शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

इंद्रदेवाविरोधात युवकाने घेतली पोलीस ठाण्यात धाव; चक्क देवाविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 18:23 IST

पाऊस पडत नाही म्हणून उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीने इंद्रदेवाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गोंडा : हे सोशल मीडियाचे युग आहे इथे कोणतीच गोष्ट लपून राहू शकत नाही. सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही अनोख्या गोष्टी व्हायरल होत असतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीला काही समस्या असते तेव्हा ती व्यक्ती संबंधित पोलीस ठाण्यात धाव घेते. मात्र उत्तर प्रदेशातील गोंडामध्ये एका व्यक्तीने चक्क इंद्रदेवाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एवढेच नाही तर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणीही या व्यक्तीने अधिकाऱ्यांकडे केली आहे. सध्या या घटनेची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. 

माहितीनुसार, सुमित कुमार यादव नावाच्या व्यक्तीचे म्हणणे आहे की, ही वेळ भात लावणीची आहे, त्यामुळे देशातील काही भागातील शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र पावसाची चिन्हे नाहीत. पावसाअभावी शेतकऱ्यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. विशेष म्हणजे १७ जुलै रोजी परिसरात संपूर्ण समाधान दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला तहसील स्तरावरील अधिकाऱ्यांसह जिल्हास्तरीय अधिकारी देखील उपस्थित होते. झार गावातील रहिवासी सुमितकुमार यादव यांनी पाऊस पडत नाही म्हणून तक्रार दाखल केली आहे. खूप वेळ झाला पाऊस पडत नाही लोक प्रचंड नाराज असून याचा थेट परिणाम शेतीवर होत आहे. त्यामुळे याबाबत लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करावी असे पत्रात म्हटले आहे. 

इंद्रदेवाविरोधात गुन्हा दाखल दरम्यान, आता हे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे पत्र पाहून अनेक लोकांना धक्का बसला असून या व्यक्तीने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. तसेच कारवाईसाठी तक्रार पत्र तहसीलदार कर्नेलगंज यांच्याकडे पाठवण्यात आले आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावरील काही मंडळी हास्यास्पद टिप्पणी करत आहे. मात्र पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर असून त्यामुळे खर्च देखील निघत नसल्याचे तक्रारदार शेतकऱ्याचे म्हणणे आहे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाUttar Pradeshउत्तर प्रदेशFarmerशेतकरीRainपाऊस