शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
2
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
3
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
4
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
5
शेअर बाजाराचा बुल सुस्साट, Sensex ८० हजारांपार; Nifty १९० अंकांनी वधारला; IT स्टॉक्समध्ये खरेदी
6
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
7
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
9
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
10
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
11
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
12
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
13
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
14
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
15
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
16
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
17
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
18
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
19
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
20
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी

कणकवली तालुक्यातील विद्यार्थी प्राथमिक शाळेमध्ये जाणार नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 16:29 IST

Panchyatsamiri, Kankavli School, panchayat samiti, sindhudurg शासन निर्णय होत नाही , तोपर्यंत कणकवली तालुक्यातील एकही विद्यार्थी प्राथमिक शाळेमध्ये जाणार नाही .अशी भूमिका कणकवली पंचायत समितीचे सभापती दिलीप तळेकर यांनी स्पष्ट केली.

ठळक मुद्देकणकवली तालुक्यातील एकही विद्यार्थी प्राथमिक शाळेमध्ये जाणार नाही !कार्यवाही न करण्याचा पंचायत समितीचा निर्णय : दिलीप तळेकर

कणकवली : शासन निर्णय होत नाही , तोपर्यंत कणकवली तालुक्यातील एकही विद्यार्थी प्राथमिक शाळेमध्ये जाणार नाही .अशी भूमिका कणकवली पंचायत समितीचे सभापती दिलीप तळेकर यांनी स्पष्ट केली.

प्राथमिक शिक्षकांना शाळेत ५० टक्के उपस्थितीचे आदेश दिले जात असताना शासन निर्णयाकडे दुर्लक्ष केले जात आहे . माध्यमिक शाळा सुरू करताना शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. पण प्राथमिक शिक्षकांच्या बाबतीत वेगळा न्याय का ? पालक , विद्यार्थी भेटी वेळी विद्यार्थी कोरोना बाधित झाल्यास त्याला जबाबदार कोण ? अशी भूमिका  तळेकर यांनी स्पष्ट केली.कणकवली येथील पंचायत समितीच्या सभापती दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते . यावेळी उपसभापती दिव्या पेडणेकर , गटविकास अधिकारी अरुण चव्हाण , गटशिक्षणाधिकारी संदेश कींजवडेकर , पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री , ओटव सरपंच हेमंत परुळेकर आदी उपस्थित होते.यावेळी दिलीप तळेकर म्हणाले, शाळेमध्ये ५० टक्के शिक्षक उपस्थित ठेवणे योग्य आहे. त्याला आमचा विरोध नाही. मात्र, तालुक्यातील सर्व शिक्षकांची आरटीपीसीआर तपासणी करावी. त्यानंतरच पालकांशी शिक्षकांनी विद्यार्थ्यांबाबत संवाद साधावा. तसेच जोपर्यंत शासन निर्णय होत नाही , तोपर्यंत कणकवली तालुक्यातील मुलांना शाळांमध्ये बोलावू नये .

कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत.लॉकडाऊन काळात कणकवली तालुक्यात २३ जूनला ' शिक्षण आपली दारी ' हा उपक्रम पंचायत समितीने राबविला होता .तो उपक्रम ७ ऑक्टोबरला थांबविला आहे.आता शासन निर्णयानुसार शाळेमध्ये ५० टक्के शिक्षक उपस्थिती असायला हवी . त्याबद्दल आमचे काहीही म्हणणे नाही.मात्र, तेच शिक्षक विद्यार्थ्यांना पोषण आहार वाटप करत आहेत . कणकवली तालुक्यात ८ दिवसात ५ शिक्षक बाधित मिळाले आहेत .त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.शिक्षणाधिकारी यांनी पत्र दिले आहे की , विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षकांनी प्रथम पालकांनाही संपर्क साधावा.यापूर्वी शासन निर्णय देखील तसाच आहे . तरीही विद्यार्थ्याच्या घरी जाण्याची सक्ती केली जात असल्याचे तळेकर यांनी सांगितले .नागरिकांनी काळजी घ्यावी !कोरोनाचा समूह संसर्ग वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. शासनाने जाहीर केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. असे आवाहन दिलीप तळेकर यांनी यावेळी केले. 

 

 

 

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकSchoolशाळाpanchayat samitiपंचायत समितीsindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवली