शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

मुलींनो, आम्हाला तुमचा अभिमान वाटतो!; भारताच्या 'सुवर्णकन्यां'चे आनंद महिंद्राकडून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 11:23 IST

आदिती-सुरेखा-परनीत या त्रिकुटाने भारताला मिळवून दिलं सुवर्णपदक

India wins Gold Medal in Archery: भारताच्या सुवर्णकन्यांना तिरंदाजीच्या क्षेत्रात इतिहास रचला. ज्योती सुरेखा वेन्नम, अदिती स्वामी आणि परनीत कौर यांनी जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताला प्रथमच सुवर्णपदक जिंकून दिले. त्यांनी महिला कम्पाऊंड सांघिक गटाच्या अंतिम सामन्यात मेक्सिकोवर २३५-२२९ असा विजय मिळवला. यापूर्वी या स्पर्धेत भारताला ९ रौप्य व २ कांस्यपदके जिंकता आली होती. या तिघींनी भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. जर्मनीची राजधानी बर्लिन येथे खेळल्या गेलेल्या स्पर्धेत भारतीय महिला संघाने उपांत्य फेरीत कोलंबियाचा २२०-२१६ असा पराभव केला होता. त्यानंतर फायनलमध्ये त्यांनी मेक्सिकोचा पराभव केला. त्यांच्या या यशानंतर, प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही त्यांचे कौतुक केले.

भारतीय महिला नवनवीन शिखरे सर करत आहेत. त्यांच्या या यशाचे कौतुक आहे, पण आश्चर्य नाही. कारण, अर्जुनाला जसा फक्त पक्ष्याचा डोळा दिसायचा, तसा या भारतीय कन्यांनी लक्ष्यभेद करत Bulls Eye म्हणजे पैकीच्या पैकी गुण कमावले. भारताची मान अभिमानाने उंचावल्याबद्दल आम्हा सर्वांना तुमचा खूप अभिमान वाटतो. आमच्या भारताला हा सन्मान मिळवून दिल्याबद्दल धन्यवाद, अशा शब्दांत आनंद महिंद्रा यांनी ट्विटच्या माध्यमातून सुवर्णकन्यांचे कौतुक केले.

ज्योती सुरेखा वेन्नमला लहानपणापासूनच खेळाडू व्हायचे होते. जागतिक क्रमवारीत ती १२व्या क्रमांकावर आहे आणि तिला अर्जुन पुरस्कारानेही सन्मानित केले गेले आहे. तिचे वडील माजी कबड्डीपटू आहेत आणि आता विजयवाडा येथे पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत. १६ वर्षीय आदितीने मागील महिन्यांत कोलबिया येथे झालेल्या तिरंदाजी विश्वचषकात कंपाऊंड महिला गटात १८ वर्षांखालील विश्वविक्रम मोडला होता. तिने ७२० पैकी एकूण ७११ गुण मिळवले आणि मागील ७०५ गुणांचा जागतिक विक्रम मागे टाकला. पटियालाच्या परनीत कौरचे वडील अवतार हे सनौर येथील सरकारी शिक्षक, त्यांनी परनीतला छंद म्हणून खेळ घेण्यास प्रोत्साहन दिले.

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्राIndiaभारतGold medalसुवर्ण पदकMexicoमेक्सिको