शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

सिंधुदुर्ग : मालवणात अस्वच्छतेला मिळणार पूर्णविराम : आप्पा लुडबे यांचा विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2018 5:32 PM

नगरपालिकेला गतवर्षी मिळालेल्या बक्षिसामुळे यावर्षीही जोमाने या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाच घंटागाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. पालिकेकडे चार रिक्षा टेम्पो उपलब्ध असून नव्याने पाच गाड्या आल्याने नऊ गाड्यांच्या सहाय्याने शहरातील कचरा स्वच्छतेच्या प्रश्नावर पूर्णविराम मिळणार आहे, असा विश्वास आरोग्य सभापती आप्पा लुडबे यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देमालवणात अस्वच्छतेला मिळणार पूर्णविराम : आप्पा लुडबे यांचा विश्वासनऊ घंटा गाड्यांवर स्वच्छतेची भिस्त

सिंधुदुर्ग : नगरपालिकेला गतवर्षी मिळालेल्या बक्षिसामुळे यावर्षीही जोमाने या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाच घंटागाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. पालिकेकडे चार रिक्षा टेम्पो उपलब्ध असून नव्याने पाच गाड्या आल्याने नऊ गाड्यांच्या सहाय्याने शहरातील कचरा स्वच्छतेच्या प्रश्नावर पूर्णविराम मिळणार आहे, असा विश्वास आरोग्य सभापती आप्पा लुडबे यांनी व्यक्त केला.मालवण पालिकेतील सर्व नगरसेवकांनी याहीवर्षी स्पर्धेत सहभागी होण्याच एकमुखी निर्णय घेतला आहे. केंद्र शासनाने २०१६ मध्ये स्वच्छ भारत अभियान जाहीर केले. संपूर्ण भारत स्वच्छ करण्याच्या महत्वाकांक्षी अभियानाचा चौथा टप्पा स्वच्छता सर्वेक्षण २०१९ या नावाने येत्या २ आॅक्टोबरपासून सुरू झाला आहे. त्यात हागणदारी मुक्ती बरोबरच ओला व सुका कचरा नागरिकांकडून वेगळा गोळा करून त्यावर प्रक्रिया करणे तसेच लोकसहभागातून शहर स्वच्छ करणे या तीन प्रमुख मुद्यांवर भर दिला जात आहे.आरोग्य विभागाकडून घंटागाड्यांचे नियोजन४० मजूर घेण्याचीही कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. प्रत्येक प्रभागामध्ये दोन कामगार कार्यरत राहणार आहेत. उर्वरित सहा मजूर आडारी डंपिंग ग्राऊंड येथे वर्गीकरणाचे काम करणार आहेत. आडारी डंपिंग ग्राऊंड येथे गांडूळ खत व बायोगॅस प्रकल्पाचेही काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. आरोग्य विभागाकडून घंटागाड्यांचे नियोजन करण्यात येणार आहे. कचरा कुंड्यांमध्ये प्रत्येक घराचा कचरा न जाता थेट घंटागाड्यांमध्ये येण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असेही लुडबे यांनी सांगितले.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानMuncipal Corporationनगर पालिकाsindhudurgसिंधुदुर्ग