शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
4
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
5
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
6
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
7
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
8
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
9
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
10
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
11
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
12
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
13
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
14
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
15
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
16
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
17
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
18
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
19
सावत्र लेक दिया मिर्झाला म्हणत नाही आई, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "ती मला..."
20
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...

सिंधुदुर्ग-रत्नागिरीचा यापुढील  खासदार भाजपाचाच असेल! केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 9:24 PM

Sindhudurg-Ratnagiri Lok Sabha: पक्षासाठी असलेली निष्ठा आणि आत्मीयतेने सुरू असलेले येथील काम पाहिल्यानंतर सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात  भाजपचाच खासदार निवडून येणार असल्याचा विश्वास केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी व्यक्त केला.

- सुधीर राणे 

कणकवली - गेल्या आठ वर्षात मोदी सरकारने देशभरात जेवढ्या जनकल्याणाच्या योजना राबवल्या तेवढ्या योजना गेल्या ६७ वर्षात कोणतेही सरकार राबवू शकलेले नाही.  महाराष्ट्रातही पुन्हा भाजपचे सरकार आलेले आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या योजना अधिक जोमाने सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी संघटितपणे काम करा. पक्षासाठी असलेली निष्ठा आणि आत्मीयतेने सुरू असलेले येथील काम पाहिल्यानंतर सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात  भाजपचाच खासदार निवडून येणार असल्याचा विश्वास केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी व्यक्त केला.

कणकवली येथे भाजपा लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत गुरुवारी आयोजित कणकवली विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार नितेश राणे , भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली , जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी,लोकसभा संयोजक अतुल काळसेकर, माजी आमदार प्रमोद जठार, भाजपा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत , विधानसभा संयोजक मनोज रावराणे , विधानसभा सहाय्यक संयोजक संदीप साटम , महिला जिल्हा अध्यक्ष संध्या तेरसे , नगराध्यक्ष समीर नलावडे , वैभववाडी नगराध्यक्ष नेहा माईणकर , कणकवली विधानसभा मतदार संघातील  पदाधिकारी ,माजी जिल्हा परिषद सदस्य , पंचायत समिती सदस्य , नगरसेवक , सरपंच , उपसरपंच , सदस्य आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा यांनी लोकप्रतिनिधींशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. केंद्र सरकारच्या योजनेतील जनतेला अपेक्षित असलेले बदल आणि कारणे जाणून घेतली. लाभार्थ्यापर्यंत केंद्र शासनाच्या योजना अजून व्यापक स्वरूपात पोहोचाव्यात म्हणून काय केले जावे? याबाबतचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर ते बोलत होते.

ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि कोकणातील अनेक प्रश्न केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून आमदार नितेश राणे व भाजपचे पदाधिकारी केंद्र सरकारकडे मांडत आहेत. आपण कार्यकर्ते म्हणून काम करत असताना पक्षाच्या योजना तळमळीने मांडता हे पाहून समाधान वाटते.  २०१४ च्या पूर्वी देशात अनेक सरकारे होती. मात्र सामान्य जनतेच्या गरजा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाणल्या. यशस्वी पंतप्रधानांच्या यशस्वी योजनांची चर्चा कार्यकर्ते म्हणून जनतेपर्यंत पोहचवा आणि नवनव्या योजनांचे लाभ जनतेला मिळवून द्या, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी भाजपा आमदार नितेश राणे यांनी चर्चेदरम्यान पदाधिकारी आणि केंद्रीय गृहमंत्री मिश्रा यांच्यात समन्वय साधला.आमदार राणे यांनी केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा यांचा भगवी शाल, सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला.इतर मान्यवरानीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.  

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्ग