शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

कणकवली तालुक्यातील विद्यार्थी प्राथमिक शाळेमध्ये जाणार नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 16:29 IST

Panchyatsamiri, Kankavli School, panchayat samiti, sindhudurg शासन निर्णय होत नाही , तोपर्यंत कणकवली तालुक्यातील एकही विद्यार्थी प्राथमिक शाळेमध्ये जाणार नाही .अशी भूमिका कणकवली पंचायत समितीचे सभापती दिलीप तळेकर यांनी स्पष्ट केली.

ठळक मुद्देकणकवली तालुक्यातील एकही विद्यार्थी प्राथमिक शाळेमध्ये जाणार नाही !कार्यवाही न करण्याचा पंचायत समितीचा निर्णय : दिलीप तळेकर

कणकवली : शासन निर्णय होत नाही , तोपर्यंत कणकवली तालुक्यातील एकही विद्यार्थी प्राथमिक शाळेमध्ये जाणार नाही .अशी भूमिका कणकवली पंचायत समितीचे सभापती दिलीप तळेकर यांनी स्पष्ट केली.

प्राथमिक शिक्षकांना शाळेत ५० टक्के उपस्थितीचे आदेश दिले जात असताना शासन निर्णयाकडे दुर्लक्ष केले जात आहे . माध्यमिक शाळा सुरू करताना शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. पण प्राथमिक शिक्षकांच्या बाबतीत वेगळा न्याय का ? पालक , विद्यार्थी भेटी वेळी विद्यार्थी कोरोना बाधित झाल्यास त्याला जबाबदार कोण ? अशी भूमिका  तळेकर यांनी स्पष्ट केली.कणकवली येथील पंचायत समितीच्या सभापती दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते . यावेळी उपसभापती दिव्या पेडणेकर , गटविकास अधिकारी अरुण चव्हाण , गटशिक्षणाधिकारी संदेश कींजवडेकर , पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री , ओटव सरपंच हेमंत परुळेकर आदी उपस्थित होते.यावेळी दिलीप तळेकर म्हणाले, शाळेमध्ये ५० टक्के शिक्षक उपस्थित ठेवणे योग्य आहे. त्याला आमचा विरोध नाही. मात्र, तालुक्यातील सर्व शिक्षकांची आरटीपीसीआर तपासणी करावी. त्यानंतरच पालकांशी शिक्षकांनी विद्यार्थ्यांबाबत संवाद साधावा. तसेच जोपर्यंत शासन निर्णय होत नाही , तोपर्यंत कणकवली तालुक्यातील मुलांना शाळांमध्ये बोलावू नये .

कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत.लॉकडाऊन काळात कणकवली तालुक्यात २३ जूनला ' शिक्षण आपली दारी ' हा उपक्रम पंचायत समितीने राबविला होता .तो उपक्रम ७ ऑक्टोबरला थांबविला आहे.आता शासन निर्णयानुसार शाळेमध्ये ५० टक्के शिक्षक उपस्थिती असायला हवी . त्याबद्दल आमचे काहीही म्हणणे नाही.मात्र, तेच शिक्षक विद्यार्थ्यांना पोषण आहार वाटप करत आहेत . कणकवली तालुक्यात ८ दिवसात ५ शिक्षक बाधित मिळाले आहेत .त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.शिक्षणाधिकारी यांनी पत्र दिले आहे की , विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षकांनी प्रथम पालकांनाही संपर्क साधावा.यापूर्वी शासन निर्णय देखील तसाच आहे . तरीही विद्यार्थ्याच्या घरी जाण्याची सक्ती केली जात असल्याचे तळेकर यांनी सांगितले .नागरिकांनी काळजी घ्यावी !कोरोनाचा समूह संसर्ग वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. शासनाने जाहीर केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. असे आवाहन दिलीप तळेकर यांनी यावेळी केले. 

 

 

 

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकSchoolशाळाpanchayat samitiपंचायत समितीsindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवली