शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जीवावर उदार होऊन रील्स बनवायलाच हवेत का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2024 09:58 IST

विशेषतः जेव्हा कंटेन्ट क्रिएटर्स वेगळे, हटके काहीतरी करण्याच्या नादात त्यांचे जीव गमावतात तेव्हा. 

मुक्ता चैतन्य, मुक्त पत्रकार 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स लिखित शब्दांकडून झपाट्याने दृक्श्राव्य झाले आहेत. अधिक व्ह्यूज, अधिक फॉलोअर्स आणि अधिक सबस्क्रायबर्स असतील तरच अपेक्षित पैसे, या गणितात सतत रंजक आणि  खिळवून ठेवणारा कंटेन्ट बनवण्याचे प्रेशर कंटेन्ट क्रिएटर्सवर असते. रील्स/शॉट्सवर दिसणारा मजकूर ही क्रिएटिव्हिटी आहे का? असा विषय दरवेळी चर्चेला येतो. विशेषतः जेव्हा कंटेन्ट क्रिएटर्स वेगळे, हटके काहीतरी करण्याच्या नादात त्यांचे जीव गमावतात तेव्हा. 

मुळात सोशल मीडियावरच्या कंटेन्टकडे कसे पाहिले पाहिजे, याबाबत आपण अजूनही बऱ्यापैकी गोंधळलेल्या अवस्थेत आहोत. लिखित स्वरूपात जो मजकूर ऑनलाइन जगात आहे तो एरव्हीच्या पुस्तकी दीर्घ लेखनासारखा नसतो. त्यामुळे त्याला कमी लेखण्याचा आणि त्याचा क्रिएटिव्हिटीशी संबंध नसल्याचा समज अनेकदा होतो. पण कमी शब्दांत किंवा वेळेत परिणामकारक पद्धतीने विषयाची मांडणी करणे हे सगळ्यात कठीण काम असते. त्यासाठी विषयाची समज, शब्दांची निवड असा सगळाच कस लागतो. लेखकाला बैठक हवी, या पूर्वापार समजावर या माध्यमांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे. कारण, पूर्वी ज्या माध्यमांमध्ये माणसे व्यक्त होत होती तिथे बैठकीची गरज होती, एकटाकी कामाचे कौशल्य आवश्यक होते. आज माणसे ज्या माध्यमांमधून व्यक्त होऊ बघत आहेत तिथे आपल्याला काय मांडायचे आहे त्यावर पुरेसा विचार करणे, त्यासाठी निरनिराळ्या इतर माध्यमातील घटकांचा सुयोग्य वापर कसा करता येईल याचा विचार करणे आणि कमी शब्दात किंवा मोजक्या वेळेच्या चौकटीत तो विषय मांडण्याचे कौशल्य विकसित करणे हे कळीचे मुद्दे आहेत.  

मग मुद्दा येतो, तयार होणारी सगळी रील्स किंवा शॉट्स दर्जेदार असतात का? तर मुळीच नाही. जसे निर्माण होणारे सगळे सिनेमे, सगळी पुस्तके, सगळ्या कलाकृती या दर्जेदार नसतात. त्यात विविध स्तर असतात, त्याचप्रमाणे रील्स आणि शॉट्समध्ये तयार होणारा सगळा कंटेन्ट दर्जेदार असतो असे नाही. त्यातही सुमार दर्जाच्या गोष्टी तयार होतातच. हे लक्षात घेतले पाहिजे की, सुमार कनंटेन्ट तयार होणे म्हणजे माध्यम वाईट असणे नाही. ते माध्यम जे लोक वापरत आहेत त्यांचा अभ्यास कमी पडला, मेहनत कमी पडली, विचार कमी पडला आणि कौशल्ये कमी पडली की कंटेन्ट सुमार तयार होतो. मग ते रील्स असोत, साहित्य-संगीत-नाटक-सिनेमे नाहीतर कुठलीही इतर कलाकृती.

सोशल मीडिया आणि त्यातही शॉर्ट फॉर्म व्हिडीओ कंटेन्ट म्हणजेच रील्स, शॉट्स हे सगळे माध्यम प्रकार अजून फारच नवीन आणि बाल्यावस्थेत आहेत. जसजशी ही माध्यमे उत्क्रांत होतील, काळाच्या ओघात बदलतील तसतसा कंटेंटचा दर्जाही हळूहळू बदलत जाईल. शिवाय या माध्यमामध्ये तंत्रज्ञानाचा वाटा बराच मोठा आहे. कंटेन्टमागचा विचार जितका महत्त्वाचा आहे तितकेच एडिटिंगचे कौशल्य आवश्यक आहे. थोडक्यात मुद्देसूद सांगता येणे हेही कौशल्य आहे आणि ते सगळ्यांकडे नसते. ज्याला आपण ‘झटकन विचार केला आणि पटकन सांगितला’ असे समजतो ते अनेकदा वाटते तितके उथळ नसते. त्यामागेही मेहनत असते, विचार असतो. अर्थात व्ह्यूजच्या मोहजालात हटके कंटेन्ट बनवण्याच्या नादात नको तिथे रिस्क घेऊन जीव धोक्यात घालून कंटेन्ट बनवण्याइतके ते महत्त्वाचे असते का? पण समाज म्हणून आपण माध्यम शिक्षित नसल्याने या वेगवान माध्यमाचा विचार कसा करायचा हे कुणीही सांगत नाही. कंटेन्ट बनवताना माध्यमभान आणि डिजिटल विवेक सुटता कामा नये, हेच खरे!  

 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल