शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणात विंचूदंशाचे प्रमाण वाढले

By admin | Updated: October 29, 2014 00:09 IST

आरोग्य विभाग : सर्पदंशाचे प्रमाण मात्र सर्वांत कमी

राजेश कांबळे - अडरे -चिपळूण तालुक्यातील नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असणाऱ्या ग्रामीण भागातील परिसरात सप्टेंबरअखेर अनेकांना विंचूदंश, सर्पदंश व श्वानदंश झाल्याची नोंद आहे. यामध्ये ३३२ जणांना विंचूदंश, २७५ जणांना श्वानदंश, सर्पदंश ७३ झाला आहे. यातील एकही रुग्ण दगावलेला नाही, अशी माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली.चिपळूण तालुक्यातील नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रांंतर्गत एप्रिल ते सप्टेंबर महिन्याच्या कालावधीत या परिसरातील ग्रामीण भागात विंचू, श्वान व सर्पदंशाच्या घटना घडल्या आहेत. ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या दिवसात पायवाटांना धुरळा पडतो. शिवाय वातावरणात उष्णता अधिक असल्याने विंचूदंशाचे प्रमाण वाढते. कौलारु घरांचाही विंचू आधार घेतात. तर उष्ण हवामान असल्याने सरपटणारे प्राणी फारसे रस्त्यावर येत नाहीत. त्यामुळे सर्पदंशाचे प्रमाण कमी होते. सध्या मोकाट व भटक्या श्वानांचे प्रमाण वाढले आहे. श्वानांवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याने किंवा ते मारले जात नसल्याने भटक्या श्वानदंशाचे प्रमाण अधिक आहे. कोकणातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांना विंचूदंश होण्याच्या घटना घडत असतात. वातावरणात बदल किंवा शेतीपूर्व मशागत, लावणीच्या कामाच्या वेळी, इतर कामानिमित्त शेतकरी व इतरांना विंचूदंश होतो. तसेच ग्रामीण भागात जंगलाचे प्रमाणही जास्त असल्याने शेतकरी सकाळी पहाटेपासून ते सायंकाळपर्यंत काम करत असतात. यावेळी अचानक दंश होण्याच्या घटना घडत असतात. श्वान, सर्प व विंचूदंश झालेल्या रुग्णास प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत दाखल करुन त्यांच्यावर औषधोपचार व इंजेक्शन देवून त्या रूग्णांना बरे केले जाते. यासाठी रुग्ण कल्याण समितीच्या मंजुरीने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत स्नेकबाईट व विंचूदंशाची इंजेक्शन उपलब्ध केली जातात. त्यामुळे विंचू किंवा सर्पदंश झाल्याने दगावण्याचे प्रमाण ० टक्के आहे. चिपळूण तालुक्यातील ग्रामीण भागात विंचूदंशाचे प्रमाण वाढल्याचे स्पष्ट झाल्याने आता विंचूदंश झाल्यानंतर त्याला प्रतिबंधात्मक लस उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येत आहे. दरवर्षी याच हंगामात विंचू दंशावरील लस उपलब्ध नसल्याचे समोर येत असताना ही लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी आरोग्य विभागाकडे केली आहे. चपळूण तालुक्यातील नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या आकडेवारीनुसार विंचूदंशाच्या प्रमाणात वाढ.उन्हाळ्यात वाढते सर्पदंशाचे प्रमाण. एकही रूग्ण दगावला नसल्याचे स्पष्ट. उपाययोजना आवश्यक असल्याचे स्पष्ट.