शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

भाजपमध्ये आल्यावर चौकशी थांबणार नाही, केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

By अनंत खं.जाधव | Published: August 13, 2022 6:23 PM

विरोधी पक्षच 'अशा' अफवा पसरवत असतो

सावंतवाडी : ज्या नेत्यांच्या विरोधात चौकशी सुरू आहेत. त्यांची चौकशी भाजपात आल्यावर कुठे थांबणार नाही. कोट्यावधीचे भ्रष्टाचार करायचे आणि ईडीने कारवाई केल्यानंतर आम्ही चोरी केली नाही असं सांगायचे. मग महाराष्ट्रात खासदारासह माजी मंत्री जेलमध्ये कसे गेले असा सवाल केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी केला. सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.मंत्री मिश्रा म्हणाले, गेल्या आठ वर्षांपासून केंद्रात भाजपची सत्ता आहे. पण एकही मंत्र्यावर आरोप झाला नाही. मात्र काही राज्यात विरोधी पक्षाची सत्ता आहे तेथे अनेक मंत्री, आमदार, खासदार वेगवेगळ्या आरोपात अडकले आहेत. ज्याच्यावर कारवाई होते ते भाजपच्या नावाने ओरड मारतात मग चोरी कशासाठी करायची असा सवाल केला. तर ज्यांच्या चौकशी सुरू आहेत त्याची कुठेही चौकशी थांबणार नसल्याचेही ते म्हणाले. भाजपकडे आले म्हणून चौकशी थांबतात हे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. जर कोणालाही चौकशीवर संशय असेल किंवा समाधानी नसाल तर यंत्रणे विरोधात तुम्ही न्यायालयात जाऊ शकता असेही ते म्हणाले.विरोधी पक्षच अशा अफवा पसरवत असतोभाजपमध्ये गेल्यावर नेते सुटतात असे सामान्य माणूस म्हणत नाही, त्यांना काही देणे घेणेही नसते. पण विरोधी पक्षच या अफवा पसरवत असतो. कोणी कितीही ओपनिय पोल काढू दे पण राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या 45 पेक्षा जास्त जागा निवडून येतील आणि पुन्हा राज्यात व केंद्रात भाजपचेच सरकार येणार असल्याचे त्यांनी सांगितले.'हे' कितपत योग्यराज्यात निवडणुकीपूर्वी भाजपशी युती करायची आणि नंतर ज्याच्या विरोधात निवडणूक लढवली त्यांच्या सोबत सरकार बनवायचे हे कितपत योग्य आहे. आताचे शिंदे-फडणवीस सरकार चांगले काम करत असून ते यापुढे ही चांगले काम करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.यावेळी या पत्रकार परिषदेस भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, प्रमोद जठार, अतुल काळसेकर, महेश सारंग, शैलेंद्र दळवी, मनिष दळवी, संजू परब लखमसावंत भोसले, राजन म्हापसेकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गHome Ministryगृह मंत्रालयEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय