शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

Fact Check: पक्षांतर केलेले नेते महाविकास आघाडीच्या संपर्कात; राज्यात भाजपाचे १२ आमदार फुटणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2020 21:14 IST

भाजपाचे हे आमदार राजीनामा देऊन पुन्हा महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवतील असा दावा करण्यात आला आहे.

मुंबई – राज्यात कोरोनाचं संकट असताना दुसरीकडे राज्यात सत्तांतर होणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात सुरु आहेत. राज्यात भाजपा ऑपरेशन कमळ राबवत असून महाविकास आघाडीचं सरकार कोसळणार अशी चर्चा सुरु आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही यावर सरकार पाडून दाखवा असं थेट आव्हानच विरोधकांना दिलं आहे.

अशातच राज्यात भाजपा सरकार आलं नाही म्हणून काही आमदार नाराज असल्याचा दावा केला जात आहे. यात ज्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश केला होता. ते आमदार पुन्हा स्वगृही परतण्यासाठी उत्सुक आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात भाजपा-शिवसेनेचे सरकार येईल अशी शक्यता असल्याने अनेक आमदारांनी भाजपात प्रवेश केला होता. यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मातब्बर नेत्यांचा समावेश होता.

सध्या सोशल मीडियात टीव्ही ९ या वृत्तवाहिनीचा हवाला देत भाजपाचे १२ आमदार फुटणार अशाप्रकारे फोटो आणि व्हिडीओ क्लीप व्हायरल होत आहेत. या बातमीत भाजपातील नाराज आमदारांचा गट महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. यामध्ये जे लोक राष्ट्रवादीसोडून गेले होते ते पुन्हा शरद पवार आणि अजित पवारांची भेट घेत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीनेही प्लॅन बी तयार केला आहे, भाजपाचे हे आमदार राजीनामा देऊन पुन्हा महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवतील असा दावा करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती घेतली असता हा फोटो आणि व्हिडीओ टीव्ही ९ चा आहे हे सत्य असलं तरी ही बातमी डिसेंबर महिन्यातील आहे, ज्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं होतं. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथी पाहायला मिळाल्या. मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना आणि भाजपात यांच्यात बिनसलं, त्यामुळे शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा केला.

राज्यात सत्तांतर होत शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्य महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. त्यामुळे सत्तेच्या अपेक्षेने ज्या नेत्यांनी निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश केला होता त्यांची गोची झाली. त्यामुळे ते पुन्हा परततील अशी चर्चाही सत्तासंघर्षाच्या काळात होती. त्यामुळे ही बातमी ८ महिने जुनी आहे. त्याचा आत्ताच्या राजकीय परिस्थितीशी काहीही संबंध नाही. परंतु गेल्या काही दिवसात राजस्थानमध्ये सुरु असलेली राजकीय घडामोड पाहता राज्यातही अशाचप्रकारे हालचाली होतील अशी चर्चा सुरु आहे.  

टॅग्स :BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीSocial Mediaसोशल मीडियाShiv Senaशिवसेना