शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदाच्या निडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
2
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
3
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
4
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
5
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
6
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
7
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
8
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
9
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
10
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
12
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
13
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू
14
प्रेमाचा त्रिकोण! आमच्या दोघींपैकी एकीला निवड; गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरून पतीने केला मोठा कांड
15
२४ घरं, ४ प्लॉट, ४० एकर शेतजमीन... १५ हजार पगार असलेल्या क्लार्ककडे ३० कोटींचं घबाड
16
एकमेकांना शेवटचं बघताच आलं नाही! अल्जेरियात मुलाचा मृत्यू, मृतदेहाची वाट पाहणाऱ्या वडिलांचेही निधन 
17
एन चंद्रशेखरन यांच्या हाती पुन्हा टाटा सन्सची धुरा; IPO ची वाट पाहणाऱ्यांना पुन्हा एकदा मोठा झटका
18
वडिलांचा मृत्यू, बॉयफ्रेंडसोबत पळाली आई; लेकाची पोलिसांत धाव, म्हणाला, "ते मला मारुन टाकतील..."
19
नोकरी सुरू होताच १५,००० रुपये तुमच्या खात्यात! मोदी सरकारने आणली 'ही' खास योजना, कंपनीलाही मिळेल फायदा!

सिंधुदुर्ग : आंबा, काजू बागेला आग; लाखोंचे नुकसान, नुकसान भरपाई देणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 11:03 IST

सावंतवाडी तालुक्यातील मळगाव-वेत्ये गावांच्या सीमेवर सुमारे ३८ एकर जागेतील आंबा, काजू बागेला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न शेतकऱ्यांनी केले पण त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. हाताशी आलेले उत्पन्न या आगरुपी संकटाने हिसकावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. आगीचे कारण समजू शकले नाही.

ठळक मुद्देआंबा, काजू बागेला आग; लाखोंचे नुकसानशासन नुकसान भरपाई देईल का?मळगावातील शेतकऱ्यांवर संकट

तळवडे : सावंतवाडी तालुक्यातील मळगाव-वेत्ये गावांच्या सीमेवर सुमारे ३८ एकर जागेतील आंबा, काजू बागेला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न शेतकऱ्यांनी केले पण त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. हाताशी आलेले उत्पन्न या आगरुपी संकटाने हिसकावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. आगीचे कारण समजू शकले नाही.सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या शेतजमिनी, माळरानांवर अग्नीतांडव निर्माण होत असून यात आंबा, काजू बागायतींचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. हाता-तोंडाशी आलेली आंबा, काजू बागायती जळून खाक होत आहे. याची नुकसान भरपाई देणार कोण? असा सवाल केला जात आहे.

सावंतवाडी तालुक्यातील मळगाव-वेत्ये परिसरातील सुमारे तीन एकरच्या परिसरात गुरुवारी आगडोंब उसळला. यात आठ ते दहा शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या अग्नितांडवात एक हजारच्यावर आंबा, काजू कलमे जळून खाक झाली. या घटनेचा अजूनही पंचनामा न झाल्याने नुकसानीचा नेमका आकडा उपलब्ध झाला नाही.गोरगरीब शेतकऱ्यांनी दिवस-रात्र घाम गाळून फुलविलेल्या आंबा, काजू बागा ऐन हंगामातच आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने त्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. आग कोणी लावली की अन्य कोणत्या कारणाने लागली याचा शोध घेणे गरजचे आहे. तशी मागणी नुकसानग्रस्त शेतकºयांनी केली आहे.दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात बागायतींना आग लागण्याचे प्रकार वाढले असून हे वेळीच थांबणे गरजेचे आहे. सावंतवाडी तालुक्यातील ओवळिये गावातही असाच प्रकार घडला. बांदा, वेंगुर्ले परिसरातही अशा बऱ्याच घटना घडल्या आहेत.

शासनाने अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन मदतीचा हात देणे गरजेचे आहे. आम्ही शेतकºयांनी गेली २५ वर्षे उन्हातान्हात राबून आंबा, काजूच्या बागा फुलविल्या. मात्र आज उत्पन्न घेण्याची वेळ आली असतानाच आमच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. शासनाने आम्हांला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी दिलीप राऊळ यांनी केली आहे.आग लागून आंबा, काजू बागायतीचे जे नुकसान होते, त्याची नुकसान भरपाई शासनाने द्यावी. ग्रामीण भागातील शेतकरी कष्ट करून बागायती करतात, पण ऐन उत्पन्नाच्यावेळीच असे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी काय करावे? असे विचारले असता अशावेळी शासनाने शेतकऱ्यांसाठी तारणहार बनावे, असे शेतकरी गंगाराम राऊळ यांनी सांगितले.

शासन नुकसान भरपाई देईल का?; मळगावातील शेतकऱ्यांवर संकट२० ते २५ वर्षे उत्पन्न देणारी आंबा, काजू कलमे जळून खाक झाल्याने गरीब शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. याची दखल घेऊन शासन नुकसान भरपाई देईल का? की केवळ आश्वासने देणार? असा सवाल शेतकऱ्यांतून केला जात आहे.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गfireआगFarmerशेतकरी