शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Fact Check: पक्षांतर केलेले नेते महाविकास आघाडीच्या संपर्कात; राज्यात भाजपाचे १२ आमदार फुटणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2020 21:14 IST

भाजपाचे हे आमदार राजीनामा देऊन पुन्हा महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवतील असा दावा करण्यात आला आहे.

मुंबई – राज्यात कोरोनाचं संकट असताना दुसरीकडे राज्यात सत्तांतर होणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात सुरु आहेत. राज्यात भाजपा ऑपरेशन कमळ राबवत असून महाविकास आघाडीचं सरकार कोसळणार अशी चर्चा सुरु आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही यावर सरकार पाडून दाखवा असं थेट आव्हानच विरोधकांना दिलं आहे.

अशातच राज्यात भाजपा सरकार आलं नाही म्हणून काही आमदार नाराज असल्याचा दावा केला जात आहे. यात ज्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश केला होता. ते आमदार पुन्हा स्वगृही परतण्यासाठी उत्सुक आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात भाजपा-शिवसेनेचे सरकार येईल अशी शक्यता असल्याने अनेक आमदारांनी भाजपात प्रवेश केला होता. यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मातब्बर नेत्यांचा समावेश होता.

सध्या सोशल मीडियात टीव्ही ९ या वृत्तवाहिनीचा हवाला देत भाजपाचे १२ आमदार फुटणार अशाप्रकारे फोटो आणि व्हिडीओ क्लीप व्हायरल होत आहेत. या बातमीत भाजपातील नाराज आमदारांचा गट महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. यामध्ये जे लोक राष्ट्रवादीसोडून गेले होते ते पुन्हा शरद पवार आणि अजित पवारांची भेट घेत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीनेही प्लॅन बी तयार केला आहे, भाजपाचे हे आमदार राजीनामा देऊन पुन्हा महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवतील असा दावा करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती घेतली असता हा फोटो आणि व्हिडीओ टीव्ही ९ चा आहे हे सत्य असलं तरी ही बातमी डिसेंबर महिन्यातील आहे, ज्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं होतं. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथी पाहायला मिळाल्या. मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना आणि भाजपात यांच्यात बिनसलं, त्यामुळे शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा केला.

राज्यात सत्तांतर होत शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्य महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. त्यामुळे सत्तेच्या अपेक्षेने ज्या नेत्यांनी निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश केला होता त्यांची गोची झाली. त्यामुळे ते पुन्हा परततील अशी चर्चाही सत्तासंघर्षाच्या काळात होती. त्यामुळे ही बातमी ८ महिने जुनी आहे. त्याचा आत्ताच्या राजकीय परिस्थितीशी काहीही संबंध नाही. परंतु गेल्या काही दिवसात राजस्थानमध्ये सुरु असलेली राजकीय घडामोड पाहता राज्यातही अशाचप्रकारे हालचाली होतील अशी चर्चा सुरु आहे.  

टॅग्स :BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीSocial Mediaसोशल मीडियाShiv Senaशिवसेना