापूर जिल्ह्यात २ लाख ७३ हजार ४३४ मजुरांना काम लागणार आहे. यातील ३३ हजार ८०३ मजुरांनी कामाची मागणी केलेली आहे. तसेच जिल्ह्यात १ लाख ६२ हजार ८९९ भूमीहीन मजूर असल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. त्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. रोजगारांची अत्यंत गरज असलेल्या ५ हजार १२८ मजुरांना ग्रामपंचायतीमार्फत जॉबकार्डचे वाटप करण्यात आले असून, त्यांना त्यांच्या गरजेप्रमाणे काम देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अद्याप १ लाख ६१ हजार ३२८ मजूर कामाच्या व जॉबकार्डच्या प्रतीक्षेत आहेत.

जिल्ह्याला टंचाई स्थिती लागू झाल्यावर मागेल त्या मजुराला काम देण्याची व्यवस्था करण्यात आली असून, जॉबकार्डही देण्यात येणार आहे. रोजगार हमी योजना राबविण्यात राज्यात सोलापूर अग्रेसर असल्याची माहिती झेडपीचे सीईओ डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिली. सोलापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा केवळ ४० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप पिके तर हातची गेली. याशिवाय रब्बी हंगामात पाऊसच झाला नाही. त्यामुळे पेरणी खोळंबली. खरीप हंगामाचा हा काढणीचा काळ असतो. त्यामुळे ग्रामीण भागात मजुरांना या काळात हाताला काम मिळते. 

बाजरी, मूग, उडीद, मका, सोयाबीन, सूर्यफूल, भुईमूग काढणीच्या हंगामात अनेकांना काम मिळते. पण शेती ओसाड असल्याने शेतमजुरांना काम नाही. याशिवाय रब्बीच्या काळात ज्वारी, गहू, हरभरा, पेरणी, खुरपणी, कोळपणीचे काम लागते. पण दुष्काळामुळे पेरणीच न झाल्याने मजुरांना हेही काम मिळालेले नाही. त्यामुळे महिला व मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे ग्रामीण भागातील रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे.  

तालुकानिहाय मजुरांची संख्या - तालुकानिहाय मजुरांची संख्या व त्यातील कार्यान्वित झालेले मजूर पुढीलप्रमाणे आहेत. अक्कलकोट: २३३०३, कार्यान्वित: २६७७, बार्शी: ३४२६५ (७१४१), करमाळा: ३४७११ (४३४२), माढा: २८७६७ (४३८५), माळशिरस: २४८९९ (४०२२), मंगळवेढा: १९९३१( ३०२३), मोहोळ: २३१०८ (२२४६), पंढरपूर: २९९४७ (१७८९), सांगोला: २७०६९ (१२७५), दक्षिण सोलापूर: १९०२५ (२२३०), उत्तर सोलापूर: ८४०८ (६७३).

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळFarmerशेतकरीagricultureशेतीjobनोकरी