शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

शिमग्याआधीच राजकीय धुळवड

By admin | Updated: February 2, 2015 00:08 IST

नेतृत्वाचा लागणार कस : इनकमिंग वाढल्याने सेनेत अस्वस्थता

प्रकाश काळे - वैभववाडी -शिवबंधनासाठी आतुरलेल्या विविध पक्षांतील कार्यकर्त्यांची तालुक्यात संख्या मोठी असताना लोके, सावंत, रावराणे सेनावासी झाले. त्यामुळे आगामी काळात कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीतून मोठ्या प्रमाणात आऊटगोर्इंग होण्याची लक्षणे दिसू लागली आहेत. यामुळे यंदा शिमग्याआधीच राजकीय धुळवड खेळली जाण्याची चिन्हे आहेत.शिवधनुष्याकडे आकर्षित झालेल्यांना रोखण्यासाठी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे, तर इनकमिंग वाढण्यास सुरुवात झाल्याने सेनेच्या स्थानिकांमध्ये काहीशी अस्वस्थता जाणवत आहे. त्यामुळे वैभववाडीच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळू लागले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शनिवारी दुपारी ‘मातोश्री’वर मंगेश लोके, संभाजी रावराणे, संतोष सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, अरविंद भोसले आदी सेना नेते उपस्थित होते.तालुक्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा सेना प्रवेश निश्चित झाल्यानंतर आमदार नीतेश राणे यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आऊट गोर्इंग आमच्याच पद्धतीने होईल, अशी तंबी दिली होती. त्यानंतर कुंपणावरील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हालचाली काहीशा थंडावल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, माजी पंचायत समिती सदस्यांनी आमदार राणे यांच्या तंबीकडे कानाडोळा करीत आज हातात शिवबंधन बांधून घेतले. त्यामुळे हा काँग्रेसला बसलेला पहिला धक्का असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणेंच्या काँग्रेस प्रवेशानंतर जिल्ह्याच्या राजकारणात त्सुनामी येऊनही मंगेश लोके शिवसेनेत थांबले होते. त्यावेळी मंगेश लोके समजून अज्ञातांनी केलेल्या हल्ल्यातून त्यांचे चुलत बंधू गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर २००७ च्या पंचायत समिती निवडणुकीतून मंगेश लोके एकटेच शिवसेनेतून निवडून आले होते. २०११ मध्ये त्यांनी काँग्रेस प्रवेश केला होता. मात्र पंचायत समितीमध्ये पद न मिळाल्याने ते नाराज होते. त्यामुळे गेली दोन वर्षे परतीच्या मार्गावर होते.संदेश पारकर यांच्यासमवेत त्यांच्या समर्थकांनी जानेवारी २०१३ मध्ये काँग्रेस प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षपदाची धुरा पक्षाने संभाजी रावराणे यांच्यावर सोपवली. युवक प्रदेश सरचिटणीस अतुल रावराणे यांनी संभाजी रावराणे यांना संपूर्ण पाठबळ दिले होते. मात्र विधानसभा निवडणुकीपासूनच ते पक्ष सोडण्याच्या तयारीत होते. नावळे गावचे सरपंच असलेले संभाजी रावराणे २००६ च्या सुमारास शिवसेनेतून राष्ट्रवादीत दाखल झाले होते. आक्रमक नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे.करूळ गावचे सुपुत्र संतोष सावंत यांनीही मनसेला सोडचिठ्ठी देत पुन्हा शिवबंधन हाती बांधून घेतले आहे. २००६ मध्ये शिवसेनेच्या तालुका संपर्कप्रमुखपदाची धुरा त्यांच्याकडे सोपविली होती. मात्र मनसेच्या स्थापनेनंतर सावंत यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत मनसेचे सहसंपर्क प्रमुखपद स्वीकारले. तेव्हापासून अनेक समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यात पक्षवाढीसाठी प्रयत्न केले, परंतु पक्षनेतृत्वाकडून त्यांच्या कार्याचा सन्मान केला गेला नाही. त्याची सल त्यांच्या मनात विधानसभा निवडणुकीआधीपासून होती. त्यामुळे त्यांनी स्वगृही परतणे उचित मानले. या पक्षप्रवेशामुळे तालुका शिवसेनेला काहीअंशी पुन्हा बळ मिळणार आहे.दोन्ही कॉँग्रेसमधून आऊटगोर्इंग ?कॉँग्रेसमधून लोके, राष्ट्रवादीतून रावराणे व मनसेतून सावंत बाहेर पडून सेनेत दाखल झाल्याने त्या तीन पक्षांचे किती नुकसान आणि सेनेचा फायदा होणार यापेक्षा तिघांच्या बाहेर पडण्याच्या ‘धाडसा’मुळे सेनेच्या मार्गावर असणाऱ्यांचा धीर निश्चित वाढणार आहे. पक्षहानी रोखण्यासाठी कोणता मार्ग अवलंबला जाणार यावर बरेच अवलंबून आहे. शिवसेनेतील वाढती अस्वस्थता संपविण्यासाठी नेतृत्वाला तालुक्यात बळ द्यावे लागणार आहे. यासाठी नेत्यांची कसोटी लागणार आहे.