शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
4
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
5
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
6
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
7
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
8
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
9
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
10
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
11
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
12
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
13
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
14
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
15
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
16
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
17
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
18
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
19
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
20
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर

अन् समोरची गर्दी पाहून वाजपेयी झाले होते अवाक्, आठवण अटलजींच्या सिंधुदुर्गातील एकमेव सभेची

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 01:27 IST

भाजपाची स्थापना झाल्यानंतर पहिले राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांची निवड झाली होती. हा काळ साधारणता 1980 च्या दशकाचा असावा, त्यानंतर वाजपेयीची कोकणात सभा घेण्याचे ठरले.

-अनंत जाधव सावंतवाडी - भाजपाची स्थापना झाल्यानंतर पहिले राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांची निवड झाली होती. हा काळ साधारणता 1980 च्या दशकाचा असावा, त्यानंतर वाजपेयीची कोकणात सभा घेण्याचे ठरले. त्यावेळी रत्नागिरी ऐवजी सिंधुदुर्ग वर एकमत झाले.आणि 1982-83 च्या  दरम्यान  देवगड जामसंडेत सभा घेण्यात आली. वाजपेयी दहा तासाचा प्रवास करत मुंबई हून  कोल्हापूर मार्गे जामसंडेत आले होते. एवढ्या लांबचा प्रवास बघून वाजपेयी सहकाऱ्यांना प्रवासातच म्हणाले होते की एवढ्या लांब सभा घेता लोक येतील ना. पण सहकारी त्याना धीर देत होते. आणि जेव्हा प्रत्यक्षात वाजपेयी सभास्थळी दाखल झाले तेव्हा ते गर्दी बघून चांगलेच  अवाक झाल्याचे भाजपाचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांनी सांगितले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आपल्या राजकीय कारकिर्दीत फक्त एक वेळाच सिंधुदुर्ग मध्ये आले होते.असे ही त्यांनी सांगितले.

भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरूवारी सांयकाळी दिल्लीतील एम्स रूग्णालयात निधन झाले आहे.त्यांच्या निधनानंतर भाजपा नेते माधव भंडारी यांनी  वाजपेयीच्या सिंधुदुर्ग भेटीच्या आठवणी ताज्या केल्या यावेळी भंडारी म्हणाले,1980 चे दशक असावे मुंबई पक्षाची स्थापना झाल्यानंतर पक्षाचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अटलबिहारी वाजपेयींची निवड झाली होती.आम्ही काही पदधिकारी जिल्हयातून वाजपेयी यांची भेट घेण्यास गेलो होतो.यावेळी राज्यातील काही नेते सोबत होते.आम्ही सिंधुदुर्गमध्ये येण्याचा  प्रस्ताव दिला तेव्हा वाजपेयीनी कोणताही संकोच न बाळगता येण्याचे मान्य केले. आम्हाला धक्काच बसला सभेची तारीख ही ठरली कुठली पुढे निवडणूक नव्हती तरी वाजपेयी 1982 -83 च्या दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हयात आले.येतना कार ने ते मुंबई तून कोल्हापूर मार्गे सिधुदुर्ग मध्ये येण्यास निघाले वाजपेयी कोल्हापूरातून देवगड कडे निघाले तेव्हा रस्ता तसेच आजबाजूचा परिसर बघून वाजपेयी आपल्या सहकार् याना म्हणाले.एवढ्या लांब सभा घेता लोक येतील ना तेव्हा सोबतचे सहकारी काही क्षणासाठी गप्प बसले पण नंतर वाजपेयीना धीर देत गर्दी होईल असे सांगितले प्रत्यक्षात  वाजपेयी  सभे च्या दिवशी दुपारच्या सुमारास जामसंडेत पोचले तेव्हा सभास्थळी समोरील गर्दी बघून वाजपेयी चांगलेच अवाक झाले.

सभा संपल्यानंतर तत्कालीन भाजपाचे नेते आप्पा गोगटे च्या घरी जेवण घेतले. तेथे ही त्यांनी सभेला वीस ते पंचवीस हजार लोक भर उन्हात आले होते.त्यानी आयोजकांचे कैतुक केले होते. सिंधुदुर्गच्या आठवणी जागवत किती लांबचा हा प्रवास, असे म्हणत नंतर वाजपेयी आल्या मार्गे म्हणजेच कोल्हापूर हून मुंबई कडे रवाना झाले होते. त्यानंतर दोन ते तीन वेळा रत्नागिरी मध्ये आले पण पुन्हा केव्हा ही वाजपेयीना सिंधुदुर्गमध्ये येण्याचा योग आला नाही, असे भंडारी यांनी सांगितले.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीsindhudurgसिंधुदुर्ग