शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

गुहागरात कडव्या संघर्षाची लढत अटळ

By admin | Updated: September 23, 2014 23:52 IST

युतीकडून विनय नातू यांच्यासमोर भास्कर जाधव यांची होणारी लढत संघर्षमय होणार हे निश्चित आहे.

संकेत गोयथळे - गुहागर -मागील विधानसभा निवडणुकीमध्ये गुहागर मतदारसंघावरुन वाद झाल्याने युती असूनही डॉ. विनय नातू व रामदास कदम एकमेकांविरोधात लढले. यात युतीच्या मतांचे विभाजन झाल्याने राष्ट्रवादीचे भास्कर जाधव विजयी झाले. युतीच्या मतांची बेरीज करता जाधव यांना मिळालेल्या मतांपेक्षा तब्बल सतरा हजारांनी अधिक होते. मागील पाच वर्षात राज्यमंत्री, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व कामगारमंत्री या माध्यमातून सातत्याने मतदारसंघाशी असलेला संपर्क लक्षात घेता भास्कर जाधव विरोधात विनय नातू अशी थेट लढत कडव्या संघर्षाची होईल, असे चित्र आहे.कै. डॉ. तात्या नातू यांच्यानंतर तब्बल चार वेळा विनय नातू यांनी आमदारकी भूषविली. मतदारसंघाच्या फेररचनेत बदल झाल्याने तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम यांचा खेड मतदारसंघ गायब झाला. या मतदारसंघातील मोठा भाग गुहागर मतदारसंघाला जोडला गेला. ही जागा शिवसेनेकडे असल्याचे अखेरच्या क्षणी जाहीर केल्याने नाराज विनय नातूंनी श्रीधर सेनेच्या माध्यमातून बॅट या निशाणीवर निवडणूक लढवली.युतीच्या मतविभाजनामुळे निवडणूक निकाल नेहमीपेक्षा अनपेक्षित होता. पहिल्यांदाच या मतदारसंघातील शिवसेना व भाजपची नक्की मते किती हे स्पष्ट झाले. ऐनवेळी येऊन प्रचार यंत्रणा राबवणाऱ्या रामदास कदम यांनी ४० हजार मते घेऊन सर्वांना अचंबित केले. कारण वर्षानुवर्षे भाजपचा आमदार असल्याने शिवसेनेला नगण्य समजून दुजाभावाची वागणूक दिली जात होती. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. विनय नातू यांना ३० हजार, तर भास्कर जाधव यांना ५३ हजार मते मिळाली.यावेळी युतीबरोबर भास्कर जाधव यांना सामोरे जाताना मागील निवडणुकीमधील युतीच्या मतांची गोळाबेरीज करताना ७० हजार होते. जाधव यांना मिळालेल्या मतांपेक्षा १७ हजारांनी जास्त आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लक्षात घेता हे मताधिक्य तुटल्याचे लक्षात येते. एकमेव गुहागर मतदारसंघातून भास्कर जाधव यांनी सुनील तटकरेंना २५०० मतांचे मताधिक्य मिळवून दिले.विधानसभा निवडणुकीनंतर पराभवाने खचलेल्या नातू यांनी राजकीय संन्यास घेतल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. रामदास कदम यांनी तर मागील पाच वर्षांत दोनवेळा घेतलेल्या सभा वगळता पुन्हा फिरकलेच नाहीत. याउलट भास्कर जाधव यांनी नगरविकास राज्यमंत्री, पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद व कामगारमंत्री म्हणून मतदारसंघाशी सातत्यपूर्वक संपर्क ठेवला. गुहागर पंचायत समिती व त्यानंतर गुहागर नगरपंचायत ताब्यात घेऊन विजयी घोडदौड काम ठेवली आहे. आक्रमक शैलीमुळे भास्कर जाधवांवर काही राष्ट्रवादीचे जुने कार्यकर्ते नाराज आहेत. याचा फायदा भाजप-सेना किती घेईल, हा प्रश्न आहे. शिवसेनेमध्येही अनंत गीते व रामदास कदम असे दोन गट आहेत. मात्र, कदम गट नातू यांना मनापासून सहकार्य करेल, याबाबत त्यांना शंका आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे जिल्ह्याचे प्रचारक असलेले नीलेश राणे यांनी भास्कर जाधवांविरोधात सरळ सरळ दंड थोपटले आहेत. काँग्रेसची मते अन्य ठिकाणी फिरवण्यात त्यांना यश येईल का? जाधव यांचे अन्य कट्टर राजकीय विरोधक रमेश कदम यांना लोकसभेला गुहागरमधून आठ हजार मते मिळाली. ही मते कदम अन्य ठिकाणी वळवतील, असेही बोलले जात आहे.यातूनच भास्कर जाधव यांनी गेल्या पाच वर्षांत विविध पदांवरून विकासकामांच्या जोरावर युतीचे मताधिक्य तोडता येईल, एवढी ताकद निर्माण करताना अंतर्गत शत्रूही मोठ्या प्रमाणात निर्माण केले आहेत. अशा स्थितीत युतीकडून विनय नातू यांच्यासमोर भास्कर जाधव यांची होणारी लढत संघर्षमय होणार हे निश्चित आहे.