शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
6
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
7
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
8
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
9
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
10
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
11
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
12
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
13
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
14
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
15
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
16
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
17
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
18
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
19
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
20
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

कष्टाने मिळालेली नोकरी पण पहिल्या दिवशी दिला राजीनामा; कारण समजताच व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 16:12 IST

तरुणाने स्वतः सोशल मीडियावर संपूर्ण गोष्ट शेअर केली आहे. पण आता मात्र त्याला आपल्या निर्णयाचा पश्चाताप होत आहे.

एखाद्याने पहिल्याच नोकरीचा पहिल्याच दिवशी राजीनामा दिला अस जर कोणी सांगितलं तर सुरुवातीला विश्वासच बसणार नाही. पण हो हे खरं आहे. दिल्लीतील एका तरुणाने असं केलं आहे. तरुणाच्या या निर्णयामुळे बहुतेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. दिल्लीतील एका तरुणाला गुरुग्राममध्ये पहिली नोकरी मिळाली. मात्र नोकरीत रुजू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी त्याने राजीनामा दिला. सोशल मीडियावर त्याने याचं कारण सांगितलं. घरापासून ऑफिस लांब असल्याने पहिल्याच दिवशी नोकरी सोडल्याचं या तरुणाचे म्हणणं आहे.

तरुणाने स्वतः सोशल मीडियावर संपूर्ण गोष्ट शेअर केली आहे. पण आता मात्र त्याला आपल्या निर्णयाचा पश्चाताप होत आहे. कारण मोठ्या संख्येने लोक दिल्लीहून गुरुग्रामला नोकरीसाठी जातात आणि असे लोक आता या तरुणांना सल्ला देत आहेत की चांगली नोकरी, चांगला पगार यासाठी काही समस्यांना तोंड द्यावं लागेल. घरी बसून नोकरी कुठे मिळेल? हा तरुण दिल्लीच्या नॉर्थ वेस्ट भागात राहत होता. 

मुलाखतीच्या अनेक फेऱ्या पूर्ण केल्यानंतर ही नोकरी मिळाल्याचं त्याने सांगितलं. मी खूप उत्साही होतो.. कारण ही माझी पहिली नोकरी होती. पण नंतर लक्षात आले की या कामासाठी रोज खूप प्रवास करावा लागतो. कारण मी दिल्लीच्या नॉर्थ वेस्ट भागात पिंकलाइनवर राहत होतो आणि नोकरी मौलसरी अव्हेन्यूमध्ये होती. तरुणांच्या म्हणण्यानुसार, या नोकरीमुळे तो घरात फक्त 3 तास राहू शकत होता. याशिवाय प्रवासासाठी पाच हजार रुपये खर्च करावे लागले. त्यानंतर त्याने राजीनामा दिला.

लोकांनी तरुणाला सांगितलं की बहुतांश चांगल्या कंपन्या फक्त गुरुग्राममध्ये आहेत. त्यामुळे तुला चांगल्या नोकरीसाठी प्रवास करावा लागेल. आपला अनुभव शेअर करताना एका युजरने लिहिले की, मी गाझियाबादहून दररोज गुरुग्रामला जातो. एका बाजूने प्रवास करण्यासाठी मला सुमारे 120-130 मिनिटे लागतात. मी अभ्यास करण्यासाठी माझ्या वरिष्ठांकडून पुस्तकं घेतो आणि मेट्रोमध्ये अभ्यास करतो. हे काम 6 वर्षांपासून सुरू आहे. प्रवासाला जास्त वेळ लागत असेल तर त्या वेळेचा सदुपयोग करायला शिका. तुमच्या मार्गावरून जाणाऱ्या सहकाऱ्यांशी मैत्री करा. वेळ छान निघून जाईल. 

आणखी एका युजरने लिहिले की, दिल्लीतील निम्मे लोक रोज गुरुग्रामला जातात. अधिक कमाई करण्यासाठी, तुला धावावं लागेल. त्यानंतर या तरुणाला वाईट वाटलं. त्याने आपली पोस्ट एडीट करून मी घाईघाईने निर्णय घेतल्याचं लिहिलं. लोक रोज एवढा प्रवास करतात हे मला माहितही नव्हते. माझ्याशी बोलायला कोणीच नव्हतं म्हणून घाईघाईने हा निर्णय घेतला. पण भविष्यात मला जी काही संधी मिळेल त्यावर मी चांगले काम करेन असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :jobनोकरीSocial Viralसोशल व्हायरलResignationराजीनामा