शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळांमध्ये पुन्हा मुलांचा किलबिलाट सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 15:21 IST

नवी कोरी पुस्तकं, वह्या... नव्या मित्र-मैत्रिणी... नवीन वर्गात बसण्याची उत्सुकता... नवा युनिफार्म... काहींसाठी तर नवी शाळा... मनात थोडीशी भीतीही... शाळेचे नाव काढताच रडवेले झालेले चेहरे... रडणाऱ्या मुलांना वर्गात बसविण्यासाठी शिक्षकांची धावपळ... विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांनी केलेली जय्यत तयारी... अशा वातावरणात आणि मुलांच्या किलबिलाटात कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा सोमवारी पुन्हा एकदा बोलक्‍या झाल्या.

ठळक मुद्दे सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळांमध्ये पुन्हा मुलांचा किलबिलाट सुरू!सिंधुदुर्ग जिल्ह्यात पालकांची लगबग

सुधीर राणे कणकवली : नवी कोरी पुस्तकं, वह्या... नव्या मित्र-मैत्रिणी... नवीन वर्गात बसण्याची उत्सुकता... नवा युनिफार्म... काहींसाठी तर नवी शाळा... मनात थोडीशी भीतीही... शाळेचे नाव काढताच रडवेले झालेले चेहरे... रडणाऱ्या मुलांना वर्गात बसविण्यासाठी शिक्षकांची धावपळ... विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांनी केलेली जय्यत तयारी... अशा वातावरणात आणि मुलांच्या किलबिलाटात कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा सोमवारी पुन्हा एकदा बोलक्‍या झाल्या.जिल्हाभरातील शाळा सुरू होण्याचा सोमवारी तसा पहिला दिवस होता. त्यामुळे मुलांबरोबरच पालकांची लगबग सकाळपासूनच सुरू होती. शाळा म्हणजे आई-वडिलांपासून लांब जाणं शाळा म्हणजे कडक शिक्षक, शाळा म्हणजे फक्त अभ्यास असा विचार करीत रडविल्या चेहऱ्यांनी काही नवागत मुलांचे शाळेत पहिले पाऊल पडले. शाळेच्या पहिल्या दिवशी विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे मोठया उत्साहात स्वागत करण्यात आले. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पुष्प , चॉकलेट्‌स आणि भेटवस्तू देखील देण्यात आल्या.नवा गणवेश परिधान करून आलेल्या या मुलांनी नवे मित्र-मैत्रिणी आणि शिक्षकांशी पहील्याच दिवशी गट्टी देखील केल्याचे अनेक शाळांमध्ये दिसून आले . आई-वडिलांपासून दूर जाण्याच्या भीतीने रडू कोसळलेल्या मुलांच्या चेहऱ्यावर शाळेतील जल्लोष पाहून हसू उमलले. अवघ्या काही क्षणात रडू विसरून इयत्ता पहिलीत प्रवेश केलेली मुले शाळेतील नवे मित्र, वर्ग, शाळेचे पटांगण यामध्ये रमून गेली होती.' आम्ही यावर्षी प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत आलो आहोत. त्यामुळे आम्हाला छान वाटत आहे. नवीन शिक्षक, नवीन मित्र कसे असतील याबद्दल उत्सुकता आहे. नवीन वर्ग, नवीन विषय... हे सगळंच खूप आनंददायी आहे.' अशी प्रतिक्रिया पाचवी मध्ये प्रवेश घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यानी व्यक्त केली. ' मुलांसाठी शाळेचा पहिला दिवस खास असतो, त्यामुळे आज ऑफिसमधून सुटी घेऊन मुलाला सोडायला शाळेत आलो आहे. नवीन विषयांचा अभ्यास मुलांकडून करून घेणे, हे एक आव्हान आहे. अशा प्रतिक्रिया काही पालकांनी व्यक्त केल्या. एकंदर मुलांसाठी आणि पालकांसाठी शाळेचा पहिला दिवस तसा धावपळीचाच ठरला.....आणि गप्पांचे फड रंगले !परीक्षा संपून उन्हाळी सुट्टीवर गेलेली मुले सोमवारी पुन्हा शाळेत परतली. सुट्टीमध्ये केलेल्या गमती जमतींबाबत मित्र , मैत्रिणींना माहिती देताना अनेक मुले दिसत होती. त्यांचे गप्पांचे फड चांगलेच रंगले होते. 

 

टॅग्स :Schoolशाळाsindhudurgसिंधुदुर्ग