शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

 सिंधुदुर्ग : अतिरेकी मासेमारीच्या जाचातून मुक्त करण्याची मच्छिमारांची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 16:16 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभलेल्या १२१ किलोमीटर किनारपट्टीला संघर्षाची किनार लाभली आहे. पारंपरिक मच्छिमार आणि यांत्रिकी मासेमारी यांच्यात गेले एक दशक तीव्र लढा उभा राहिला. मच्छिमारांच्या लढ्याला कालसापेक्ष राजकीय मंडळींनी पाठिंबा देत पाठीशी असल्याचे भासवले जाते.

ठळक मुद्देअतिरेकी मासेमारीच्या जाचातून मुक्त करण्याची मच्छिमारांची भावनासिंधुदुर्गमधील १२१ किलोमीटरच्या किनारपट्टीला संघर्षाची किनारमासेमारी अध्यादेशाच्या कठोर अंमलबजावणीची गरज, सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षा

सिद्धेश आचरेकर 

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभलेल्या १२१ किलोमीटर किनारपट्टीला संघर्षाची किनार लाभली आहे. पारंपरिक मच्छिमार आणि यांत्रिकी मासेमारी यांच्यात गेले एक दशक तीव्र लढा उभा राहिला. मच्छिमारांच्या लढ्याला कालसापेक्ष राजकीय मंडळींनी पाठिंबा देत पाठीशी असल्याचे भासवले जाते.

सत्ताधारी भाजप-शिवसेना युती शासनाकडून राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात घुसखोरी करणाऱ्या परप्रांतीय नौकांना आवर घालण्यात यश आले नाही. त्यामुळे शासनाने मासेमारी अधिनियम कायद्यात सुधारणा करून पर्ससीन व हायस्पीड मासेमारीवर कठोर पावले उचलली गेली पाहिजेत.अतिरेकी मासेमारी स्थानिक मच्छिमारांच्या तोंडचा घास हिरावून नेत असल्याने पारंपरिक मच्छिमारांनी लढा उभा केला. न्यायासाठी आंदोलने केली. कधी कायदा हातात घेतला तर कधी कायद्याच्या धाकाखाली त्यांच्यावर बंधने लादण्यात आली. असे होत असताना परराज्यातील नौकाधारकांना मात्र सिंधुदुर्ग किनारपट्टीवर धिंगाणा घालण्याची नामी संधी मिळाली.

मच्छिमारांच्या लढ्याचे राजकीय भांडवल करणाऱ्या राजकीय नेत्यांच्या इच्छाशक्तीच्या अभावामुळे मच्छिमार लढ्याचे मोठे नुकसान झाले. आज न्याय मिळेल, उद्या न्याय मिळेल या भावनेतून मच्छिमार बांधव राज्यकर्त्यांवर अवलंबून राहिले. मात्र त्यांना अपेक्षित न्याय मिळवून देण्यास सत्ताधारी अपयशीच ठरले आहेत.मच्छिमार जेव्हा कायदा हातात घेण्याची भाषा करतात तेव्हा त्यांच्या संयमाचा अंत झालेला असतो. त्यांना मासेमारी व्यवसायाचे नुकसान करून आंदोलने करायची हौस नसते. तरी देखील प्रशासनाकडून सागरी हद्दीत अनधिकृत मासेमारी करत असणाऱ्या नौकांवर कारवाई केली न गेल्यास संघर्ष पेटतो.

यात मच्छिमार समाज भरडला जातो. अशावेळी राजकीय नेत्यांना राजकारण करण्याचे आयते कोलीत मिळाल्यागत ते त्याचा बाऊ करतात. ह्यआमच्या लढ्याचे नेतृत्व कोणीही करा, पण आम्हांला अतिरेकी मासेमारीच्या जाचातून मुक्त करताना मत्स्य संपदेचेही संवर्धन कराह्ण, अशा भावना मच्छिमारांच्या झाल्या आहेत.चौकटअंमलबजावणीस चालढकलपणाकोकण किनारपट्टीवरील अतिरेकी मासेमारी रोखण्यास मत्स्य व्यवसाय विभागाची मानसिकता दिसून येत नाही. मुख्यमंत्र्यांनी पारित केलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणी केली गेल्यास परराज्यातील नौकांच्या घुसखोरीला चाप बसेल. मात्र कायद्याची अंमलबजावणी करण्यास प्रशासन चालढकलपणा करून वेळकाढू धोरण अवलंबित असल्याचा आरोप मच्छिमारांमधून होत आहे. सरकारने अनधिकृत मासेमारीवर कायद्याचा बडगा उगारण्यासाठी प्रशासनाची मानसिकता बदलणे आवश्यक बनले आहे.बैठका, आदेशांचे पुढे काय ?मच्छिमारांचा संघर्ष पेटल्यानंतर राजकीय पक्षांच्या स्थानिक नेतेमंडळींकडून मंत्र्यांच्या भेटीगाठी सुरू होतात. अतिरेकी मासेमारी रोखण्यासाठी बैठका घेतल्या जातात. मंत्री संबंधित विभागाला कारवाईचे आदेश देतात. यातून मच्छिमारांना त्यावेळी दिलासा मिळतो.सरकारकडून ठोस काहीतरी उपाययोजना केल्या जातील, अशी आशा वाटू लागते. पण असे काहीच न होता मच्छिमारांच्या पदरात निराशाच पडते. केंद्रीय हवाई उड्डाणमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे एलईडी मासेमारी व हायस्पीडबाबत उच्चस्तरीय बैठक झाली होती.यात मत्स्य विभागासह कोस्टगार्ड विभागाला कारवाई करण्याच्या सूचना होत्या. तर राज्याचे पर्यावरण मंत्री, मत्स्योद्योगमंत्री यांचेही लक्ष वेधून कारवाईच्यावेळी प्रशासन कमी पडत आहे. येणाऱ्या काळात मच्छिमारांना जे नेते न्याय मिळवून देतील, तसेच मासेमारी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यास शासनाला भाग पाडतील, त्यांच्याच मागे मच्छिमार समाज राहणार आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गfishermanमच्छीमार