शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत

By अनंत खं.जाधव | Updated: April 25, 2025 17:21 IST

आंबोली: पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा ...

आंबोली: पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत राहिले पाहिजे. पण सरकारने एखादा निर्णय घेतना त्याचा भारतावरच उलटा परिणाम होणार नाही? याची दक्षता घेतली पाहिजे असे मत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी मांडले. ते आंबोली येथील ऊस संशोधन केंद्रात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी एखाद्या पर्यटकाला त्याचा धर्म विचारून मारणे हे भयंकर कृत्य असल्याचे सांगितले.पवार गुरूवार पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौऱ्यावर होते. आज, शुक्रवारी त्यांनी आंबोली नांगरतास येथील ऊस संशोधन केंद्राला भेट देऊन संशोधकासोबत बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बॅक संचालक व्हिक्टर डाॅन्टस, माजी मंत्री प्रविण भोसले, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील, ऊस सशोधन केंद्राचे प्रमुख अधिकारी प्रभाकर देशमुख उपस्थित होते.परिस्थीतीचे गांभीर्य ओळखले पाहिजेपहलगाम येथील हल्याबाबत पवार यांनी चिंता व्यक्त केली. धर्म विचारून एखाद्या पुरूषाला मारणे म्हणजे परिस्थीतीचे गांभीर्य ओळखले पाहिजे. जे काही लोक धर्माबाबत अधिक बोलतात त्यांनाच सरकार पाठिंबा देते हे योग्य नसल्याचे पवार यांनी म्हटले.एखादा निर्णय घेतला तर तडीस न्यावापहलगाममध्ये घडलेल्या घटनेनंतर केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला आमच्या पक्षाकडून लोकसभेतील नेत्या सुप्रिया सुळे यांना पाठवण्यात आले होते. त्यामुळेच सरकार जो काही निर्णय घेईल त्याला आम्ही पाठिंबा दिला असून सर्वजण सरकार सोबत आहोत. हल्ला भारतावर झालेला आहे त्यामुळेच सरकारला पाठिंबा देणे गरजेचे आहे. पण सरकारने ही पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावे. एखादा निर्णय घेतला तर तडीस न्यावा असे आवाहन पवार यांनी केले. काही निर्णय विचार करून घेतले पाहिजेत हल्ल्यानंतर केंद्र सरकारकडून पाकिस्तानवर काही निर्बंध लादण्यात आले आहेत, पण हे निर्बंध लादत असताना सरकारने थोडासा विचार केला पाहिजे. भारताची विमानसेवा जर पाकिस्तानातून जात असताना बंद केली तर त्याचा परिणाम भारतावरच होईल असे अनेक निर्णय आहेत. पण यातून पाकिस्तानला ही एक संदेश जाईल असेही पवार म्हणाले.

पवार म्हणाले, वेंगुर्ले येथील फळ संशोधन केंद्रात काजूवर नवनवीन प्रकिया उद्योग उभे राहत आहेत याची माहिती घेतली  हे भूषणावह आहे. असे असे असले तरी काजू पिकांबाबत जनतेत किती उत्साह आहे. हेही  तपासून घेतले पाहिजे. पण संशोधनाचे काम चांगले चालले असल्याचे पवार यांनी म्हटले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाSharad Pawarशरद पवारCentral Governmentकेंद्र सरकारterroristदहशतवादीPakistanपाकिस्तान