शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

‘उद्धवसेने’च्या पदाधिकाऱ्यांना ‘पॉलिटिकल करिअर’ची चिंता, भाजपमध्ये ‘विनाअट’ प्रवेश करणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 18:09 IST

भाजपमध्ये ‘विनाअट’ प्रवेश होतील?

प्रकाश काळेवैभववाडी : लोकसभा, विधानसभा निवडणुकीचे कवित्व संपले असून, जेमतेम महिनाभरातच जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजेल. त्यादृष्टीने तालुक्यात भाजपने तयारी सुरू केली आहे. मात्र, महाविकास आघाडी विशेष म्हणजे उद्धवसेनेतील स्थानिक पदाधिकाऱ्यांसमोर राजकीय ‘करिअर’चा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, त्यांची अवस्था ईकडे ‘आड’ आणि तिकडे ‘विहीर’ अशीच काहीशी झालेली दिसत आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला टक्कर देणे सोडाच ‘मविआ’ ९ उमेदवार तरी देऊ शकेल का? अशी शंका निर्माण होऊ लागली आहे.राज्याने विधानसभा निवडणुकीत राजकीय त्सुनामीचा अनुभव घेतला. त्यामध्ये लोकसभा निवडणुकीत ‘बाहुबली’ ठरलेल्या ‘मविआ’चा महायुतीने काटाच काढला. हा धक्का राजकीय धुरिणांनाही पेललेला नाही. अशातच आता कार्यकाल संपलेल्या महानगरपालिका, नगरपरिषदांसह जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. त्यामुळे विधानसभा निकालाच्या वातावरणाचा महायुतीला फायदा उठवायचा असल्याने विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर तत्काळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बार उडणार आहे.महाविकास आघाडीतील उद्धवसेना सोडली तर काँग्रेस कुठेतरी ‘बॅनर’वर दिसते. तिलाही गटबाजीने ग्रासले आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) फक्त नावापुरती आहे. विधानसभा निवडणुकीत मतदारांशी ‘खासगी’त संवाद साधताना ‘उमेदवार आमचा कुठे आहे? उद्धवसेनेचा आहे, आमच्या हातात आहे काय?’ अशी काही ठिकाणी मित्रपक्षांची भूमिका होती. त्यामागची कारणे त्यांनाच माहीत असतील. त्यामुळे आगामी काळात तालुक्यात या दोन्ही मित्र पक्षांकडे मतांच्या आशेने पाहणे म्हणजे उद्धवसेनेचा आत्मघात ठरणार, हे मात्र स्पष्ट आहे.भाजपमध्ये ‘विनाअट’ प्रवेश होतील?संघटनात्मकदृष्ट्या भाजप मजबूत आहेच. शिवाय विधानसभेच्या निकालानंतर आणखीच उत्साहाला भरती आली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपकडे प्रत्येक ठिकाणी तीन-चार जण इच्छुक किंवा दावेदार आहेत. त्यांना सावरण्याची कसरत करावी लागणार आहे. अशा परिस्थितीत ‘पॉलिटिकल करिअर’साठी पक्षात येऊ पाहणाऱ्या ‘मविआ’तील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना जागा करणार कुठे, हासुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे ‘विनाअट’ सुखाने नांदण्यासाठी जे येतील किंवा ज्यांचे राजकीय उपद्रवमूल्य संपवायचे आहे, अशांनाच भाजप सामावून घेईल, असे सध्याचे चित्र आहे.उमेदवारी घेऊन करणार तरी काय?मागील सात-आठ महिन्यात झालेल्या दोन निवडणुकीत ‘मविआ’ने तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या कोळपे, कोकिसरे व लोरे या तिन्ही मतदारसंघात सपाटून मार खाल्ला. यांतर्गत येणाऱ्या पंचायत समितीच्या सहाही गणांची अवस्था तीच आहे. तग धरता येईल, अशी परिस्थिती कुठेही राहिलेली नाही. आर्थिक विवंचना तर निराळीच! मग या बुडत्या जहाजात आणखी थांबणार तरी का? आणि कशासाठी? अशा स्वरुपाचे नैराश्य उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये पसरले आहे.रात्री झोपताना उद्धवसेनेत, सूर्योदयाला महायुतीत ?भाजपने सगळीकडेच उद्धवसेनेला नेस्तनाबूत करण्याची मोहीम उघडली आहे. मात्र, भाजपमध्ये झालेल्या गर्दीत चेंगराचेंगरी होऊन गुदमरण्यापेक्षा त्यांच्याच मित्रपक्षांचे बोट धरून किमान ‘राजकीय ओळख’ जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे रात्री झोपताना उद्धवसेनेत असणारे सूर्योदयाला महायुतीत दिसले तर नवल वाटायला नको. अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीही उद्धवसेना वरिष्ठ पातळीवरून स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे तालुक्यातील उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह प्रमुख कार्यकर्त्यांना स्वतःच्या राजकीय भवितव्याची चिंता छळू लागली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा