शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

निवडणुका आल्या की ईडी, सीबीआयच्या नावाने भाजपची बदनामी; केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचे विरोधकांवर टीकास्त्र

By अनंत खं.जाधव | Updated: December 16, 2023 17:10 IST

भारत जोडो यात्रे वरून काँग्रेस आता उत्तर प्रदेश जोडो यात्रेवर आली

सावंतवाडी : भाजप सरकारने मागील नऊ वर्षात अनेक विकासाचे प्रकल्प देशात उभारले आहेत. मात्र विरोधकांना चांगलं काही दिसत नाही निवडणुका आल्या की फक्त ईडी आणि सीबीआय च्या माध्यमातून विरोधी पक्षांना त्रास देतात अशा प्रकारची भाजपची बदनामी सुरू केली जाते. पण याला जनता बळी पडणार नाही. हे तीन राज्यातील विजयानंतर दिसून आले असा विश्वास केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी व्यक्त केला.ते विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने आज, शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले असता सावंतवाडीत येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. भारत जोडो यात्रे वरून काँग्रेस आता उत्तर प्रदेश जोडो यात्रेवर आली असल्याची टीका ही त्यांनी केली. यावेळी माजी आमदार राजन तेली, प्रमोद जठार, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.मंत्री मिश्रा म्हणाले, मन की बात मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासाची संकल्पना सर्व सामान्य जनते पर्यत पोचवली. त्यामुळेच देशात मोदींबद्दल सर्वसामान्य जनतेत गॅरंटी निर्माण झाली असून मोदी हेच गॅरंटीचे दुसरे नाव असल्याचे तीन राज्यानी दाखवून दिले. तेलंगणा आणि मिझोराममध्ये भाजपने चांगली कामगिरी केली असेही मिश्रा यांनी सांगितले. काँग्रेस आता उत्तर प्रदेश जोडो यात्रा काढत आहे मात्र उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस फक्त पन्नास मतदार संघापुरती राहिली असल्याचे मंत्री मिश्रा म्हणाले.

ईडीकडून आजपर्यंत १ लाख ३६ हजार कोटींची बेनामी संपत्ती जप्त ईडी, सीबीआय या स्वतंत्र यंत्रणा आहेत. आज पर्यत ईडीच्या माध्यमातून १ लाख ३६ हजार कोटी रुपयांची बेनामी संपत्ती जप्त करण्यात आली आहे. पण विरोधकांना हे दिसत नाही. ईडी, सीबीआयचा वापर भाजप करत असल्याचा आरोप करून भाजपची बदनामी सुरू आहे. पण देशातील जनतेला सर्व काही माहीत असून जनता सुज्ञ असल्याचे मंत्री मिश्रा म्हणाले.

दोषींवर कारवाई होणारचउपमुख्यमंत्री अजित पवार,  भाजपमध्ये आलेल्या नेत्यांची चौकशी होणार का? या पत्रकारांच्या प्रश्नांवर मात्र मंत्री मिश्रा यांनी त्रोटक उत्तरे दिली. ईडी सीबीआयच्या चौकशीत जे दोषी आहेत त्याच्यावर कारवाई होईलच असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपाcongressकाँग्रेसEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCBIगुन्हा अन्वेषण विभाग