शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

महामार्ग प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंत्यांवर कारवाई करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 17:55 IST

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे रत्नागिरी येथील कार्यकारी अभियंता सलिम शेख यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. अशी मागणी एका निवेदनाद्वारे मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देमहामार्ग प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंत्यांवर कारवाई करा!परशुराम उपरकर यांची मागणी; नितीन गडकरी यांना निवेदन

कणकवली : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे रत्नागिरी येथील कार्यकारी अभियंता सलिम शेख हे जनतेच्या विविध प्रश्नांबाबत संपर्क केला असता लोकप्रतिनिधी , जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांच्यापैकी कोणालाही प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यासाठी याबाबत सखोल चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. अशी मागणी एका निवेदनाद्वारे मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.या निवेदनात म्हटले आहे की, अधिकाऱ्यांबाबत व प्रशासकीय यंत्रणेबाबत आपण अनेकवेळा विविध माध्यमातून परखड भूमिका मांडली आहे . मी विधानपरीषदेचा आमदार असताना हे सर्व जवळून अनुभवलेले आहे . दोन दिवसापूर्वी तर प्रशासन प्रकल्पांच्याबाबत कशी अडवणूक करते व प्रशासकीय अधिकारी कशाप्रकारे जनतेला सतावतात याबाबत आपण वक्तव्य केले आहे.

प्रशासन जनतेच्या प्रश्नांबाबत कसे दुर्लक्ष करते व लोकप्रतिनिधी विकास कामांचे नारळ फोडल्यानंतर कशी टक्केवारीची मागणी करतात याबाबत परखड विचार आपण मांडले आहेत. आपल्यासारख्या कर्तव्यदक्ष मंत्र्याकडून जनतेला एक वेगळी अपेक्षा आहे .पण अनेक अधिकारी मात्र जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात . जनतेचे प्रश्न सोडविण्याकरीता विलंब करतात . यामध्ये रत्नागिरी येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता सलिम शेख यांचा समावेश आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणच्या कामाअंतर्गत 'मिसिंग प्लॉट' जमिनीचा अनेक शेतकऱ्यांना मोबदला व लवादाकडे हरकत घेतल्यानंतरही अतिरीक्त मोबदला मिळालेला नाही . मात्र, चौपदरीकरणाचे काम करणारे ठेकेदार कोणताही मोबदला दिलेला नसताना शेतकऱ्यांना दमदाठी करून धाक - धपटशाही करून झाडे , घरे तोडून त्या जमिनीत अतिक्रमण करत आहेत.शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध मुळीच नाही . शेतकऱ्यांची जाणारी जमिन - घरे यांचा मोबदला देऊन त्यांना अन्य ठिकाणी वास्तव्य करण्याकरीता जमिन घेऊन घर बांधून झाडे लावण्याकरीता मोबदल्याबाबत आम्ही गेली दिड वर्षे मागणी करत आहोत . मात्र , कोणताही मोबदला न देता ठेकेदार लोकांच्या, शेतकऱ्यांच्या जमिनीत घुसून काम करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना घेऊन २ जानेवारी रोजी प्रांत कार्यालयात आम्ही घंटानाद आंदोलन केले . कुडाळ प्रांत कार्यालय यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्रांसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांना दूरध्वनी केला. मात्र, त्यांना कोणताही प्रतिसाद दिला गेला नाही . त्याचप्रमाणे १३ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला प्रांत कार्यालयात कार्यकारी अभियंता उपस्थित राहीलेले नाहीत .त्यापूर्वी १२ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधीसोबत कार्यकारी अभियंत्यांची जिल्हाधिका-यांनी बैठक बोलवली असता कार्यकारी अभियंता त्या बैठकीला उपस्थित राहीले नाहीत . जिल्हाधिकारी , प्रांताधिकारी तसेच लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांना भ्रमणध्वनी केला असता ते नंतर फोन करतो असा सर्वांना संदेश पाठवतात. पण, कधीही परत फोन करत नाहीत . अशा प्रकारचा आमचा अनुभव आहे

. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचे प्रकल्प सोडविण्याकरीता किंवा अडचणी सोडविण्याकरीता कार्यकारी अभियंता उपस्थित राहत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे .

याकरीता अशा कार्यकारी अभियंत्यांची लोकसंपर्क नसलेल्या ठिकाणी बदली करावी व सक्षम कार्यकारी अभियंता व प्रकल्पग्रस्तांना समजून घेणारा तसेच प्रकल्पाला चालना देणारा , अडचणी लवकर सोडवणारा अधिकारी देण्यात यावा .

तसेच त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी . याबाबत २६ जानेवारी पर्यंत कार्यवाही न झाल्यास प्रकल्पग्रस्त व भूमीग्रस्तांना घेऊन रस्त्यावर उतरून आम्हाला आंदोलन करावे लागेल याची नोंद घ्यावी .असेही या निवेदनात उपरकर यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Parshuram Upkarपरशुराम उपरकर sindhudurgसिंधुदुर्ग