शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

 सिंधुदुर्ग : अतिरेकी मासेमारीच्या जाचातून मुक्त करण्याची मच्छिमारांची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 16:16 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभलेल्या १२१ किलोमीटर किनारपट्टीला संघर्षाची किनार लाभली आहे. पारंपरिक मच्छिमार आणि यांत्रिकी मासेमारी यांच्यात गेले एक दशक तीव्र लढा उभा राहिला. मच्छिमारांच्या लढ्याला कालसापेक्ष राजकीय मंडळींनी पाठिंबा देत पाठीशी असल्याचे भासवले जाते.

ठळक मुद्देअतिरेकी मासेमारीच्या जाचातून मुक्त करण्याची मच्छिमारांची भावनासिंधुदुर्गमधील १२१ किलोमीटरच्या किनारपट्टीला संघर्षाची किनारमासेमारी अध्यादेशाच्या कठोर अंमलबजावणीची गरज, सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षा

सिद्धेश आचरेकर 

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभलेल्या १२१ किलोमीटर किनारपट्टीला संघर्षाची किनार लाभली आहे. पारंपरिक मच्छिमार आणि यांत्रिकी मासेमारी यांच्यात गेले एक दशक तीव्र लढा उभा राहिला. मच्छिमारांच्या लढ्याला कालसापेक्ष राजकीय मंडळींनी पाठिंबा देत पाठीशी असल्याचे भासवले जाते.

सत्ताधारी भाजप-शिवसेना युती शासनाकडून राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात घुसखोरी करणाऱ्या परप्रांतीय नौकांना आवर घालण्यात यश आले नाही. त्यामुळे शासनाने मासेमारी अधिनियम कायद्यात सुधारणा करून पर्ससीन व हायस्पीड मासेमारीवर कठोर पावले उचलली गेली पाहिजेत.अतिरेकी मासेमारी स्थानिक मच्छिमारांच्या तोंडचा घास हिरावून नेत असल्याने पारंपरिक मच्छिमारांनी लढा उभा केला. न्यायासाठी आंदोलने केली. कधी कायदा हातात घेतला तर कधी कायद्याच्या धाकाखाली त्यांच्यावर बंधने लादण्यात आली. असे होत असताना परराज्यातील नौकाधारकांना मात्र सिंधुदुर्ग किनारपट्टीवर धिंगाणा घालण्याची नामी संधी मिळाली.

मच्छिमारांच्या लढ्याचे राजकीय भांडवल करणाऱ्या राजकीय नेत्यांच्या इच्छाशक्तीच्या अभावामुळे मच्छिमार लढ्याचे मोठे नुकसान झाले. आज न्याय मिळेल, उद्या न्याय मिळेल या भावनेतून मच्छिमार बांधव राज्यकर्त्यांवर अवलंबून राहिले. मात्र त्यांना अपेक्षित न्याय मिळवून देण्यास सत्ताधारी अपयशीच ठरले आहेत.मच्छिमार जेव्हा कायदा हातात घेण्याची भाषा करतात तेव्हा त्यांच्या संयमाचा अंत झालेला असतो. त्यांना मासेमारी व्यवसायाचे नुकसान करून आंदोलने करायची हौस नसते. तरी देखील प्रशासनाकडून सागरी हद्दीत अनधिकृत मासेमारी करत असणाऱ्या नौकांवर कारवाई केली न गेल्यास संघर्ष पेटतो.

यात मच्छिमार समाज भरडला जातो. अशावेळी राजकीय नेत्यांना राजकारण करण्याचे आयते कोलीत मिळाल्यागत ते त्याचा बाऊ करतात. ह्यआमच्या लढ्याचे नेतृत्व कोणीही करा, पण आम्हांला अतिरेकी मासेमारीच्या जाचातून मुक्त करताना मत्स्य संपदेचेही संवर्धन कराह्ण, अशा भावना मच्छिमारांच्या झाल्या आहेत.चौकटअंमलबजावणीस चालढकलपणाकोकण किनारपट्टीवरील अतिरेकी मासेमारी रोखण्यास मत्स्य व्यवसाय विभागाची मानसिकता दिसून येत नाही. मुख्यमंत्र्यांनी पारित केलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणी केली गेल्यास परराज्यातील नौकांच्या घुसखोरीला चाप बसेल. मात्र कायद्याची अंमलबजावणी करण्यास प्रशासन चालढकलपणा करून वेळकाढू धोरण अवलंबित असल्याचा आरोप मच्छिमारांमधून होत आहे. सरकारने अनधिकृत मासेमारीवर कायद्याचा बडगा उगारण्यासाठी प्रशासनाची मानसिकता बदलणे आवश्यक बनले आहे.बैठका, आदेशांचे पुढे काय ?मच्छिमारांचा संघर्ष पेटल्यानंतर राजकीय पक्षांच्या स्थानिक नेतेमंडळींकडून मंत्र्यांच्या भेटीगाठी सुरू होतात. अतिरेकी मासेमारी रोखण्यासाठी बैठका घेतल्या जातात. मंत्री संबंधित विभागाला कारवाईचे आदेश देतात. यातून मच्छिमारांना त्यावेळी दिलासा मिळतो.सरकारकडून ठोस काहीतरी उपाययोजना केल्या जातील, अशी आशा वाटू लागते. पण असे काहीच न होता मच्छिमारांच्या पदरात निराशाच पडते. केंद्रीय हवाई उड्डाणमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे एलईडी मासेमारी व हायस्पीडबाबत उच्चस्तरीय बैठक झाली होती.यात मत्स्य विभागासह कोस्टगार्ड विभागाला कारवाई करण्याच्या सूचना होत्या. तर राज्याचे पर्यावरण मंत्री, मत्स्योद्योगमंत्री यांचेही लक्ष वेधून कारवाईच्यावेळी प्रशासन कमी पडत आहे. येणाऱ्या काळात मच्छिमारांना जे नेते न्याय मिळवून देतील, तसेच मासेमारी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यास शासनाला भाग पाडतील, त्यांच्याच मागे मच्छिमार समाज राहणार आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गfishermanमच्छीमार