शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
3
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
4
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
5
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
6
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
7
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
8
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
9
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
10
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
11
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
12
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
13
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
14
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
15
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
16
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
18
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
19
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
20
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न

सिंधुदुर्ग रत्नागिरी विमानसेवेवर ‘प्रभूकृपा’, उडाण योजनेत मुंबई, नाशिक, पुण्यातून उड्डाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 22:57 IST

विविध कंपन्यांची बोली :चिपीतून लवकरच विमान वाहतूक

अनंत जाधव 

सावंतवाडी : सिंधुदुगसह रत्नागिरीच्या पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा मानला जाणारा रत्नागिरी व चिपी विमानतळ आता सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शुक्रवारी दिल्लीत हवाई वाहतूक मंत्रालयाने अधिसुचना काढत उडाण ३.१ च्या अंतर्गत बोली लावल्या. त्यात विविध कंपन्यांनी सिंधुदुर्गातून मुंबई, पुणे व नाशिक तर रत्नागिरी तून मुंबई अशी विमानसेवा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. रत्नागिरी परवानग्या पूर्ण झाल्या आहेत तर चिपी विमानतळाच्या काहि परवानग्या घेणे बाकी असल्याने त्या पूर्ण झाल्यानंतर या विमानसेवा सुरू होणार आहेत. हवाई वाहातुक मंत्रालयाचा कार्यभार प्रभूनी हाती घेतल्यानंतर ही प्रभूकृपाच कोकणवर झाली आहे.

चिपी विमानतळ पूर्ण होऊन सहा महिने झाले होते. मात्र या विमानतळासाठी लागणाºया काही परवानग्या बाकी होत्या. तरीही १२ सप्टेंबरला मुंबई ते चिपी असे पहिली विमान चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर अधिकृत विमानसेवा १२ डिसेंबरला सुरू होईल, अशी घोषणा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली होती. पण १२ डिसेंबरची डेडलाईन प्रशासनाला पाळता आली नव्हती. त्यामुळे टिकाही झाली होती. त्यातच अलिकडेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेल्या केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांनी चिपी विमानतळाच्या काही परवानग्या घेणे बाकी आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाची परवानगी अद्याप मिळाली नाही, असे स्पष्ट केले होते.मात्र, ही परवानगी आपण लवकरच घेऊ, असेही त्यांनी जाहीर केले होते. त्यामुळे विमानसेवा सुरू होणार हे स्पष्ट झाले होते. त्यासाठीच उडान ३.१ मध्ये सिंधुदुर्ग व रत्नागिरी विमानतळांचा समावेश करण्यात आला. त्यासाठी विमान वाहतूक मंत्रालयाने अधिसूचनाही काढली होती. त्यानंतर शुक्रवारी ८ सप्टेंबरला दिल्ली येथे विमान वाहतूक मंत्रालयाने विविध कंपन्यांना निमंत्रित केले होते. त्यात काही कंपन्यांनी सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला. त्यामुळेच आता चिपी विमानतळावरून मुंबई तसेच पुणे व नाशिक अशी विमानसेवा सुरू होणार आहे. तसेच या तीनही विमानतळांशी चिपी विमानतळ जोडले जाणार आहे.

रत्नागिरी विमानतळांचे काम पूर्ण होउन बरीच वर्षे झाली होती.पण तेथून ही विमानसेवा सुरू नव्हती मात्र प्रभू कृपे मुळे आता रत्नागिरी विमानतळांचा समावेश ही उडाण मध्ये करण्यात आला असून,रत्नागिरी मुंबई अशी विमानसेवा सुरू होणार आहे.त्यामुळे एकप्रकारे कोणकला अच्छे दिनच आले आहेत.तसेच रत्नागिरीचे पर्यटन ही वाढणार आहे. दरम्यान, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी ही विमानसेवा काही तांंत्रिक परवानग्या पूर्ण झाल्यानंतर सुरू होईलच, त्याशिवाय सिंधुदुर्ग व रत्नागिरीच्या पर्यटनालाही चालना मिळणार आहे. यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या सेवेचा लवकरच शुभारंभ होणार आहे. मात्र, त्या पलीकडे जाऊन सिंधुदुर्ग पर्यटन दृष्ट्या जगाशी जोडला जाईल याचा आनंद मोठा आहे आणि हे काम लवकरच पूर्ण होणार आहे, असे ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दाखवणार हिरवा झेंडाचिपी विमानतळाच्या काही तांत्रिक परवानग्या पूर्ण झाल्यानंतर चिपीतून विमानसेवेला अधिकृतरित्या सुरूवात होणार आहे. याचे उद्घाटनही लवकरच होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या विमानसेवेला हिरवा झेंडा दाखवून हे उद्घाटन होईल, असे यावेळी सांगण्यात आले.

टॅग्स :airplaneविमानsindhudurgसिंधुदुर्गSuresh Prabhuसुरेश प्रभू