शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाने केली मोठी खेळी, ठाकरेंचे बहुसंख्य उमेदवार ठरले असते बाद; पण ऐनवेळी डाव उलटला अन्...
2
ठाण्यात शिंदेसेनेने जागा वाटपामध्ये भाजपचा केला ‘करेक्ट कार्यक्रम’; 'त्या' नऊ जागा बांधल्या भाजपच्या गळ्यात 
3
"तर आम्ही कुठल्याही थराला जाऊ"; नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानच्या असीम मुनीरचा इशारा
4
मनसेच्या मुंबईतील उमेदवारांना राज ठाकरेंचा मोलाचा सल्ला, म्हणाले, ‘तुम्हाला ऑफर येतील, पण…’
5
'ऑपरेशन सिंदूर सुरूच...' लष्करप्रमुख जनरल द्विवेदी यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानला करून दिली आठवण
6
"जितकी मिरची ठाकरे गटाला...", नितेश राणेंचा उद्धवसेनेवर हल्ला, 'उत्तर भारतीय महौपार' मुद्द्यावर काय बोलले?
7
Gold Silver Price Today: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, चेक करा १८ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
8
टॅरिफमुळे US ची किती कमाई? "टीका करणारे मुर्ख" असं म्हणणारे ट्रम्प प्रत्येकाला $२००० देण्याचं वचन पूर्ण करणार का?
9
शिंदेसेनेला धक्का, पाच उमेदवारी अर्ज बाद; एबी फॉर्मवर खाडाखोड, झेरॉक्स जोडल्याने ठरले अवैध
10
बांगलादेशी खेळाडूंसाठी आयपीएलचे दरवाजे बंद होणार? मुस्तफिजुर रहमानसाठी शाहरुखच्या संघाने ९ कोटी मोजले...
11
२०२६ मध्ये या ५ राज्यात रंगणार सत्तेचा सारीपाट, बाजी कोण मारणार, NDA की ‘INDIA’?
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचे पडसाद! 'या' दोन देशांनी अमेरिकन नागरिकांच्या प्रवेशावर घातली बंदी
13
जळगावात भाजपाला धक्का, माजी महापौरांचा अर्ज बाद; AB फॉर्ममधील त्रुटीचा उद्धवसेनेलाही फटका
14
Healthy Diet: अन्न तेच पण पद्धत वेगळी! जपानी लोक लठ्ठ का होत नाहीत? त्यामागे आहेत ५ सिक्रेट 
15
कोकण गाजवल्यावर शिंदेचा फायर ब्रँड नेता मुंबईत; ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात दिली मोठी जबाबदारी
16
“आम्ही दोघं राजा-राणी…” विरुष्काचं प्रेम अन् MS धोनी–साक्षीची ‘राजकुमारी’सोबतची खास फ्रेम चर्चेत
17
भारताची चीनवर कडी...! 'या' उत्पादनातही मागे टाकलं; ड्रॅगनची चिंता वाढली
18
Nashik Municipal Corporation Election : डबल एबी फॉर्म अन् बडगुजरांचा ट्रिपल धमाका; आमदार सीमा हिरेंसह भाजपला धक्का
19
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
20
उड्डाणापूर्वी एअर इंडियाचा पायलट दारू प्यायला; अधिकाऱ्यांनी घेतले ताब्यात, DGCA कारवाई करणार
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : पालकमंत्र्यानी स्वतःच्या अकार्यक्षमतेवर केले शिक्कामोर्तब : उपरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 11:08 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे खुंटला आहे. असे वक्तव्य पालकमंत्र्यानी केले आहे. मात्र याला स्वतः तेच जबाबदार आहेत. त्यामुळेच गेली चार वर्षे माझ्यासहित विविध विरोधी पक्षानी दीपक केसरकर अकार्यक्षम पालकमंत्री असल्याचे वारंवार नमूद केले आहे. या आमच्या म्हणण्यास त्यांनीच आता दुजोरा दिला आहे.तसेच स्वतःच्या अकार्यक्षमतेवरही त्यांनी शिक्कामोर्तब केले आहे. असा टोला मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी लगावला आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यानी स्वतःच्या अकार्यक्षमतेवर केले शिक्कामोर्तब परशुराम उपरकर यांचे कणकवलीत पत्रकार परिषदेत प्रतिपादन

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे खुंटला आहे. असे वक्तव्य पालकमंत्र्यानी केले आहे. मात्र याला स्वतः तेच जबाबदार आहेत. त्यामुळेच गेली चार वर्षे माझ्यासहित विविध विरोधी पक्षानी दीपक केसरकर अकार्यक्षम पालकमंत्री असल्याचे वारंवार नमूद केले आहे. या आमच्या म्हणण्यास त्यांनीच आता दुजोरा दिला आहे.तसेच स्वतःच्या अकार्यक्षमतेवरही त्यांनी शिक्कामोर्तब केले आहे. असा टोला मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी लगावला आहे.येथील तेलीआळी मधील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर, शहराध्यक्ष शैलेंद्र नेरकर उपस्थित होते.परशुराम उपरकर म्हणाले, सावंतवाड़ी पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटनाच्या वेळी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांवर मी निर्बंध ठेवू शकत नाही. तसेच अधिकारी आपणास जुमानत नाहीत. विकासकामासाठी दिलेला निधी अधिकाऱ्यांनी खर्च न केल्याची पालकमंत्री केसरकर यांनी कबुली दिली आहे. त्यामुळे त्यांनी आता राजीनामा देवून घरी बसावे.जिल्हा विकासाचा आढावा घेऊन विकास कामे करण्याची जबाबदारी पालकमत्र्यांची असते. मात्र केसरकर यांनी तसे न करता स्वतःचा हट्ट आणि पालकमंत्री बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिल्हावासीयांना एकप्रकारे वेठीस धरले आहे. सावंतवाडी महोत्सवात मी काय चुकलो असेन तर अभिनेते नाना पाटेकर यांनी माझे कान धरावे अशी मखलाशी त्यांनी केली होती. मात्र , कान धरण्याचा अधिकार जनतेला असून आगामी निवडणुकीत मंत्री केसरकर यांना ती घरी बसविणार आहे.सिंधुदुर्गचा विकास खुंटला असून विकास कामासाठी आलेल्या निधी बाबत माहिती अधिकारात माहिती मागवीली तर निधिच आला नसल्याचे अधिकारी सांगतात. तसेच शासनाची संबधित योजनाच नसल्याचे उत्तर देतात. त्यामुळे नेमकी आकडेवारी मिळत नाही. या अधिकाऱ्यांवर पालकमंत्र्यांचा अंकुश राहिलेला नाही. त्यामुळे त्यांनी पोरखेळ चालविला आहे.मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. धूळी मुळे घशाचे, डोळ्याचे तसेच मूत्र पिंडाचे आजार होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे लोकवस्तीच्या ठिकाणी ठेकेदाराने पाणी मारून धूळ उडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. रस्त्यांवर खड्डे पडले असून त्याचाही त्रास वाहन चालकाना होत आहे. अपघात होऊ नये यासाठी कोणतीही नियंत्रण यंत्रणा नाही. वृक्षतोड़ बाबत अधिकाऱ्यांना विचारले असता त्याची माहिती दिली जात नाही.महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता जनतेशी गोड बोलून खोटी माहिती देत आहेत. फक्त आपल्या कामाचा निपटारा करण्याकडे त्यांचा कल आहे. हळूहळू पाणी टँचाई निर्माण होत असून महामार्ग कामासाठी ठेकेदाराला आवश्यक पाणी त्याने लगतच्या धरणातील वापरावे. जवळील नदीवरील पाणी वापरून जनतेला पाण्यापासुन वंचित ठेवू नये. अशा जनतेच्या विविध मागण्यांवर मनसेच्या शिष्ट मंडळाबरोबर चर्चा करण्यासाठीकसाल येथील कार्यालयात 4 जानेवारी रोजी महामार्ग प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंत्यानी उपस्थित रहावे असे पत्र आपण दिल्याचेही परशुराम उपरकर यांनी यावेळी सांगितले.अन्यथा मनसेचे आंदोलन !महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी मनसेच्या शिष्टमंडळाशी जनतेच्या समस्याबाबत चर्चा केली नाही तर कसाल येथील त्यांच्या कार्यालयावर धडक देत तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशाराही उपरकर यांनी यावेळी दिला.

टॅग्स :Parshuram Upkarपरशुराम उपरकर sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर