वडिलांच्या निधनानंतर अवघ्या पाच दिवसांत सहावीतील मुलाने संपवले जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 16:02 IST2026-02-07T16:02:50+5:302026-02-07T16:02:50+5:30
सोलापुरमध्ये वडिलांच्या निधनानंतर अल्पवयीन मुलाचे टोकाचे पाऊल

वडिलांच्या निधनानंतर अवघ्या पाच दिवसांत सहावीतील मुलाने संपवले जीव
Solapur Crime:
बार्शी तालुक्यातील कुसळंब येथील एका १२ वर्षीय मुलाने वानेवाडी येथे स्वतःच्या हॉटेलच्या मागे एका शेतातील लिंबाच्या झाडास सुताच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना ६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. समर्थ नानासाहेब काळे असे आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे.
समर्थ हा भारत काळे यांचा पुतण्या असून, तो लहान भाऊ नानासाहेब साधू काळे यांचा मुलगा आहे. तो त्याच्या कुटुंबासह मागील चार वर्षांपासून कुसळंब येथे त्याचे हॉटेल असून, तो हॉटेल व्यवसाय करून त्यावर त्याचे कुटुंबाचा उदर्निवाह चालवतो. नानासाहेब यास संस्कार व समर्थ अशी दोन मुले आहेत. संस्कार हा आठवी तर समर्थ सहावीच्या वर्गात कुसळंब येथील शाळेत शिक्षण घेतात. आई व भावाबरोबर समर्थ जेवण उरकून दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान शौचालयाला जातो, म्हणून तो हॉटेलच्या पाठीमागे शेतात गेला. बराच वेळ तो आला नसल्याने मोठा भाऊ संस्कार हा त्याला पाहायला गेला असता, तो लिंबाच्या झाडास गळफास घेतलेला दिसला.
पाच दिवसांपूर्वी पित्याचे निधन
२ फेब्रुवारी २०२६ रोजी त्याच्या वडिलाचे निधन झाले आहे. तेव्हापासून ही मुले नानासाहेब यांच्याजवळ जवळ राहतात. त्याची पत्नी व दोन मुले हे तिसऱ्या दिवसाचा विधी झाल्यानंतर कुसळंब येथे आले होते. पुतण्या समर्थ काळे हा इयत्ता सहावीमध्ये कुसळंबमध्ये शिकत होता.