शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

World Tourism Day : पर्यटन जिल्हा सिंधुदुर्गात पायाभूत सुविधांची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 13:36 IST

सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील एकमेव पर्यटन जिल्हा म्हणून १९९९ साली शासनाने जाहीर केला. गेल्या १९ वर्षात या जिल्ह्यात पर्यटनाने कात टाकण्याचा प्रयत्न सुरू ठेवला असला तरी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात शासन अयशस्वी ठरले आहे.

ठळक मुद्देजागतिक पर्यटनदिन विशेष : पर्यटन जिल्ह्यात पायाभूत सुविधांची वानवाविमानतळाबरोबरच सीवर्ल्ड प्रकल्पाची गरज : सुयोग्य रस्ते, नामफलकांचा अभाव, कसे वाढणार पर्यटन

सिद्धेश आचरेकर

मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील एकमेव पर्यटन जिल्हा म्हणून १९९९ साली शासनाने जाहीर केला. गेल्या १९ वर्षात या जिल्ह्यात पर्यटनाने कात टाकण्याचा प्रयत्न सुरू ठेवला असला तरी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात शासन अयशस्वी ठरले आहे.

जागतिक पर्यटन दिन साजरा करत असताना जगाच्या नकाशावर जाताना आवश्यक भरारी घेण्यासाठी शासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्वतंत्ररित्या पर्यटन जिल्हा म्हणून वेगवेगळ्या पातळीवर मदत करण्याची गरज आहे. पायाभूत सुविधांमध्ये जिल्ह्यातील रस्ते, वीज आणि पाण्याच्या समस्या मिटविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न व्हायला हवेत. मात्र, ते त्या त्या पातळीवर होताना दिसत नाही. केवळ पर्यटन जिल्हा म्हणून  टेंभा  मिरविण्यापेक्षा जर चांगल्या सुखसुविधा आणि पर्यटकांना आवश्यक बाबींवर लक्ष दिले तरच पर्यटन जिल्ह्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारता येईल.जागतिक पर्यटन दिन २७ सप्टेंबरला दरवर्षी साजरा केला जातो. गेल्या १९ वर्षात आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने पर्यटन क्षेत्रात कात टाकली आहे. येथील १२० किमीची मनमोहक आणि नयनरम्य किनारपट्टी त्यात सागरी जीवसृष्टीचा आविष्कार असलेला अथांग अरबी समुद्रामुळे येथील पर्यटन व्यवसाय जोमाने बहरत गेला.

सिंधुदुर्ग जिल्हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झाल्यानंतर पर्यटकांचा ओढा सिंधुदुर्गात प्रामुख्याने मालवणकडे वाढू लागला. त्यामुळे स्थानिकांनी सुरुवातीला कर्जबाजारी होत पर्यटन व्यवसाय सुरू केले. मात्र याला शासनाचे सहकार्य लाभले नाही. त्यामुळे जगाच्या पर्यटन नकाशावर नावारूपाला येऊ लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मूलभूत सुविधांची वानवा अधिक दिसून येऊ लागली आहे. राजकीय शक्तींनी पुढाकार घेतल्यास जिल्ह्यात पर्यटनातून समृद्धी नक्कीच नांदू शकेल.पर्यटनाचे महत्व तसेच पर्यटनाची लोकप्रियता पाहता संयुक्त राष्ट्र संघाने २७ सप्टेंबर १९८० ला जागतिक पर्यटन दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. जागतिक पर्यटन दिवसासाठी २७ सप्टेंबरचा दिवस निवडला गेला कारण याच दिवशी १९७० मध्ये जागतिक पर्यटन संघटनचे संविधान स्वीकारल्या गेले होते.

भारत देशातही पर्यटनाला फार महत्व आहे. त्याप्रमाणे १९९९ पासून पर्यटन जिल्हा जाहीर झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा राज्यासह देशात नावारूपाला येवू लागला. त्यामुळे मनमोहक व भुरळ घालणाऱ्या किनाऱ्यांचे महत्व वाढू लागले. त्यांनतर पर्यटनाची व्यापकता वाढत गेली. पर्यटन वाढले, पर्यटकांच्या अपेक्षा वाढत गेल्या आहेत. पर्यटकांनी मालवणसह तारकर्ली, देवबाग याच गावांना पर्यटनासाठी अधिक प्राधान्य दिले.तारकर्ली-देवबागचे अरुंद रस्तेपर्यटन मालवणात नावारूपाला आल्यानंतर तारकर्ली व देवबाग या दोन गावांनी खऱ्या अर्थाने पर्यटनात क्रांती घडवून आणली. मात्र या गावात जाणारा रस्ता कित्येक वर्षे अरुंद आहे. त्यामुळे पर्यटनाबरोबरच येथे बारमाही वाहतूक कोंडीची समस्या भासते. तसेच खाडीपात्रात गाळ साचल्यामुळे अनेक धोके या गावांना पोहचत आहेत. खाडी किनाऱ्यांचा बंधारा कम रस्ता झाल्यास वाहतूक कोंडीसह देवबाग गाव सुस्थितीत येऊ शकतो. मासेमारीबरोबरच पर्यटन हा प्रमुख व्यवसाय आहे.सिंधुदुर्ग किल्यावर सुविधांची गैरसोयऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला मालवणसह सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख आहे. मात्र किल्ल्यावर पायाभूत सुविधांची नेगमीच गैरसमज राहिली. दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक भेट देतात, मात्र त्यांना ज्या सुविधा मिळायला पाहिजेत, त्या मिळत नाहीत. याबाबत किल्ला रहिवासी संघाने वेळोवेळी पाठपुरावा करूनही त्यावर आश्वासनाकडून कोणतीच कार्यवाही होताना दिसत नाही. 

टॅग्स :World Tourism Dayजागतिक पर्यटन दिनsindhudurgसिंधुदुर्ग