शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

सिंधुदुर्ग : शैक्षणिक संकुलातील राड्यात आठ जखमी, वैभववाडी तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 15:33 IST

वैभववाडी तालुक्यातील एका मोठ्या शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांमधील धुमसणारे रॅगिंग उफाळल्याने मंगळवारी सकाळी दोन गटात राडा झाला. सोमवारी रात्री दोनवेळा हाणामारी झाल्यानंतर सकाळी साडेआठच्या सुमारास दोन्ही गटाचे सव्वाशे-दीडशे विद्यार्थी लोखंडी सळ्या, विटा, दगड आणि बांबू घेऊन भिडले. त्यामध्ये आठ जण जखमी झाले. जखमींवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार केले. मात्र, दुपारपर्यंत पोलीस ठाण्यात घुटमळणाऱ्या जखमींपैकी कुणीही तक्रार न दिल्याने या गंभीर प्रकारावर पडदा टाकण्यात आला आहे.

ठळक मुद्देशैक्षणिक संकुलातील राड्यात आठ जखमी, वैभववाडी तालुक्यातील घटना  ग्रामीण रुग्णालयात उपचार; तक्रार देण्यास गेलेले विद्यार्थी माघारी परतले

सिंधुदुर्ग : वैभववाडी तालुक्यातील एका मोठ्या शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांमधील धुमसणारे रॅगिंग उफाळल्याने मंगळवारी सकाळी दोन गटात राडा झाला.

सोमवारी रात्री दोनवेळा हाणामारी झाल्यानंतर सकाळी साडेआठच्या सुमारास दोन्ही गटाचे सव्वाशे-दीडशे विद्यार्थी लोखंडी सळ्या, विटा, दगड आणि बांबू घेऊन भिडले. त्यामध्ये आठ जण जखमी झाले.

जखमींवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार केले. मात्र, दुपारपर्यंत पोलीस ठाण्यात घुटमळणाऱ्या जखमींपैकी कुणीही तक्रार न दिल्याने या गंभीर प्रकारावर पडदा टाकण्यात आला आहे.मंगळवारी सकाळी शैक्षणिक संकुलाच्या परिसरातील राड्यात सोहम सुनील ऐनवडे (१९), सचिन उत्तम देशमुख (१९), अथर्व संजय लोणकर (१९), दिग्विजय संजय देवकर (१९), सचिन दिनकर गायकवाड (२१), मोसम अंकुश पोरे (२०), उमेश दिलीप पवार (२०), अर्जुन अरुण हाके (२०) हे आठ विद्यार्थी जखमी झाले. त्यांच्यापैकी दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून सोडले आहे.तालुक्यातील सर्वात मोठ्या शैक्षणिक संकुलात महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश केरळमधील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी काही विद्यार्थी संकुलाच्या वसतिगृहात तर काही वैभववाडी शहर व परिसरात राहतात. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांमध्ये अधूनमधून वादाची ठिणगी पडते.

सध्या या शैक्षणिक संकुलात कोल्हापूर आणि सोलापूर असा प्रांतिक वर्चस्वाचा वाद कित्येक महिन्यांपासून धुमसत आहे. या वादातून दोन महिन्यांपूर्वी रात्रीच्या वेळी दोन गटात हाणामाऱ्या झाल्या होत्या. मात्र, त्यावेळीही प्रकरणावर पडदा टाकण्यात आला होता. त्याचा परिणाम राड्यात झाला.कोल्हापूर आणि सोलापूर या प्रांतिक वर्चस्वाच्या वादातून सोमवारी रात्री ९.३० च्या सुमारास ठिणगी पडली. त्यावेळी किरकोळ हाणामारी होऊन प्रकरण शमले. मात्र, हा प्रकार वैभववाडी शहरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना समजताच बाजारपेठेतील विद्यार्थ्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास वसतिगृह गाठून जाब विचारत मारहाण सुरू केली. त्यावेळी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनीच मध्यस्थी करून हाणामाऱ्या थांबविल्या. त्यानंतर मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुफान राडा झाला.तक्रार नोंदवून न घेण्यासाठी एका खासदाराचा फोनशैक्षणिक संकुलातील राड्यात गंभीर जखमी झालेले विद्यार्थी तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असताना सकाळी १०.३० च्या सुमारास कोल्हापूरहून एका खासदारांचा पोलिसांना फोन आला होता. त्या खासदार महोदयांनी तुम्ही तक्रार घेऊ नका, आम्ही आपसात मिटवून घेतो, असे पोलिसांना सांगितल्याचे ऐकायला मिळते.मस्ती करताना जिन्यावरून पडलोसततच्या हाणामाऱ्यांनी त्रस्त झाल्यामुळे व्यवस्थापनातील दोघांनी मंगळवारी अकराच्या सुमारास पोलीस ठाणे गाठले. त्यामुळे या राड्याची तक्रार दाखल होईल अशी शक्यता निर्माण झाली होती. परंतु, अचानक काही चक्रे फिरली आणि एकाही विद्यार्थ्याची तक्रार नसताना पोलिसांनी चक्क आपण मस्ती करताना जिन्यावरुन पडून डोक्याला गंभीर दुखापत झाली. मात्र, कुणाविरुद्ध आपली तक्रार नाही असा कबुली जबाब एका विद्यार्थ्याकडून लिहून घेतल्याचे उघड झाले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrimeगुन्हाStudentविद्यार्थी