शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
2
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
3
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
4
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
5
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी निस्तब्ध पडून राहिली नवी नवरी
6
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
7
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
8
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
9
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
10
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
11
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
12
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
13
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
14
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
15
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
16
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
17
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
18
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
19
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
20
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."

सिंधुदुर्ग : पालकमंत्र्यानी स्वतःच्या अकार्यक्षमतेवर केले शिक्कामोर्तब : उपरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 11:08 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे खुंटला आहे. असे वक्तव्य पालकमंत्र्यानी केले आहे. मात्र याला स्वतः तेच जबाबदार आहेत. त्यामुळेच गेली चार वर्षे माझ्यासहित विविध विरोधी पक्षानी दीपक केसरकर अकार्यक्षम पालकमंत्री असल्याचे वारंवार नमूद केले आहे. या आमच्या म्हणण्यास त्यांनीच आता दुजोरा दिला आहे.तसेच स्वतःच्या अकार्यक्षमतेवरही त्यांनी शिक्कामोर्तब केले आहे. असा टोला मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी लगावला आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यानी स्वतःच्या अकार्यक्षमतेवर केले शिक्कामोर्तब परशुराम उपरकर यांचे कणकवलीत पत्रकार परिषदेत प्रतिपादन

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे खुंटला आहे. असे वक्तव्य पालकमंत्र्यानी केले आहे. मात्र याला स्वतः तेच जबाबदार आहेत. त्यामुळेच गेली चार वर्षे माझ्यासहित विविध विरोधी पक्षानी दीपक केसरकर अकार्यक्षम पालकमंत्री असल्याचे वारंवार नमूद केले आहे. या आमच्या म्हणण्यास त्यांनीच आता दुजोरा दिला आहे.तसेच स्वतःच्या अकार्यक्षमतेवरही त्यांनी शिक्कामोर्तब केले आहे. असा टोला मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी लगावला आहे.येथील तेलीआळी मधील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर, शहराध्यक्ष शैलेंद्र नेरकर उपस्थित होते.परशुराम उपरकर म्हणाले, सावंतवाड़ी पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटनाच्या वेळी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांवर मी निर्बंध ठेवू शकत नाही. तसेच अधिकारी आपणास जुमानत नाहीत. विकासकामासाठी दिलेला निधी अधिकाऱ्यांनी खर्च न केल्याची पालकमंत्री केसरकर यांनी कबुली दिली आहे. त्यामुळे त्यांनी आता राजीनामा देवून घरी बसावे.जिल्हा विकासाचा आढावा घेऊन विकास कामे करण्याची जबाबदारी पालकमत्र्यांची असते. मात्र केसरकर यांनी तसे न करता स्वतःचा हट्ट आणि पालकमंत्री बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिल्हावासीयांना एकप्रकारे वेठीस धरले आहे. सावंतवाडी महोत्सवात मी काय चुकलो असेन तर अभिनेते नाना पाटेकर यांनी माझे कान धरावे अशी मखलाशी त्यांनी केली होती. मात्र , कान धरण्याचा अधिकार जनतेला असून आगामी निवडणुकीत मंत्री केसरकर यांना ती घरी बसविणार आहे.सिंधुदुर्गचा विकास खुंटला असून विकास कामासाठी आलेल्या निधी बाबत माहिती अधिकारात माहिती मागवीली तर निधिच आला नसल्याचे अधिकारी सांगतात. तसेच शासनाची संबधित योजनाच नसल्याचे उत्तर देतात. त्यामुळे नेमकी आकडेवारी मिळत नाही. या अधिकाऱ्यांवर पालकमंत्र्यांचा अंकुश राहिलेला नाही. त्यामुळे त्यांनी पोरखेळ चालविला आहे.मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. धूळी मुळे घशाचे, डोळ्याचे तसेच मूत्र पिंडाचे आजार होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे लोकवस्तीच्या ठिकाणी ठेकेदाराने पाणी मारून धूळ उडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. रस्त्यांवर खड्डे पडले असून त्याचाही त्रास वाहन चालकाना होत आहे. अपघात होऊ नये यासाठी कोणतीही नियंत्रण यंत्रणा नाही. वृक्षतोड़ बाबत अधिकाऱ्यांना विचारले असता त्याची माहिती दिली जात नाही.महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता जनतेशी गोड बोलून खोटी माहिती देत आहेत. फक्त आपल्या कामाचा निपटारा करण्याकडे त्यांचा कल आहे. हळूहळू पाणी टँचाई निर्माण होत असून महामार्ग कामासाठी ठेकेदाराला आवश्यक पाणी त्याने लगतच्या धरणातील वापरावे. जवळील नदीवरील पाणी वापरून जनतेला पाण्यापासुन वंचित ठेवू नये. अशा जनतेच्या विविध मागण्यांवर मनसेच्या शिष्ट मंडळाबरोबर चर्चा करण्यासाठीकसाल येथील कार्यालयात 4 जानेवारी रोजी महामार्ग प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंत्यानी उपस्थित रहावे असे पत्र आपण दिल्याचेही परशुराम उपरकर यांनी यावेळी सांगितले.अन्यथा मनसेचे आंदोलन !महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी मनसेच्या शिष्टमंडळाशी जनतेच्या समस्याबाबत चर्चा केली नाही तर कसाल येथील त्यांच्या कार्यालयावर धडक देत तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशाराही उपरकर यांनी यावेळी दिला.

टॅग्स :Parshuram Upkarपरशुराम उपरकर sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर