शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

World Tourism Day : पर्यटन जिल्हा सिंधुदुर्गात पायाभूत सुविधांची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 13:36 IST

सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील एकमेव पर्यटन जिल्हा म्हणून १९९९ साली शासनाने जाहीर केला. गेल्या १९ वर्षात या जिल्ह्यात पर्यटनाने कात टाकण्याचा प्रयत्न सुरू ठेवला असला तरी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात शासन अयशस्वी ठरले आहे.

ठळक मुद्देजागतिक पर्यटनदिन विशेष : पर्यटन जिल्ह्यात पायाभूत सुविधांची वानवाविमानतळाबरोबरच सीवर्ल्ड प्रकल्पाची गरज : सुयोग्य रस्ते, नामफलकांचा अभाव, कसे वाढणार पर्यटन

सिद्धेश आचरेकर

मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील एकमेव पर्यटन जिल्हा म्हणून १९९९ साली शासनाने जाहीर केला. गेल्या १९ वर्षात या जिल्ह्यात पर्यटनाने कात टाकण्याचा प्रयत्न सुरू ठेवला असला तरी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात शासन अयशस्वी ठरले आहे.

जागतिक पर्यटन दिन साजरा करत असताना जगाच्या नकाशावर जाताना आवश्यक भरारी घेण्यासाठी शासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्वतंत्ररित्या पर्यटन जिल्हा म्हणून वेगवेगळ्या पातळीवर मदत करण्याची गरज आहे. पायाभूत सुविधांमध्ये जिल्ह्यातील रस्ते, वीज आणि पाण्याच्या समस्या मिटविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न व्हायला हवेत. मात्र, ते त्या त्या पातळीवर होताना दिसत नाही. केवळ पर्यटन जिल्हा म्हणून  टेंभा  मिरविण्यापेक्षा जर चांगल्या सुखसुविधा आणि पर्यटकांना आवश्यक बाबींवर लक्ष दिले तरच पर्यटन जिल्ह्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारता येईल.जागतिक पर्यटन दिन २७ सप्टेंबरला दरवर्षी साजरा केला जातो. गेल्या १९ वर्षात आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने पर्यटन क्षेत्रात कात टाकली आहे. येथील १२० किमीची मनमोहक आणि नयनरम्य किनारपट्टी त्यात सागरी जीवसृष्टीचा आविष्कार असलेला अथांग अरबी समुद्रामुळे येथील पर्यटन व्यवसाय जोमाने बहरत गेला.

सिंधुदुर्ग जिल्हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झाल्यानंतर पर्यटकांचा ओढा सिंधुदुर्गात प्रामुख्याने मालवणकडे वाढू लागला. त्यामुळे स्थानिकांनी सुरुवातीला कर्जबाजारी होत पर्यटन व्यवसाय सुरू केले. मात्र याला शासनाचे सहकार्य लाभले नाही. त्यामुळे जगाच्या पर्यटन नकाशावर नावारूपाला येऊ लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मूलभूत सुविधांची वानवा अधिक दिसून येऊ लागली आहे. राजकीय शक्तींनी पुढाकार घेतल्यास जिल्ह्यात पर्यटनातून समृद्धी नक्कीच नांदू शकेल.पर्यटनाचे महत्व तसेच पर्यटनाची लोकप्रियता पाहता संयुक्त राष्ट्र संघाने २७ सप्टेंबर १९८० ला जागतिक पर्यटन दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. जागतिक पर्यटन दिवसासाठी २७ सप्टेंबरचा दिवस निवडला गेला कारण याच दिवशी १९७० मध्ये जागतिक पर्यटन संघटनचे संविधान स्वीकारल्या गेले होते.

भारत देशातही पर्यटनाला फार महत्व आहे. त्याप्रमाणे १९९९ पासून पर्यटन जिल्हा जाहीर झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा राज्यासह देशात नावारूपाला येवू लागला. त्यामुळे मनमोहक व भुरळ घालणाऱ्या किनाऱ्यांचे महत्व वाढू लागले. त्यांनतर पर्यटनाची व्यापकता वाढत गेली. पर्यटन वाढले, पर्यटकांच्या अपेक्षा वाढत गेल्या आहेत. पर्यटकांनी मालवणसह तारकर्ली, देवबाग याच गावांना पर्यटनासाठी अधिक प्राधान्य दिले.तारकर्ली-देवबागचे अरुंद रस्तेपर्यटन मालवणात नावारूपाला आल्यानंतर तारकर्ली व देवबाग या दोन गावांनी खऱ्या अर्थाने पर्यटनात क्रांती घडवून आणली. मात्र या गावात जाणारा रस्ता कित्येक वर्षे अरुंद आहे. त्यामुळे पर्यटनाबरोबरच येथे बारमाही वाहतूक कोंडीची समस्या भासते. तसेच खाडीपात्रात गाळ साचल्यामुळे अनेक धोके या गावांना पोहचत आहेत. खाडी किनाऱ्यांचा बंधारा कम रस्ता झाल्यास वाहतूक कोंडीसह देवबाग गाव सुस्थितीत येऊ शकतो. मासेमारीबरोबरच पर्यटन हा प्रमुख व्यवसाय आहे.सिंधुदुर्ग किल्यावर सुविधांची गैरसोयऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला मालवणसह सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख आहे. मात्र किल्ल्यावर पायाभूत सुविधांची नेगमीच गैरसमज राहिली. दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक भेट देतात, मात्र त्यांना ज्या सुविधा मिळायला पाहिजेत, त्या मिळत नाहीत. याबाबत किल्ला रहिवासी संघाने वेळोवेळी पाठपुरावा करूनही त्यावर आश्वासनाकडून कोणतीच कार्यवाही होताना दिसत नाही. 

टॅग्स :World Tourism Dayजागतिक पर्यटन दिनsindhudurgसिंधुदुर्ग