शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

World Tourism Day : पर्यटन जिल्हा सिंधुदुर्गात पायाभूत सुविधांची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 13:36 IST

सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील एकमेव पर्यटन जिल्हा म्हणून १९९९ साली शासनाने जाहीर केला. गेल्या १९ वर्षात या जिल्ह्यात पर्यटनाने कात टाकण्याचा प्रयत्न सुरू ठेवला असला तरी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात शासन अयशस्वी ठरले आहे.

ठळक मुद्देजागतिक पर्यटनदिन विशेष : पर्यटन जिल्ह्यात पायाभूत सुविधांची वानवाविमानतळाबरोबरच सीवर्ल्ड प्रकल्पाची गरज : सुयोग्य रस्ते, नामफलकांचा अभाव, कसे वाढणार पर्यटन

सिद्धेश आचरेकर

मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील एकमेव पर्यटन जिल्हा म्हणून १९९९ साली शासनाने जाहीर केला. गेल्या १९ वर्षात या जिल्ह्यात पर्यटनाने कात टाकण्याचा प्रयत्न सुरू ठेवला असला तरी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात शासन अयशस्वी ठरले आहे.

जागतिक पर्यटन दिन साजरा करत असताना जगाच्या नकाशावर जाताना आवश्यक भरारी घेण्यासाठी शासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्वतंत्ररित्या पर्यटन जिल्हा म्हणून वेगवेगळ्या पातळीवर मदत करण्याची गरज आहे. पायाभूत सुविधांमध्ये जिल्ह्यातील रस्ते, वीज आणि पाण्याच्या समस्या मिटविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न व्हायला हवेत. मात्र, ते त्या त्या पातळीवर होताना दिसत नाही. केवळ पर्यटन जिल्हा म्हणून  टेंभा  मिरविण्यापेक्षा जर चांगल्या सुखसुविधा आणि पर्यटकांना आवश्यक बाबींवर लक्ष दिले तरच पर्यटन जिल्ह्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारता येईल.जागतिक पर्यटन दिन २७ सप्टेंबरला दरवर्षी साजरा केला जातो. गेल्या १९ वर्षात आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने पर्यटन क्षेत्रात कात टाकली आहे. येथील १२० किमीची मनमोहक आणि नयनरम्य किनारपट्टी त्यात सागरी जीवसृष्टीचा आविष्कार असलेला अथांग अरबी समुद्रामुळे येथील पर्यटन व्यवसाय जोमाने बहरत गेला.

सिंधुदुर्ग जिल्हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झाल्यानंतर पर्यटकांचा ओढा सिंधुदुर्गात प्रामुख्याने मालवणकडे वाढू लागला. त्यामुळे स्थानिकांनी सुरुवातीला कर्जबाजारी होत पर्यटन व्यवसाय सुरू केले. मात्र याला शासनाचे सहकार्य लाभले नाही. त्यामुळे जगाच्या पर्यटन नकाशावर नावारूपाला येऊ लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मूलभूत सुविधांची वानवा अधिक दिसून येऊ लागली आहे. राजकीय शक्तींनी पुढाकार घेतल्यास जिल्ह्यात पर्यटनातून समृद्धी नक्कीच नांदू शकेल.पर्यटनाचे महत्व तसेच पर्यटनाची लोकप्रियता पाहता संयुक्त राष्ट्र संघाने २७ सप्टेंबर १९८० ला जागतिक पर्यटन दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. जागतिक पर्यटन दिवसासाठी २७ सप्टेंबरचा दिवस निवडला गेला कारण याच दिवशी १९७० मध्ये जागतिक पर्यटन संघटनचे संविधान स्वीकारल्या गेले होते.

भारत देशातही पर्यटनाला फार महत्व आहे. त्याप्रमाणे १९९९ पासून पर्यटन जिल्हा जाहीर झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा राज्यासह देशात नावारूपाला येवू लागला. त्यामुळे मनमोहक व भुरळ घालणाऱ्या किनाऱ्यांचे महत्व वाढू लागले. त्यांनतर पर्यटनाची व्यापकता वाढत गेली. पर्यटन वाढले, पर्यटकांच्या अपेक्षा वाढत गेल्या आहेत. पर्यटकांनी मालवणसह तारकर्ली, देवबाग याच गावांना पर्यटनासाठी अधिक प्राधान्य दिले.तारकर्ली-देवबागचे अरुंद रस्तेपर्यटन मालवणात नावारूपाला आल्यानंतर तारकर्ली व देवबाग या दोन गावांनी खऱ्या अर्थाने पर्यटनात क्रांती घडवून आणली. मात्र या गावात जाणारा रस्ता कित्येक वर्षे अरुंद आहे. त्यामुळे पर्यटनाबरोबरच येथे बारमाही वाहतूक कोंडीची समस्या भासते. तसेच खाडीपात्रात गाळ साचल्यामुळे अनेक धोके या गावांना पोहचत आहेत. खाडी किनाऱ्यांचा बंधारा कम रस्ता झाल्यास वाहतूक कोंडीसह देवबाग गाव सुस्थितीत येऊ शकतो. मासेमारीबरोबरच पर्यटन हा प्रमुख व्यवसाय आहे.सिंधुदुर्ग किल्यावर सुविधांची गैरसोयऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला मालवणसह सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख आहे. मात्र किल्ल्यावर पायाभूत सुविधांची नेगमीच गैरसमज राहिली. दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक भेट देतात, मात्र त्यांना ज्या सुविधा मिळायला पाहिजेत, त्या मिळत नाहीत. याबाबत किल्ला रहिवासी संघाने वेळोवेळी पाठपुरावा करूनही त्यावर आश्वासनाकडून कोणतीच कार्यवाही होताना दिसत नाही. 

टॅग्स :World Tourism Dayजागतिक पर्यटन दिनsindhudurgसिंधुदुर्ग