शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

निवडणुका आल्या की ईडी, सीबीआयच्या नावाने भाजपची बदनामी; केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचे विरोधकांवर टीकास्त्र

By अनंत खं.जाधव | Updated: December 16, 2023 17:10 IST

भारत जोडो यात्रे वरून काँग्रेस आता उत्तर प्रदेश जोडो यात्रेवर आली

सावंतवाडी : भाजप सरकारने मागील नऊ वर्षात अनेक विकासाचे प्रकल्प देशात उभारले आहेत. मात्र विरोधकांना चांगलं काही दिसत नाही निवडणुका आल्या की फक्त ईडी आणि सीबीआय च्या माध्यमातून विरोधी पक्षांना त्रास देतात अशा प्रकारची भाजपची बदनामी सुरू केली जाते. पण याला जनता बळी पडणार नाही. हे तीन राज्यातील विजयानंतर दिसून आले असा विश्वास केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी व्यक्त केला.ते विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने आज, शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले असता सावंतवाडीत येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. भारत जोडो यात्रे वरून काँग्रेस आता उत्तर प्रदेश जोडो यात्रेवर आली असल्याची टीका ही त्यांनी केली. यावेळी माजी आमदार राजन तेली, प्रमोद जठार, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.मंत्री मिश्रा म्हणाले, मन की बात मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासाची संकल्पना सर्व सामान्य जनते पर्यत पोचवली. त्यामुळेच देशात मोदींबद्दल सर्वसामान्य जनतेत गॅरंटी निर्माण झाली असून मोदी हेच गॅरंटीचे दुसरे नाव असल्याचे तीन राज्यानी दाखवून दिले. तेलंगणा आणि मिझोराममध्ये भाजपने चांगली कामगिरी केली असेही मिश्रा यांनी सांगितले. काँग्रेस आता उत्तर प्रदेश जोडो यात्रा काढत आहे मात्र उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस फक्त पन्नास मतदार संघापुरती राहिली असल्याचे मंत्री मिश्रा म्हणाले.

ईडीकडून आजपर्यंत १ लाख ३६ हजार कोटींची बेनामी संपत्ती जप्त ईडी, सीबीआय या स्वतंत्र यंत्रणा आहेत. आज पर्यत ईडीच्या माध्यमातून १ लाख ३६ हजार कोटी रुपयांची बेनामी संपत्ती जप्त करण्यात आली आहे. पण विरोधकांना हे दिसत नाही. ईडी, सीबीआयचा वापर भाजप करत असल्याचा आरोप करून भाजपची बदनामी सुरू आहे. पण देशातील जनतेला सर्व काही माहीत असून जनता सुज्ञ असल्याचे मंत्री मिश्रा म्हणाले.

दोषींवर कारवाई होणारचउपमुख्यमंत्री अजित पवार,  भाजपमध्ये आलेल्या नेत्यांची चौकशी होणार का? या पत्रकारांच्या प्रश्नांवर मात्र मंत्री मिश्रा यांनी त्रोटक उत्तरे दिली. ईडी सीबीआयच्या चौकशीत जे दोषी आहेत त्याच्यावर कारवाई होईलच असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपाcongressकाँग्रेसEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCBIगुन्हा अन्वेषण विभाग