शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

सिंधुदुर्ग : नाधवडे-नवलादेवीवाडीतील पंचवीस हेक्टर शेती ओलिताखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 18:53 IST

वैभववाडी तालुक्यातील नाधवडे गावची नवलादेवीवाडी, परंपरागत भात शेती करण हे वाडीतल्या शेतकऱ्यांची पिढ्यान-पिढ्याची शेती करण्याची पद्धत, १९९२ च्या पावसाळ्यात या वाडीच्या परिसरात मोठा पाऊस झाला. वाडीच्या शेजारच्या डोंगराचे भूसख:लन झाले आणि डोंगरावरील सर्व माती या वाडीच्या परिसरात पसरली.

ठळक मुद्देपंचवीस हेक्टर शेती ओलिताखाली, नाधवडे-नवलादेवीवाडी जलयुक्त शिवारअंतर्गत ओहोळाचे रूंदीकरण, कृषी अधिकाऱ्यांच्या समितीकडून पाहणी

सिंधुदुर्ग : वैभववाडी तालुक्यातील नाधवडे गावची नवलादेवीवाडी, परंपरागत भात शेती करण हे वाडीतल्या शेतकऱ्यांची पिढ्यान-पिढ्याची शेती करण्याची पद्धत, १९९२ च्या पावसाळ्यात या वाडीच्या परिसरात मोठा पाऊस झाला. वाडीच्या शेजारच्या डोंगराचे भूसख:लन झाले आणि डोंगरावरील सर्व माती या वाडीच्या परिसरात पसरली.

भातशेती करण बंद झाले. त्याच बरोबर या वाडीच्या परिसरातील तसेच डोंगरवरील पडणारे पावसाचे पाणी ज्या ओहोळाने (ओढ्याने) नैसर्गिकरित्या जायचे तो ओहोळही पूर्णपणे मातीने भरुन गेला. नैसर्गिकरित्या जाणार पावसाचं पाणी थांबल्यामुळे १९९२ पासून या परिसरात पावसाचं पाणी तुंबून रहायला लागलं.

त्यामुळे भात शेती काय पण इतर शेती करणंही या वाडीतल्या शेतकऱ्यांना जमत नव्हते. त्यामुळे १९९२ पासून येथे शेती करण दुरापास्त झाले होते. सुमारे २५ वर्ष पाणी साठण्याच्या समस्येमुळे या वाडीतील शेतकऱ्यांना शेती करता येत नव्हती.सन २0१६-१७ आराखड्यात यासाठी निधी मंजूर झाला. जे. सी. बी. च्या सहाय्याने काम सुरू झाले. या ओहाळातील एक किलोमीटर लांबीचे रुंदीकरण व माती काढण्याचे काम करण्यात आले. सुमारे सहा लक्ष रुपये खर्च करण्यात आला. २0१७ च्या पावसाळ्यात डोंगरावरील व परिसरात पडलेल्या पावसाच पाणी या ओहळातून जाऊ लागले. परिसरातील २५ हेक्टर क्षेत्रावर आता नव्या उमेदीन वाडीतील शेतकरी भात पिक घेऊ लागले आहेत.अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव शेळके, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर, पत्रकार चंद्रशेखर देसाई, महेश सरनाईक, तुषार सावंत, अजित सावंत, भगवान लोके, चंद्रशेखर तांबट या पत्रकारांसह या वाडीतल्या परिसराचा पाहणी दौरा केला. वाडीतल्या शेजारच्या ओहोळातील रुंदीकरण व मातीच्या काढण्यामुळे वाडीच्या परिसरातील २५ हेक्टर क्षेत्रावर पुन्हा भाताची भरलेल्या लोंब्यांची शेती फुलली आहे. या सर्वांच्या पाहणी बरोबरच वाडीतल्या शेतकºयांशी समक्ष संवाद साधला.पत्रकार दौऱ्याच्या पाहणी वेळी काही महिला व पुरुष शेतात भाताची झोडणी करताना दिसत होते. भाताची झोडणी करताना त्यांचे श्रमाने थकलेले पण झोडणीच्या वेळी शिवारातील खळ्यात पडलेल्या भाताच्या दाण्याकडे पाहून त्यांच्या श्रमाचश द्वीगुणीत आनंदात परिवर्तन झालेल आम्हा सर्वांना दिसून आले. नवलाईवाडी परिसरातील २५ वर्षे पडिक शेती पुन्हा ओलिताखाली आली याचे सर्व शेतकऱ्यांना समाधान वाटत होत.विहिरींना मे महिन्यातही पाणीवाडीतील शेतकरी मनोहर गवस, संजय नकाशे, प्रवीण पेडणेकर, शंकर खांडेकर, सहदेव खांडेकर, आनंद कुडाळकर या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाला उधान आलं होतं. केवळ खरीपातील भात शेतीच नव्हे तर यंदाच्या उन्हाळ्यात त्यांनी रब्बी हंगामातील मूग, चवळी, कुळीथ, भूईमूग अशी पिक घेण्याचा निश्चय बोलून दाखविला.

शिवारात पावसाचं पाणी तुंबून राहण्याची समस्या दूर होण्या बरोबरच ओहोळाच्या रुंदीकरण व माती काढण्यामुळे या परिसरात पाणी पाझरामुळे आता उन्हाळी शेतीला आम्हा सर्र्वाना शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार असल्याचा विश्वास या सर्व शेतकऱ्यांनी व्यक्त केला. या वाडीतल्या शिवाराच्या आसपास चार विहिरी आहेत. या चारही विहिरींना यंदाच्या मे महिन्यातही मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.१00 हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येईलया पाण्याच्या उपलब्धतेमुळे या परिसरात फळझाड लावडीसही चालना मिळेल, याच बरोबर १00 हेक्टर क्षेत्र भात लागवडी खाली येईल, असा विश्वास तालुका कृषि अधिकारी भगवान यांनी यावेळी व्यक्त केला.९ लाखांचे अंदाजपत्रक१९९२ ला डंगरावरील झालेल्या भूसख:लनाची माती काढणे खूप कष्टप्रद तसेच खर्चिक काम होते. या नाधवडे गावचे कृषी सहाय्यक व्ही. ए. नाईक यांनी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ व शेतकरी यांच्यासमोर जलयुक्त शिवारची माहिती दिली. यावेळी नेमक काय करायचे याची चर्चा झाली. नैसर्गिकरित्या पावसाचे पडणारे पाणी जाण्यासाठी वाडीच्या शेताच्या ओहाळातील माती काढणे व रुंदीकरण करण्याचे काम निश्चित करण्यात आले. सुमारे ९ लक्ष रुपयांचे खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. 

टॅग्स :Farmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्ग