शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सिंधुदुर्ग : शैक्षणिक संकुलातील राड्यात आठ जखमी, वैभववाडी तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 15:33 IST

वैभववाडी तालुक्यातील एका मोठ्या शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांमधील धुमसणारे रॅगिंग उफाळल्याने मंगळवारी सकाळी दोन गटात राडा झाला. सोमवारी रात्री दोनवेळा हाणामारी झाल्यानंतर सकाळी साडेआठच्या सुमारास दोन्ही गटाचे सव्वाशे-दीडशे विद्यार्थी लोखंडी सळ्या, विटा, दगड आणि बांबू घेऊन भिडले. त्यामध्ये आठ जण जखमी झाले. जखमींवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार केले. मात्र, दुपारपर्यंत पोलीस ठाण्यात घुटमळणाऱ्या जखमींपैकी कुणीही तक्रार न दिल्याने या गंभीर प्रकारावर पडदा टाकण्यात आला आहे.

ठळक मुद्देशैक्षणिक संकुलातील राड्यात आठ जखमी, वैभववाडी तालुक्यातील घटना  ग्रामीण रुग्णालयात उपचार; तक्रार देण्यास गेलेले विद्यार्थी माघारी परतले

सिंधुदुर्ग : वैभववाडी तालुक्यातील एका मोठ्या शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांमधील धुमसणारे रॅगिंग उफाळल्याने मंगळवारी सकाळी दोन गटात राडा झाला.

सोमवारी रात्री दोनवेळा हाणामारी झाल्यानंतर सकाळी साडेआठच्या सुमारास दोन्ही गटाचे सव्वाशे-दीडशे विद्यार्थी लोखंडी सळ्या, विटा, दगड आणि बांबू घेऊन भिडले. त्यामध्ये आठ जण जखमी झाले.

जखमींवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार केले. मात्र, दुपारपर्यंत पोलीस ठाण्यात घुटमळणाऱ्या जखमींपैकी कुणीही तक्रार न दिल्याने या गंभीर प्रकारावर पडदा टाकण्यात आला आहे.मंगळवारी सकाळी शैक्षणिक संकुलाच्या परिसरातील राड्यात सोहम सुनील ऐनवडे (१९), सचिन उत्तम देशमुख (१९), अथर्व संजय लोणकर (१९), दिग्विजय संजय देवकर (१९), सचिन दिनकर गायकवाड (२१), मोसम अंकुश पोरे (२०), उमेश दिलीप पवार (२०), अर्जुन अरुण हाके (२०) हे आठ विद्यार्थी जखमी झाले. त्यांच्यापैकी दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून सोडले आहे.तालुक्यातील सर्वात मोठ्या शैक्षणिक संकुलात महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश केरळमधील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी काही विद्यार्थी संकुलाच्या वसतिगृहात तर काही वैभववाडी शहर व परिसरात राहतात. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांमध्ये अधूनमधून वादाची ठिणगी पडते.

सध्या या शैक्षणिक संकुलात कोल्हापूर आणि सोलापूर असा प्रांतिक वर्चस्वाचा वाद कित्येक महिन्यांपासून धुमसत आहे. या वादातून दोन महिन्यांपूर्वी रात्रीच्या वेळी दोन गटात हाणामाऱ्या झाल्या होत्या. मात्र, त्यावेळीही प्रकरणावर पडदा टाकण्यात आला होता. त्याचा परिणाम राड्यात झाला.कोल्हापूर आणि सोलापूर या प्रांतिक वर्चस्वाच्या वादातून सोमवारी रात्री ९.३० च्या सुमारास ठिणगी पडली. त्यावेळी किरकोळ हाणामारी होऊन प्रकरण शमले. मात्र, हा प्रकार वैभववाडी शहरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना समजताच बाजारपेठेतील विद्यार्थ्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास वसतिगृह गाठून जाब विचारत मारहाण सुरू केली. त्यावेळी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनीच मध्यस्थी करून हाणामाऱ्या थांबविल्या. त्यानंतर मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुफान राडा झाला.तक्रार नोंदवून न घेण्यासाठी एका खासदाराचा फोनशैक्षणिक संकुलातील राड्यात गंभीर जखमी झालेले विद्यार्थी तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असताना सकाळी १०.३० च्या सुमारास कोल्हापूरहून एका खासदारांचा पोलिसांना फोन आला होता. त्या खासदार महोदयांनी तुम्ही तक्रार घेऊ नका, आम्ही आपसात मिटवून घेतो, असे पोलिसांना सांगितल्याचे ऐकायला मिळते.मस्ती करताना जिन्यावरून पडलोसततच्या हाणामाऱ्यांनी त्रस्त झाल्यामुळे व्यवस्थापनातील दोघांनी मंगळवारी अकराच्या सुमारास पोलीस ठाणे गाठले. त्यामुळे या राड्याची तक्रार दाखल होईल अशी शक्यता निर्माण झाली होती. परंतु, अचानक काही चक्रे फिरली आणि एकाही विद्यार्थ्याची तक्रार नसताना पोलिसांनी चक्क आपण मस्ती करताना जिन्यावरुन पडून डोक्याला गंभीर दुखापत झाली. मात्र, कुणाविरुद्ध आपली तक्रार नाही असा कबुली जबाब एका विद्यार्थ्याकडून लिहून घेतल्याचे उघड झाले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrimeगुन्हाStudentविद्यार्थी