शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

..तर सिंधुदुर्गच्या पालकमंत्र्यांना संवेदनशील म्हणता आले असते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 17:16 IST

कोरोना महामारी आल्यावर पहिल्याच महिन्यात सरकारने कोविड-१९ चाचणी प्रयोगशाळा सिंधुदुर्गात सुरू करायला हवी होती. तसे झाले असते तर या सरकारला तसेच सिंधुदुर्गच्या पालकमंत्र्यांनाही संवेदनशील म्हणता आले असते. मात्र, तसे झाले नाही. आम्ही विविध माध्यमातून शासनावर दबाव आणल्यानंतरच ही प्रयोगशाळा सुरू झाली आहे, असा दावा माजी आमदार प्रमोद जठार यांनी केला आहे.

ठळक मुद्दे..तर सिंधुदुर्गच्या पालकमंत्र्यांना संवेदनशील म्हणता आले असतेदबावानंतर प्रयोगशाळा सुरू : प्रमोद जठार 

कणकवली : कोरोना महामारी आल्यावर पहिल्याच महिन्यात सरकारने कोविड-१९ चाचणी प्रयोगशाळा सिंधुदुर्गात सुरू करायला हवी होती. तसे झाले असते तर या सरकारला तसेच सिंधुदुर्गच्या पालकमंत्र्यांनाही संवेदनशील म्हणता आले असते. मात्र, तसे झाले नाही. आम्ही विविध माध्यमातून शासनावर दबाव आणल्यानंतरच ही प्रयोगशाळा सुरू झाली आहे, असा दावा माजी आमदार प्रमोद जठार यांनी केला आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोरोना महामारीच्या चार महिन्यांनंतर रत्नागिरीतून मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली. ज्या याचिकेत सिंधुदुर्गच्यावतीने आम्ही सामील झालो. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर ५ आमदारांना सोबत घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले. त्यांनी आमदार निधीची पत्रे दिली. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी माहितीच्या अधिकाराचा वापर करून प्रयोगशाळेची मशिनरी जिल्हा रुग्णालयात बेवारसपणे पडून आहे, हे निदर्शनास आणले.त्यांनी पुढे म्हटले आहे की, माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे कुटुंबीयांनी आपल्या पडवे येथील रुग्णालयात प्रयोगशाळा सुरू करण्याची तयारी दर्शविली आणि त्यानंतर त्यावर कळस म्हणजे २५ जून २०२० पूर्वी प्रयोगशाळा सुरू न केल्यास गुन्हा दाखल करू, अशी छडी आम्ही उगारल्यावर अखेर प्रयोगशाळा निर्मिती करण्यास मुहूर्त मिळाला. आता जनतेनेच ठरवावे हा सत्ताधाऱ्यांचा विजय आहे की विरोधकांच्या दबावाचा?देवगड ग्रामीण रुग्णालयाची नवीन इमारत मंजूर असून तत्कालीन आरोग्यमंत्र्यांनी तिचे भूमिपूजन केले. त्यासाठी २२ कोटींची तरतूद झाली. परंतु देवगड ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर व कर्मचाऱ्यांची भरती झालेली नाही. मग या २२ कोटींचा लाभार्थी कोण ? जनता तर नक्कीच नाही. मग लाभार्थी कंत्राटदार की मंत्री आहेत? याचे उत्तर द्यावे.कणकवली, कासार्डे ट्रामा केअर सेंटर, शिरोडा ग्रामीण रुग्णालय, वैभववाडी ग्रामीण रुग्णालय याठिकाणी डॉक्टरांची पदे भरलेली नाहीत. रुग्णालयात सोनोग्राफीची सोय नाही. गोरगरिब स्त्रियांच्या प्रसुतीसाठी सोय नाही. कणकवली किंवा अन्य ठिकाणी रुग्णांना हलवावे लागते. सावंतवाडी येथील सीटीस्कॅन मशीन कर्मचाऱ्यांअभावी बंदावस्थेत आहे.कणकवलीत अद्ययावत एक्स रे, सोनोग्राफीची सोय नाही. आरोग्य सेवेच्या नावाखाली करोडो रुपयांच्या शासकीय निधीचा चुराडा केला जात आहे. इमारती बांधण्यासाठी व मोठी यंत्रसामुग्री खरेदी करण्यापूर्वी ती चालविण्यासाठी आवश्यक असलेले डॉक्टर, तंत्रज्ञ व कर्मचाऱ्यांची रखडलेली ५५० रिक्त पदे आधी भरा. त्यानंतरच इमारती बांधा आणि मल्टीस्पेशालिस्टी हॉस्पिटलच्या बाता मारा, अशी टीकाही प्रमोद जठार यांनी या प्रसिद्धीपत्रकातून केली आहे.जिल्ह्यात एक लाखावर चाकरमानीही प्रयोगशाळा निर्मिती राजकीय कुरघोडीतून न करता ती जनतेच्या प्रेमापोटी केली असती तर ठाकरे सरकारचे आम्ही अभिनंदनच केले असते. सत्ताधाऱ्यांचा हा विजय मारून मुटकून मिळवलेला विजय आहे. चाकरमानी सिंधुदुर्गात येऊन धडकले आहेत. या प्रयोगशाळेची सोय मार्च-एप्रिल महिन्यांत करून दिली असती, तर मुंबई, पुण्यात अडकलेल्या ५ ते १० लाख चाकरमान्यांची सुटका सरकार करू शकले असते. मुंबई विरळ झाली असती. मुंबई व चाकरमानी दोघेही सुखरूप राहिले असते. सत्ताधाऱ्यांनी सावंतवाडीत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचे स्वप्न दाखविण्यापेक्षा आरोग्य खात्यातील ५५० रिक्त पदे आधी भरावीत. देवगड येथील रुग्णालयाला २२ कोटींची तरतूद झाली. परंतु देवगड ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर व कर्मचाऱ्यांची भरती झालेली नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPramod Jatharप्रमोद जठारsindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपा