शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

सिंधुदुर्ग : पालकमंत्र्यानी स्वतःच्या अकार्यक्षमतेवर केले शिक्कामोर्तब : उपरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 11:08 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे खुंटला आहे. असे वक्तव्य पालकमंत्र्यानी केले आहे. मात्र याला स्वतः तेच जबाबदार आहेत. त्यामुळेच गेली चार वर्षे माझ्यासहित विविध विरोधी पक्षानी दीपक केसरकर अकार्यक्षम पालकमंत्री असल्याचे वारंवार नमूद केले आहे. या आमच्या म्हणण्यास त्यांनीच आता दुजोरा दिला आहे.तसेच स्वतःच्या अकार्यक्षमतेवरही त्यांनी शिक्कामोर्तब केले आहे. असा टोला मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी लगावला आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यानी स्वतःच्या अकार्यक्षमतेवर केले शिक्कामोर्तब परशुराम उपरकर यांचे कणकवलीत पत्रकार परिषदेत प्रतिपादन

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे खुंटला आहे. असे वक्तव्य पालकमंत्र्यानी केले आहे. मात्र याला स्वतः तेच जबाबदार आहेत. त्यामुळेच गेली चार वर्षे माझ्यासहित विविध विरोधी पक्षानी दीपक केसरकर अकार्यक्षम पालकमंत्री असल्याचे वारंवार नमूद केले आहे. या आमच्या म्हणण्यास त्यांनीच आता दुजोरा दिला आहे.तसेच स्वतःच्या अकार्यक्षमतेवरही त्यांनी शिक्कामोर्तब केले आहे. असा टोला मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी लगावला आहे.येथील तेलीआळी मधील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर, शहराध्यक्ष शैलेंद्र नेरकर उपस्थित होते.परशुराम उपरकर म्हणाले, सावंतवाड़ी पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटनाच्या वेळी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांवर मी निर्बंध ठेवू शकत नाही. तसेच अधिकारी आपणास जुमानत नाहीत. विकासकामासाठी दिलेला निधी अधिकाऱ्यांनी खर्च न केल्याची पालकमंत्री केसरकर यांनी कबुली दिली आहे. त्यामुळे त्यांनी आता राजीनामा देवून घरी बसावे.जिल्हा विकासाचा आढावा घेऊन विकास कामे करण्याची जबाबदारी पालकमत्र्यांची असते. मात्र केसरकर यांनी तसे न करता स्वतःचा हट्ट आणि पालकमंत्री बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिल्हावासीयांना एकप्रकारे वेठीस धरले आहे. सावंतवाडी महोत्सवात मी काय चुकलो असेन तर अभिनेते नाना पाटेकर यांनी माझे कान धरावे अशी मखलाशी त्यांनी केली होती. मात्र , कान धरण्याचा अधिकार जनतेला असून आगामी निवडणुकीत मंत्री केसरकर यांना ती घरी बसविणार आहे.सिंधुदुर्गचा विकास खुंटला असून विकास कामासाठी आलेल्या निधी बाबत माहिती अधिकारात माहिती मागवीली तर निधिच आला नसल्याचे अधिकारी सांगतात. तसेच शासनाची संबधित योजनाच नसल्याचे उत्तर देतात. त्यामुळे नेमकी आकडेवारी मिळत नाही. या अधिकाऱ्यांवर पालकमंत्र्यांचा अंकुश राहिलेला नाही. त्यामुळे त्यांनी पोरखेळ चालविला आहे.मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. धूळी मुळे घशाचे, डोळ्याचे तसेच मूत्र पिंडाचे आजार होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे लोकवस्तीच्या ठिकाणी ठेकेदाराने पाणी मारून धूळ उडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. रस्त्यांवर खड्डे पडले असून त्याचाही त्रास वाहन चालकाना होत आहे. अपघात होऊ नये यासाठी कोणतीही नियंत्रण यंत्रणा नाही. वृक्षतोड़ बाबत अधिकाऱ्यांना विचारले असता त्याची माहिती दिली जात नाही.महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता जनतेशी गोड बोलून खोटी माहिती देत आहेत. फक्त आपल्या कामाचा निपटारा करण्याकडे त्यांचा कल आहे. हळूहळू पाणी टँचाई निर्माण होत असून महामार्ग कामासाठी ठेकेदाराला आवश्यक पाणी त्याने लगतच्या धरणातील वापरावे. जवळील नदीवरील पाणी वापरून जनतेला पाण्यापासुन वंचित ठेवू नये. अशा जनतेच्या विविध मागण्यांवर मनसेच्या शिष्ट मंडळाबरोबर चर्चा करण्यासाठीकसाल येथील कार्यालयात 4 जानेवारी रोजी महामार्ग प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंत्यानी उपस्थित रहावे असे पत्र आपण दिल्याचेही परशुराम उपरकर यांनी यावेळी सांगितले.अन्यथा मनसेचे आंदोलन !महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी मनसेच्या शिष्टमंडळाशी जनतेच्या समस्याबाबत चर्चा केली नाही तर कसाल येथील त्यांच्या कार्यालयावर धडक देत तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशाराही उपरकर यांनी यावेळी दिला.

टॅग्स :Parshuram Upkarपरशुराम उपरकर sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर