शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग रत्नागिरी विमानसेवेवर ‘प्रभूकृपा’, उडाण योजनेत मुंबई, नाशिक, पुण्यातून उड्डाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 22:57 IST

विविध कंपन्यांची बोली :चिपीतून लवकरच विमान वाहतूक

अनंत जाधव 

सावंतवाडी : सिंधुदुगसह रत्नागिरीच्या पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा मानला जाणारा रत्नागिरी व चिपी विमानतळ आता सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शुक्रवारी दिल्लीत हवाई वाहतूक मंत्रालयाने अधिसुचना काढत उडाण ३.१ च्या अंतर्गत बोली लावल्या. त्यात विविध कंपन्यांनी सिंधुदुर्गातून मुंबई, पुणे व नाशिक तर रत्नागिरी तून मुंबई अशी विमानसेवा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. रत्नागिरी परवानग्या पूर्ण झाल्या आहेत तर चिपी विमानतळाच्या काहि परवानग्या घेणे बाकी असल्याने त्या पूर्ण झाल्यानंतर या विमानसेवा सुरू होणार आहेत. हवाई वाहातुक मंत्रालयाचा कार्यभार प्रभूनी हाती घेतल्यानंतर ही प्रभूकृपाच कोकणवर झाली आहे.

चिपी विमानतळ पूर्ण होऊन सहा महिने झाले होते. मात्र या विमानतळासाठी लागणाºया काही परवानग्या बाकी होत्या. तरीही १२ सप्टेंबरला मुंबई ते चिपी असे पहिली विमान चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर अधिकृत विमानसेवा १२ डिसेंबरला सुरू होईल, अशी घोषणा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली होती. पण १२ डिसेंबरची डेडलाईन प्रशासनाला पाळता आली नव्हती. त्यामुळे टिकाही झाली होती. त्यातच अलिकडेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेल्या केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांनी चिपी विमानतळाच्या काही परवानग्या घेणे बाकी आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाची परवानगी अद्याप मिळाली नाही, असे स्पष्ट केले होते.मात्र, ही परवानगी आपण लवकरच घेऊ, असेही त्यांनी जाहीर केले होते. त्यामुळे विमानसेवा सुरू होणार हे स्पष्ट झाले होते. त्यासाठीच उडान ३.१ मध्ये सिंधुदुर्ग व रत्नागिरी विमानतळांचा समावेश करण्यात आला. त्यासाठी विमान वाहतूक मंत्रालयाने अधिसूचनाही काढली होती. त्यानंतर शुक्रवारी ८ सप्टेंबरला दिल्ली येथे विमान वाहतूक मंत्रालयाने विविध कंपन्यांना निमंत्रित केले होते. त्यात काही कंपन्यांनी सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला. त्यामुळेच आता चिपी विमानतळावरून मुंबई तसेच पुणे व नाशिक अशी विमानसेवा सुरू होणार आहे. तसेच या तीनही विमानतळांशी चिपी विमानतळ जोडले जाणार आहे.

रत्नागिरी विमानतळांचे काम पूर्ण होउन बरीच वर्षे झाली होती.पण तेथून ही विमानसेवा सुरू नव्हती मात्र प्रभू कृपे मुळे आता रत्नागिरी विमानतळांचा समावेश ही उडाण मध्ये करण्यात आला असून,रत्नागिरी मुंबई अशी विमानसेवा सुरू होणार आहे.त्यामुळे एकप्रकारे कोणकला अच्छे दिनच आले आहेत.तसेच रत्नागिरीचे पर्यटन ही वाढणार आहे. दरम्यान, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी ही विमानसेवा काही तांंत्रिक परवानग्या पूर्ण झाल्यानंतर सुरू होईलच, त्याशिवाय सिंधुदुर्ग व रत्नागिरीच्या पर्यटनालाही चालना मिळणार आहे. यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या सेवेचा लवकरच शुभारंभ होणार आहे. मात्र, त्या पलीकडे जाऊन सिंधुदुर्ग पर्यटन दृष्ट्या जगाशी जोडला जाईल याचा आनंद मोठा आहे आणि हे काम लवकरच पूर्ण होणार आहे, असे ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दाखवणार हिरवा झेंडाचिपी विमानतळाच्या काही तांत्रिक परवानग्या पूर्ण झाल्यानंतर चिपीतून विमानसेवेला अधिकृतरित्या सुरूवात होणार आहे. याचे उद्घाटनही लवकरच होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या विमानसेवेला हिरवा झेंडा दाखवून हे उद्घाटन होईल, असे यावेळी सांगण्यात आले.

टॅग्स :airplaneविमानsindhudurgसिंधुदुर्गSuresh Prabhuसुरेश प्रभू