शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

सिंधुदुर्ग : पंचायत समितीत पालकांनी भरवली शाळा, शिक्षकासाठी मालोंड ग्रामस्थ आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 4:15 PM

वारंवार मागणी करूनही शाळेतील रिक्त शिक्षकांची पदे न भरणा केल्याने संतप्त बनलेल्या मालोंड शाळा नंबर एक मधील सर्व मुलांना पालकांनी पंचायत समितीत बसवत अनोखे आंदोलन छेडले. शाळेतील सर्व मुले शाळा बंद करून पंचायत समितीत आणण्याच्या या प्रकाराने शिक्षण विभागात खळबळ उडाली.

ठळक मुद्देपंचायत समितीत पालकांनी भरवली शाळा शिक्षकांच्या मागणीसाठी मालोंड ग्रामस्थ-पालक आक्रमक  शिक्षक नेमणुकीनंतर आंदोलन मागे

मालवण : वारंवार मागणी करूनही शाळेतील रिक्त शिक्षकांची पदे न भरणा केल्याने संतप्त बनलेल्या मालोंड शाळा नंबर एक मधील सर्व मुलांना पालकांनी पंचायत समितीत बसवत अनोखे आंदोलन छेडले. शाळेतील सर्व मुले शाळा बंद करून पंचायत समितीत आणण्याच्या या प्रकाराने शिक्षण विभागात खळबळ उडाली.दरम्यान,  गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी पालक व गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय मुळीक यांची बैठक बोलवत समस्या जाणून घेतल्या. अखेर शाळेवर या संपूर्ण वर्षासाठी शिक्षक नेमणूक देण्यात आली. शिक्षकही तातडीने शाळेवर रवाना झाल्याने पालकांनी छेडलेले आंदोलन मागे घेतले.यावेळी सरपंच वैशाली घाडीगांवकर, पोलीस पाटील पांडुरंग तांडेल, सुहास सुर्वे, मकरंद तांडेल, रवींद्र तांडेल, महेश परब, औदुंबर तांडेल, नवनाथ घाडीगांवकर, पुर्वा फणसगावकर, जयवंत पारकर, पद्माकर फणसगावकर, गौरी परब, प्रणाली परब, सुलतान शेख, सुवर्णा मालंडकर आदी व इतर ग्रामस्थ तसेच विद्यार्थी उपस्थित होते. स्वाभिमान जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, उपसभापती अशोक बागवे, शिवसेना तालुकाप्रमुख बबन शिंदे यांनीही पालकांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविला.मालोंड एक नंबर शाळेत सातवी इयत्तेपर्यंत वर्ग असून सध्या २५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. निकषाचा विचार करता सहावी ते आठवी या वर्गासाठी पदवीधर शिक्षक अपेक्षित आहेत. मात्र तालुक्यात ११२ शिक्षक पदे रिक्त असल्याने शाळेत शिक्षक संख्या कमी आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत होत आहे.मालोंड शाळेत एकही पदवीधर शिक्षक नसल्याने पालक आक्रमक बनले. अखेर विस्तार अधिकारी यांच्या अधिकारात शाळेवर शिक्षक नेमणूक देण्यात आल्याने पालकांनी आंदोलन स्थगित केले.वैभव नाईक यांनी सचिवांची घेतली भेटसिंधुदुर्ग जिल्ह्यात चार हजार साठ शिक्षक पदे मंजूर आहेत. मात्र सध्या तीन हजार चारशे सहासष्ठ शिक्षक कार्यरत आहेत. सहाशे शिक्षक पदे रिक्त आहेत. त्यात २३५ शिक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदली झाल्या. त्यातील ६५ शिक्षकांना सोडण्यात आले. तर केवळ ६ शिक्षक जिल्ह्याबाहेरून आले.

शेकडो शिक्षक पदे रिक्त असल्याने शिक्षणावर याचा परिमाण होतो. तरी बदली झालेल्या शिक्षकांना सोडण्यात येऊ नये अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी मंत्रालयात शासन सचिवांकडे केली आहे. शासन सचिवांनीही याबाबत सकारात्मक भूमिका घेतली. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSchoolशाळा