शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

ऊसतोडणी पाळीपत्रकानुसारच केली जाईल : सतीश सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 14:00 IST

Sugar factory, sindhdudurgnews, साखर कारखान्याचे अधिकारी २५ आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील ऊस क्षेत्राची पाहणी करून तोडणी सुलभ होण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना सुचना करतील. त्यानंतर पाळीपत्रक निश्चित करून ऊस तोडणी केली जाईल. वशिलेबाजीवर अजिबात तोडणी करू नये अशी सूचना कारखाना व्यवस्थापनाला केली असून जिल्ह्यातील एकाही ऊस उत्पादक शेतकऱ्यावर तोडणीच्या बाबतीत अन्याय होऊ देणार नाही, असे मत जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी येथे व्यक्त केले.

ठळक मुद्देऊसतोडणी पाळीपत्रकानुसारच केली जाईल : सतीश सावंत २५ आॅक्टोबरपूर्वी कारखान्याकडून ऊस क्षेत्राची पाहणी

वैभववाडी : साखर कारखान्याचे अधिकारी २५ आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील ऊस क्षेत्राची पाहणी करून तोडणी सुलभ होण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना सुचना करतील. त्यानंतर पाळीपत्रक निश्चित करून ऊस तोडणी केली जाईल. वशिलेबाजीवर अजिबात तोडणी करू नये अशी सूचना कारखाना व्यवस्थापनाला केली असून जिल्ह्यातील एकाही ऊस उत्पादक शेतकऱ्यावर तोडणीच्या बाबतीत अन्याय होऊ देणार नाही, असे मत जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी येथे व्यक्त केले.सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या येथील कार्यालयात पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्याचे अधिकारी आणि बँकेच्या संचालकांची ऊस तोडणी नियोजनाबाबत बैठक झाली. त्यानंतर सावंत यांनी ही माहिती दिली.यावेळी बँकेचे संचालक दिगंबर पाटील, गुलाबराव चव्हाण, अनिरुद्ध देसाई, कारखान्याचे कार्यकारी संचालक जयदीप पाटील, एस. एस. पवार, ऊस विकास अधिकारी एस. एस. पाटील, बँकेचे शाखाधिकारी सर्जेराव यादव आदी उपस्थित होते.सावंत पुढे म्हणाले, गेल्या हंगामात जिल्ह्यातून ८३ हजार टन ऊस डी. वाय. पाटील कारखान्याला शेतकऱ्यांनी घातला. या ऊसाची सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली आहे. यावर्षीही ऊसतोडणी नियोजनबध्द व्हावी; या हेतूने कारखान्याच्या अधिकाऱ्यांसमवेत सकारात्मक बैठक झाली.

ऊसतोडणी करताना अनेक अडचणी येतात. त्याअनुषंगानेही चर्चा झाली. काही शेतकऱ्यांच्या ऊसामध्ये तण असते. त्यामुळे तोडणीमध्ये अडचणी येतात. त्यासाठी कारखान्याचे अधिकारी २५ आॅक्टोबरपर्यंत ऊसक्षेत्राची पाहणी करणार आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या ऊसामध्ये तण असेल त्यांना तणनाशक फवारणीच्या सूचना केल्या जातील. त्यानंतर १२ महिने पूणृ झालेल्या ऊस तोडणीचे वेळापत्रक तयार करण्यात येणार आहे.एफआरपीपेक्षा जादा दराची शक्यतायावर्षी ऊस तोडणी कामगारांचे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे तोडणीला उशिरा सुरुवात होण्याची शक्यता आहे. मात्र, केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या एफआरपीप्रमाणे यावर्षीही दर दिला जाईल. याशिवाय प्रतिटन अधिक १०० रुपये दर मिळण्याची शक्यता आहे, असे मत सतीश सावंत यांनी व्यक्त केले.शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहनपाळीपत्रक तयार झाल्यानंतर ते कारखान्याच्या गट कार्यालयात लावण्यात येणार आहे. त्याचबरोबरच तोडणीविषयीची माहिती गावच्या सेवा सोसायट्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना काही सूचना किंवा हरकती नोंदवायच्या असतील तर त्याही नोंदवून घेतल्या जातील.

याशिवाय जिल्हा बँकेच्या तालुका कार्यालयामध्ये शेतकऱ्यांना हरकती नोंदविता येणार आहेत. कोणत्याही परिस्थिती वशिलेबाजीने ऊसतोडणी करू नये, अशी सुचना कारखान्याच्या संचालकांना देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर शेतकºयांनीही सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेsindhudurgसिंधुदुर्ग