शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

यांनी असा गंभीर निर्णय का घेतला: दोडामार्ग सरपंच संघटनेचा इशारा¨; ..तर सामूहिक राजीनामे देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 12:31 PM

चाकरमान्यांना क्वारंटाईन करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी माध्यमिक विद्यालय इमारती व अन्य शासकीय इमारतीचा वापर करा. तशी तजवीज प्रशासनाने करावी असे सांगितले असता आपल्याला जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार काम करावे लागेल. त्यात मी हस्तक्षेप करू शकत नाही, असे स्पष्ट तहसीलदार हाडके यांनी सांगितले.

ठळक मुद्देआजतागायत जिल्हाधिकारी यांनी कोणत्याही प्रकारचे आम्हांला मार्गदर्शन केले नाही, असे सांगून सिंधुदुर्ग जिल्हा सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष देसाई यांनी नाराजी व्यक्त केली.

दोडामार्ग : मुंबई, पुणे तसेच इतर रेड झोनमधील चाकरमान्यांंना शासन जिल्ह्यात पाठविण्याच्या तयारीत आहे. प्रत्येक गावात शाळा व अन्य शासकीय इमारतीत त्यांना क्वारंटाईन करण्याची व्यवस्था ग्रामपंचायत स्तरावर नेमलेल्या कृती समितीवर लादण्यात आली आहे. तसे लेखी आदेश काढल्याने याविरोधात सरपंच संघटना आक्रमक झाली असून शनिवारी तहसीलदार मोरेश्वर हाडके यांची त्यांनी भेट घेतली. 

रेड झोनमधील चाकरमान्यांना गावात घेणार नाही. प्रथमत: जिल्हा स्तरावर त्यांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात यावे. त्यानंतर आम्ही त्यांना गावात घेऊ. आम्हांला वेठीस धरल्यास किंवा कुठल्याही सरपंचांवर कारवाई केल्यास सर्व सरपंच सामूहिक राजीनामे देणार असा आक्रमक पवित्रा घेत सरपंच संघटनेने तहसीलदार मोरेश्वर हाडके यांना लेखी निवेदन दिले आहे. 

शहरातील चाकरमान्यांना गावी आणण्याच्या प्रयत्नात शासन आहे. सध्या रेड झोनमध्ये असलेल्या मुंबई, पुणे येथे प्रत्येक दिवशी शेकडोच्या संख्येत कोरोनासदृश रुग्ण आढळत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांशी लोक कामानिमित्त मुंबई, पुणे शहरात आहेत. एप्रिल व मेमध्ये गावाची वाट धरणारे चाकरमानी लॉकडाऊनमुळे अडकून पडले आहेत. काही झोपडपट्टीत तर काही आपल्या मालकीच्या फ्लॅटमधे राहतात. झोपडपट्टीत राहणाºया लोकांची खरोखरच बिकट अवस्था झाली आहे. त्यात रेड झोन असल्याने खोलीतून बाहेर पडणे मुश्किलीचे झाले आहे. 

काही राजकीय व सामाजिक पुढाºयांनी चाकरमान्यांना गावी पाठविण्यात यावे, अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. त्यानुसार शासनाने त्यांना गावी आणण्याची तयारी दर्शविली. त्यासाठी प्रत्येक तालुक्यातील गावागावातील शाळेत त्यांची व्यवस्था करण्याचे पत्र ग्रामस्तरावर नेमण्यात आलेल्या कृती समितीला दिले. मात, ग्रामस्तरावरील गैरसोयी लक्षात न घेता शासनाने सरपचांंना वेठीस धरले आहे. त्याबाबत सरपंच संघटना आक्रमक झाली आहे.

रेड झोनमधून येणाºया चाकरमान्यांना तालुका ठिकाण असणाºया शासकीय इमारतीत क्वारंटाईन करा. त्यांना थेट गावात प्रवेश देऊ नये. रेड झोनमधून आलेल्यांना आम्ही गावात घेणार नाही. तशा ग्रामस्तरावर सोई सुविधा नाहीत. त्यामुळे प्रशासनाने तशी व्यवस्था करावी. याबाबत शासनाने सरपंचांना वेठीस धरून गुन्हे दाखल केल्यास सामूहिक राजीनामे देण्यात येतील, असा इशारा सरपंच संघटना अध्यक्ष पराशर सावंत यांनी तहसीलदार यांना दिला आहे. 

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा सरपंच सेवासंघाचे अध्यक्ष प्रेमानंद देसाई, जिल्हा परिषद सदस्य अंकुश जाधव, दोडामार्ग तालुका सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष पराशर सावंत यांच्यासह केर उपसरपंच महादेव देसाई, कुडासे खुर्द सरपंच संगीता देसाई, तेरवण मेढे सरपंच प्रियांका सोनावलकर, मांगेली सरपंच सूर्यनारायण गवस, पिकुळे सरपंच  दीक्षा महालकर, घोटगे उपसरपंच प्रथमेश सावंत आदी उपस्थित होते. 

चाकरमान्यांना क्वारंटाईन करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी माध्यमिक विद्यालय इमारती व अन्य शासकीय इमारतीचा वापर करा. तशी तजवीज प्रशासनाने करावी असे सांगितले असता आपल्याला जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार काम करावे लागेल. त्यात मी हस्तक्षेप करू शकत नाही, असे स्पष्ट तहसीलदार हाडके यांनी सांगितले.

जिल्हाधिका-यांवर व्यक्त केली नाराजी

२७ मार्च रोजी जिल्हाधिकारी यांनी सनियंत्रण समिती स्थापन करून त्या ठिकाणी जनजागृती करण्याच्या संदर्भात एक समिती स्थापन करायला सांगितली होती. त्या समितीने शंभर टक्के जनजागृती आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन, संचारबंदी या सगळया गोष्टी चांगल्या पद्धतीने हाताळल्या. परंतु १ मे रोजी जिल्हाधिकारी यांनी पुन्हा आदेश दिला की सनियंत्रण समितीने येणाºया चाकरमान्यांना गावातच क्वारंटाईन करावे. या दिलेल्या आदेशात बºयाच त्रुटी असल्याचे निदर्शनास आणून देण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी यांची ४ मे रोजी भेट घेऊन तशी चर्चा केली. सर्व समस्या त्यांनी जाणून घेतल्या आहेत. याबाबत त्यांना लेखी निवेदनही दिलेले आहे. निवेदन देत असताना ज्याकाही समस्या आहेत त्या परिपूर्ण करण्यासाठी आम्हांला मार्गदर्शन करा अशी विनंती केली होती. मात्र, आजतागायत जिल्हाधिकारी यांनी कोणत्याही प्रकारचे आम्हांला मार्गदर्शन केले नाही, असे सांगून सिंधुदुर्ग जिल्हा सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष देसाई यांनी नाराजी व्यक्त केली.

 

 

 

 

टॅग्स :konkanकोकणCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcollectorजिल्हाधिकारी