शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
3
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
4
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
5
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
6
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
7
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
8
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
9
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
10
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
11
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
12
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
13
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?
14
Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका
15
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
16
Vodafone-Idea च्या शेअरमध्ये मोठी घसरण, AGR प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला
17
“STकडे १३ हजार एकर लँड बँक, NAREDCOने विकासात योगदान द्यावे”; प्रताप सरनाईक यांचे आवाहन
18
पोस्ट ऑफिसची गॅरंटी! फक्त ₹५० लाखांचा विमाच नाही, 'या' स्कीममध्ये मिळतात टॅक्स आणि कर्जाचे फायदे
19
“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
20
'लडाख हिंसाचार' प्रकरणी आता मोदी सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर! दिल्लीहून एक दूत पाठवला; उपराज्यपालांनी बैठक बोलावली

सिंधुदुर्ग : पालकमंत्र्यानी स्वतःच्या अकार्यक्षमतेवर केले शिक्कामोर्तब : उपरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 11:08 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे खुंटला आहे. असे वक्तव्य पालकमंत्र्यानी केले आहे. मात्र याला स्वतः तेच जबाबदार आहेत. त्यामुळेच गेली चार वर्षे माझ्यासहित विविध विरोधी पक्षानी दीपक केसरकर अकार्यक्षम पालकमंत्री असल्याचे वारंवार नमूद केले आहे. या आमच्या म्हणण्यास त्यांनीच आता दुजोरा दिला आहे.तसेच स्वतःच्या अकार्यक्षमतेवरही त्यांनी शिक्कामोर्तब केले आहे. असा टोला मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी लगावला आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यानी स्वतःच्या अकार्यक्षमतेवर केले शिक्कामोर्तब परशुराम उपरकर यांचे कणकवलीत पत्रकार परिषदेत प्रतिपादन

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे खुंटला आहे. असे वक्तव्य पालकमंत्र्यानी केले आहे. मात्र याला स्वतः तेच जबाबदार आहेत. त्यामुळेच गेली चार वर्षे माझ्यासहित विविध विरोधी पक्षानी दीपक केसरकर अकार्यक्षम पालकमंत्री असल्याचे वारंवार नमूद केले आहे. या आमच्या म्हणण्यास त्यांनीच आता दुजोरा दिला आहे.तसेच स्वतःच्या अकार्यक्षमतेवरही त्यांनी शिक्कामोर्तब केले आहे. असा टोला मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी लगावला आहे.येथील तेलीआळी मधील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर, शहराध्यक्ष शैलेंद्र नेरकर उपस्थित होते.परशुराम उपरकर म्हणाले, सावंतवाड़ी पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटनाच्या वेळी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांवर मी निर्बंध ठेवू शकत नाही. तसेच अधिकारी आपणास जुमानत नाहीत. विकासकामासाठी दिलेला निधी अधिकाऱ्यांनी खर्च न केल्याची पालकमंत्री केसरकर यांनी कबुली दिली आहे. त्यामुळे त्यांनी आता राजीनामा देवून घरी बसावे.जिल्हा विकासाचा आढावा घेऊन विकास कामे करण्याची जबाबदारी पालकमत्र्यांची असते. मात्र केसरकर यांनी तसे न करता स्वतःचा हट्ट आणि पालकमंत्री बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिल्हावासीयांना एकप्रकारे वेठीस धरले आहे. सावंतवाडी महोत्सवात मी काय चुकलो असेन तर अभिनेते नाना पाटेकर यांनी माझे कान धरावे अशी मखलाशी त्यांनी केली होती. मात्र , कान धरण्याचा अधिकार जनतेला असून आगामी निवडणुकीत मंत्री केसरकर यांना ती घरी बसविणार आहे.सिंधुदुर्गचा विकास खुंटला असून विकास कामासाठी आलेल्या निधी बाबत माहिती अधिकारात माहिती मागवीली तर निधिच आला नसल्याचे अधिकारी सांगतात. तसेच शासनाची संबधित योजनाच नसल्याचे उत्तर देतात. त्यामुळे नेमकी आकडेवारी मिळत नाही. या अधिकाऱ्यांवर पालकमंत्र्यांचा अंकुश राहिलेला नाही. त्यामुळे त्यांनी पोरखेळ चालविला आहे.मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. धूळी मुळे घशाचे, डोळ्याचे तसेच मूत्र पिंडाचे आजार होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे लोकवस्तीच्या ठिकाणी ठेकेदाराने पाणी मारून धूळ उडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. रस्त्यांवर खड्डे पडले असून त्याचाही त्रास वाहन चालकाना होत आहे. अपघात होऊ नये यासाठी कोणतीही नियंत्रण यंत्रणा नाही. वृक्षतोड़ बाबत अधिकाऱ्यांना विचारले असता त्याची माहिती दिली जात नाही.महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता जनतेशी गोड बोलून खोटी माहिती देत आहेत. फक्त आपल्या कामाचा निपटारा करण्याकडे त्यांचा कल आहे. हळूहळू पाणी टँचाई निर्माण होत असून महामार्ग कामासाठी ठेकेदाराला आवश्यक पाणी त्याने लगतच्या धरणातील वापरावे. जवळील नदीवरील पाणी वापरून जनतेला पाण्यापासुन वंचित ठेवू नये. अशा जनतेच्या विविध मागण्यांवर मनसेच्या शिष्ट मंडळाबरोबर चर्चा करण्यासाठीकसाल येथील कार्यालयात 4 जानेवारी रोजी महामार्ग प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंत्यानी उपस्थित रहावे असे पत्र आपण दिल्याचेही परशुराम उपरकर यांनी यावेळी सांगितले.अन्यथा मनसेचे आंदोलन !महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी मनसेच्या शिष्टमंडळाशी जनतेच्या समस्याबाबत चर्चा केली नाही तर कसाल येथील त्यांच्या कार्यालयावर धडक देत तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशाराही उपरकर यांनी यावेळी दिला.

टॅग्स :Parshuram Upkarपरशुराम उपरकर sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर