शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

सिंधुदुर्ग : पावसाळ्यात महामार्ग होणार धोकादायक, अपघात होण्याची दाट शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 16:45 IST

महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामाचा फटका पावसाळ्यात वाहतुकीला बसण्याची शक्यता आहे. या कामासाठी महामार्गाच्या दुतर्फा असलेली माती मोठ्या प्रमाणात खणली आहे.

ठळक मुद्दे पावसाळ्यात महामार्ग होणार धोकादायक अपघात होण्याची दाट शक्यता

कणकवली : महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामाचा फटका पावसाळ्यात वाहतुकीला बसण्याची शक्यता आहे. या कामासाठी महामार्गाच्या दुतर्फा असलेली माती मोठ्या प्रमाणात खणली आहे. सिंधुदुर्गात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे चिखलमिश्रित पाणी रस्त्यावर येऊन वाहनांचा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यासाठी आतापासूनच उपाययोजना करणे गरजेचे आहे.महामार्गाचे चौपदरीकरण काम सध्या जोरदार सुरू आहे. सिंधुदुर्गातील खारेपाटण ते झाराप दरम्यान हे काम करण्यात येत आहे. महामार्गाच्या रुंदीकरणासाठी अनेक ठिकाणी दोन्ही बाजूंची झाडे तोडण्यात आली आहेत. तसेच मातीही खणण्यात आली आहे. २०१९ पर्यंत ७० टक्के काम करण्याचे आदेश कंत्राटदारांना असल्याने ते जोरदार कामाला लागले आहेत. पोकलेनच्या मदतीने रस्त्याच्या शेजारील टेकड्यांची माती काढली जात आहे.काही ठिकाणी महामार्गाच्या शेजारील भाग खोदून ठेवले आहेत. हे करताना पाणी जाण्यासाठी आवश्यक मार्ग ठेवण्यात आलेले नाहीत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असतो. या मुसळधार पावसात टेकड्या तसेच उंच भागातील पाणी वाहून रस्त्यावर येत असते.

सध्या महामार्गाचे काम सुरू असल्याने चिखलाचे पाणी थेट रस्त्यावर येणार आहे. तसेच तो चिखल रस्त्यावर साचून राहण्याची भीती आहे. यासाठी पुढील पंधरा दिवसांत पाणी वाहून जाण्यासाठी उपाययोजना करावी लागणार आहे.पाणी वाहून जाण्यासाठी उपाययोजना न केल्यास ते चिखलमिश्रित पाणी महामार्गावर येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागणार आहे. विशेषत: दुचाकी चालकांना तर मोठा त्रास होणार असून अपघात होण्याची दाट शक्यता आहे.

या अपघातात जीवितहानी होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे या शक्यतांचा विचार करून प्रशासनाने पावसाळी नियोजन करताना खबरदारी घेणे गरजेचे आहे. तसेच महामार्गाचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारांना त्वरित सूचना देणे आवश्यक आहे.

आता मे महिना संपत आला असून कोणत्याही क्षणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. साधारणत: चार महिने जोरदार पडणाऱ्या पावसात मोठी खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गroad safetyरस्ते सुरक्षाRainपाऊसhighwayमहामार्ग