शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

सिंधुदुर्ग : आंबा, काजू बागेला आग; लाखोंचे नुकसान, नुकसान भरपाई देणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 11:03 IST

सावंतवाडी तालुक्यातील मळगाव-वेत्ये गावांच्या सीमेवर सुमारे ३८ एकर जागेतील आंबा, काजू बागेला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न शेतकऱ्यांनी केले पण त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. हाताशी आलेले उत्पन्न या आगरुपी संकटाने हिसकावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. आगीचे कारण समजू शकले नाही.

ठळक मुद्देआंबा, काजू बागेला आग; लाखोंचे नुकसानशासन नुकसान भरपाई देईल का?मळगावातील शेतकऱ्यांवर संकट

तळवडे : सावंतवाडी तालुक्यातील मळगाव-वेत्ये गावांच्या सीमेवर सुमारे ३८ एकर जागेतील आंबा, काजू बागेला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न शेतकऱ्यांनी केले पण त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. हाताशी आलेले उत्पन्न या आगरुपी संकटाने हिसकावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. आगीचे कारण समजू शकले नाही.सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या शेतजमिनी, माळरानांवर अग्नीतांडव निर्माण होत असून यात आंबा, काजू बागायतींचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. हाता-तोंडाशी आलेली आंबा, काजू बागायती जळून खाक होत आहे. याची नुकसान भरपाई देणार कोण? असा सवाल केला जात आहे.

सावंतवाडी तालुक्यातील मळगाव-वेत्ये परिसरातील सुमारे तीन एकरच्या परिसरात गुरुवारी आगडोंब उसळला. यात आठ ते दहा शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या अग्नितांडवात एक हजारच्यावर आंबा, काजू कलमे जळून खाक झाली. या घटनेचा अजूनही पंचनामा न झाल्याने नुकसानीचा नेमका आकडा उपलब्ध झाला नाही.गोरगरीब शेतकऱ्यांनी दिवस-रात्र घाम गाळून फुलविलेल्या आंबा, काजू बागा ऐन हंगामातच आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने त्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. आग कोणी लावली की अन्य कोणत्या कारणाने लागली याचा शोध घेणे गरजचे आहे. तशी मागणी नुकसानग्रस्त शेतकºयांनी केली आहे.दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात बागायतींना आग लागण्याचे प्रकार वाढले असून हे वेळीच थांबणे गरजेचे आहे. सावंतवाडी तालुक्यातील ओवळिये गावातही असाच प्रकार घडला. बांदा, वेंगुर्ले परिसरातही अशा बऱ्याच घटना घडल्या आहेत.

शासनाने अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन मदतीचा हात देणे गरजेचे आहे. आम्ही शेतकºयांनी गेली २५ वर्षे उन्हातान्हात राबून आंबा, काजूच्या बागा फुलविल्या. मात्र आज उत्पन्न घेण्याची वेळ आली असतानाच आमच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. शासनाने आम्हांला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी दिलीप राऊळ यांनी केली आहे.आग लागून आंबा, काजू बागायतीचे जे नुकसान होते, त्याची नुकसान भरपाई शासनाने द्यावी. ग्रामीण भागातील शेतकरी कष्ट करून बागायती करतात, पण ऐन उत्पन्नाच्यावेळीच असे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी काय करावे? असे विचारले असता अशावेळी शासनाने शेतकऱ्यांसाठी तारणहार बनावे, असे शेतकरी गंगाराम राऊळ यांनी सांगितले.

शासन नुकसान भरपाई देईल का?; मळगावातील शेतकऱ्यांवर संकट२० ते २५ वर्षे उत्पन्न देणारी आंबा, काजू कलमे जळून खाक झाल्याने गरीब शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. याची दखल घेऊन शासन नुकसान भरपाई देईल का? की केवळ आश्वासने देणार? असा सवाल शेतकऱ्यांतून केला जात आहे.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गfireआगFarmerशेतकरी