शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जोवर राहुल गांधी पंतप्रधान बनत नाहीत तोवर उधारी बंद! दुकानदाराने लावलेली पाटी व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 17:23 IST

दुकानदाराने उधारीपासून मुक्ती मिळविली आहे. एका दुकानदाराने उधारी बंद करण्यासाठी एक अट घालून पाटी लावली आहे.

आपला व्यवसाय, धंदा वाढावा, वस्तूंचा खूप खप व्हावा असे कोणत्या दुकानदाराला वाटणार नाही. यासाठी दुकानदार वेगवेगळ्या प्रकारे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पोस्टर लावतात. परंतू, एका दुकानदाराने उधारी बंद करण्यासाठी एक अट घालून पाटी लावली आहे. ती वाचून लोकांनीदेखील उधारी मागणे बंद केले आहेत. 

मध्य प्रदेशच्या छिंदवाडामधील कर्बला चौकातील किराणा मालाच्या दुकानात अशी पाटी लागली आहे. याद्वारे दुकानदाराने उधारीपासून मुक्ती मिळविली आहे. मोहम्मद हुसैन नावाच्या दुकानदाराचे हे डेली नीड्स नावाचे दुकान आहे. त्याने वैतागून १ जानेवारी, २०२३ पासून उधारी बंद केली होती. परंतू त्याचे ग्राहक सारखे त्याच्यामागे उधारी मागत होते. यामुळे हा दुकानदार आणखी त्रस्त झाला होता. 

यामुळे दुकानदाराने उधारी पुन्हा सुरु करण्यासाठी अट टाकली आहे. ही अट शहरभरात चर्चेचा विषय ठरली आहे. जोपर्यंत राहुल गांधी पतप्रधान बनत नाहीत तोवर उधारी बंद राहणार आहे, असे त्याने दुकानातील काचेवर चिकटवले आहे. मोहम्मद हुसैनने सांगितले की हे त्याचे वडिलोपार्जित दुकान आहे. इथे तीन ते चार हजार रुपये दररोजची विक्री होते. परंतू त्यातील २००० रुपयांच्या वस्तू या उधारीवरच नेल्या जातात. ही उधारी वसूलही होत नाही. परत माल आणण्यासाठी पैसे लागतात. यामुळे १ जानेवारीपासून उधारी देणे बंद केले आहे. 

परंतू, लोकांना उधारी मागणे सुरुच ठेवले होते. प्रत्येकाला नाही नाही सांगून वैतागल्याने शेवटी असे पोस्टर लावले आहे. राहुल गांधी लवकरात लवकर पंतप्रधान व्हावेत. ते चांगले नेते आहेत. यामागे राहुल गांधी पंतप्रधान बनू शकत नाहीत, हा उद्देश नाहीय. सध्यातरी ते पंतप्रधान बनू शकत नाहीएत, म्हणून मी असे स्लोगन लावले आहे, असे तो म्हणाला. एनबीटीने याचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशRahul Gandhiराहुल गांधी