शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

इंद्रदेवाविरोधात युवकाने घेतली पोलीस ठाण्यात धाव; चक्क देवाविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 18:23 IST

पाऊस पडत नाही म्हणून उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीने इंद्रदेवाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गोंडा : हे सोशल मीडियाचे युग आहे इथे कोणतीच गोष्ट लपून राहू शकत नाही. सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही अनोख्या गोष्टी व्हायरल होत असतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीला काही समस्या असते तेव्हा ती व्यक्ती संबंधित पोलीस ठाण्यात धाव घेते. मात्र उत्तर प्रदेशातील गोंडामध्ये एका व्यक्तीने चक्क इंद्रदेवाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एवढेच नाही तर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणीही या व्यक्तीने अधिकाऱ्यांकडे केली आहे. सध्या या घटनेची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. 

माहितीनुसार, सुमित कुमार यादव नावाच्या व्यक्तीचे म्हणणे आहे की, ही वेळ भात लावणीची आहे, त्यामुळे देशातील काही भागातील शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र पावसाची चिन्हे नाहीत. पावसाअभावी शेतकऱ्यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. विशेष म्हणजे १७ जुलै रोजी परिसरात संपूर्ण समाधान दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला तहसील स्तरावरील अधिकाऱ्यांसह जिल्हास्तरीय अधिकारी देखील उपस्थित होते. झार गावातील रहिवासी सुमितकुमार यादव यांनी पाऊस पडत नाही म्हणून तक्रार दाखल केली आहे. खूप वेळ झाला पाऊस पडत नाही लोक प्रचंड नाराज असून याचा थेट परिणाम शेतीवर होत आहे. त्यामुळे याबाबत लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करावी असे पत्रात म्हटले आहे. 

इंद्रदेवाविरोधात गुन्हा दाखल दरम्यान, आता हे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे पत्र पाहून अनेक लोकांना धक्का बसला असून या व्यक्तीने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. तसेच कारवाईसाठी तक्रार पत्र तहसीलदार कर्नेलगंज यांच्याकडे पाठवण्यात आले आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावरील काही मंडळी हास्यास्पद टिप्पणी करत आहे. मात्र पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर असून त्यामुळे खर्च देखील निघत नसल्याचे तक्रारदार शेतकऱ्याचे म्हणणे आहे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाUttar Pradeshउत्तर प्रदेशFarmerशेतकरीRainपाऊस