बापरे! ७ महिन्यांत २५ लग्न केली, नवरीने सुहागरात्रीनंतर प्रत्येकाला लुटले; कारनामे ऐकून सर्वांनाच धक्का बसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 15:34 IST2025-05-22T15:33:14+5:302025-05-22T15:34:41+5:30

एका तरुणीचे सात महिन्यांत २५ वेगवेगळ्या पुरुषांशी लग्न केले. लग्नाच्या तीन-चार दिवसांनी ती दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळून गेली.

viral news 25 marriages in 7 months, the bride robbed everyone after the honeymoon everyone was shocked to hear the exploits | बापरे! ७ महिन्यांत २५ लग्न केली, नवरीने सुहागरात्रीनंतर प्रत्येकाला लुटले; कारनामे ऐकून सर्वांनाच धक्का बसला

बापरे! ७ महिन्यांत २५ लग्न केली, नवरीने सुहागरात्रीनंतर प्रत्येकाला लुटले; कारनामे ऐकून सर्वांनाच धक्का बसला

उत्तर प्रदेशमधून लग्नाबाबत  एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील महाराजगंज जिल्ह्यातील कोल्हुई पोलीस ठाणे परिसरातील एका गावात फसवणुकीचा एक वेगळ्या प्रकारचा प्रकार समोर आला आहे. या गावातील एका तरुणीने तिच्या पतीसोबत मिळून एक टोळी तयार केली होती आणि ती मॅट्रिमोनियल अॅपद्वारे लोकांना फसवत होती. त्या तरुणीने सात महिन्यांत २५ लग्ने केली आहेत. तिला राजस्थान पोलिसांनी मध्य प्रदेशातून अटक केली आहे. सध्या ही घटना परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. मुलीचे कारनामे ऐकून सर्वजण थक्क झाले आहेत.

"सिंदूर स्फोटक बनतं तेव्हा...’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला पुन्हा इशारा

कोल्हुई परिसरातील एका गावातील एका पुरूषाचे २०१८ मध्ये नौतनवा परिसरातील एका मुलीशी लग्न झाले. ते आधीच एकमेकांशी संबंधित असल्याने दोघांनीही प्रेमविवाह केला होता. मुलगी घरातून पळून गेली होती आणि तिचे लग्न झाले होते आणि काही दिवसांनी दोघेही गावात येऊन राहू लागले. एका वर्षानंतर, मुलीच्या वागण्याने नाराज झालेल्या तिच्या सासरच्या लोकांनी तिला  मुलापासून वेगळे केले. यानंतर हे जोडपे घराजवळील एका रिकाम्या घरात राहू लागले. लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२१ मध्ये, दोघेही त्यांच्या सहा वर्षांच्या मुलीला सोडून कोणालाही न सांगता कुठेतरी निघून गेले पण मुलालाही सोबत घेऊन गेले.

भोपाळमध्ये ठिकाण बनवले

घर सोडल्यानंतर दोघांनीही भोपाळला आपले निवासस्थान बनवले. तिथे तरुणीन एक टोळी तयार केली. यामध्ये सहा जणांचा सहभाग असल्याचे सांगितले जात आहे. हे लोक लग्नासाठी ऑनलाइन अ‍ॅप्स चालवायचे आणि अविवाहित मुलांना त्यांच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याशी लग्न करायचे. दोन-चार दिवसांनी हे लोक घरातील दागिने, रोख रक्कम इत्यादी घेऊन पळून जायचे. मुलीने सात महिन्यांत २५ लग्ने केली होती. यानंतर ती राजस्थान पोलिसांच्या तावडीत सापडली. तिथल्या पोलिसांनी त्या दोघांना मध्य प्रदेशातून अटक केली आहे.

३ मे रोजी राजस्थानमधील मान टाउन येथील रहिवासी विष्णू शर्मा यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यामध्ये खांडवा येथील त्यांच्या एका ओळखीच्या व्यक्तीने त्यांच्या पसंतीच्या मुलीशी लग्न करण्याचे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक केल्याची सांगितले. दोघांनीही भोपाळमध्ये राहणाऱ्या एका मुलीचा फोटो दाखवला. तिचा विवाह सवाई माधोपूर न्यायालयात बनावट कराराद्वारे २ लाख रुपयांना ठरवण्यात आला होता, पण तीन दिवसांनी ती मुलगी घरातून रोख रक्कम, दागिने आणि मोबाईल घेऊन पळून गेली.

यानंतर, पोलिसांनी कारवाई केली. या टोळीला पकडण्यासाठी प्लॅन केला. यानुसार, राजस्थान पोलिसांनी त्यांच्याच एका कॉन्स्टेबलला मुलीकडे लग्नासाठी ग्राहक म्हणून पाठवले. दुसरीकडे, भोपाळमधील स्थानिक माहिती देणाऱ्यांच्या मदतीने पथकाने बनावट विवाह टोळीशी संपर्क साधला. एजंटने दाखवलेल्या फोटोंमध्ये फरार मुलीची ओळख पटली आणि भोपाळमध्ये छापा टाकल्यानंतर तिला अटक करण्यात आली. यानंतर सगळ्या प्रकरणाचा उलघडा झाला.

Web Title: viral news 25 marriages in 7 months, the bride robbed everyone after the honeymoon everyone was shocked to hear the exploits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.