शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

किनारपट्टीवर जोरदार वारे; मासेमारी, सागरी पर्यटन थंडावले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 12:01 PM

मागील १५ दिवसांपासूनची परिस्थिती आठवडाभर राहण्याची शक्यता

संदीप बोडवेमालवण : महाशिवरात्रीच्या कालावधीत कोकण किनारपट्टीवर वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे येथील मासेमारी व्यवसाय १५ दिवसांपासून थंडावला आहे. एरवी समुद्रात मासेमारी करणाऱ्या बोटी किनाऱ्यांवर नांगरून ठेवण्यात आल्यामुळे मासळीचे दर सुद्धा गगनाला भिडले आहेत.जोरदार वाऱ्यांचा परिणाम किनारपट्टीवरील पर्यटनावर सुद्धा झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, अशी परिस्थिती अजून आठवडाभर राहण्याची शक्यता मच्छीमारांनी व्यक्त केली आहे. दरवर्षी महाशिवरात्रीच्या कालावधीत कोकण किनारपट्टीवर जोरदार वारे वाहतात. अशावेळी समुद्रात बोटी घेऊन जाणे धोकादायक असते.येथील किनारपट्टीवर वावळ (हूक फिशिंग), गीलनेट, न्हय, रापण आणि ट्रॉलिंग पद्धतीची मासेमारी मोठ्या प्रमाणावर चालते. या पद्धतीच्या मासेमारीतून सुरमई, पापलेट, बांगडे, गोबरा, तांबोशी, कोकरी, बोईट, सावंदाळा, टोकी, पेडवे, तारली, कोलंबी, कुर्ले, म्हाकुल, मोडुसा, काडय आदी मासे बाराजांतून दुर्मिळ झाले आहेत.

मासळीचे दर अवाक्याबाहेरमासळीचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. सुरमय १२०० रुपये किलो, बांगड्यांची टोपली (८० नग) १५००, मोठ्या बांगड्यांची टोपली (४५ नग) २००० रुपये, सरंगा ८०० किलो, सवंदळा ८ नग २०० रुपये, कोलंबी ३५० ते ४०० रुपये किलो या दराने मासे विकले गेले आहेत.

जोराच्या वाऱ्यांचा किनारपट्टीवरील सागरी पर्यटनावरही परिणाम झाला आहे. स्कूबा डायव्हिंग, बोटिंग सफारी, पॅरासेलिंग आदी सागरी पर्यटनाला जोराच्या वाऱ्यांचा फटका बसला आहे. - समीर गोवेकर, सागरी पर्यटन व्यवसायिक. 

गेले महिनाभर येथील मत्स्य व्यवसायाची परिस्थिती खूपच निराशाजनक आहे. वेगाच्या वाऱ्यांमुळे मासळी खोल समुद्राच्या दिशेने सरकली आहे. मासेमारीसाठी समुद्रात बोटी घेऊन जाणे धोकादायक बनले आहे. मासळी मिळत नसल्यामुळे खलाशांचा खर्च भागात नाही. ५०० ते १००० रुपये इंधन खर्च होत असून, जाळ्याला मासळी मिळत नसल्यामुळे मासेमारी तोट्यात चालली आहे.- रश्मीन रोगे, पारंपरिक मच्छीमार

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गfishermanमच्छीमारtourismपर्यटन