शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळांमध्ये पुन्हा मुलांचा किलबिलाट सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 15:21 IST

नवी कोरी पुस्तकं, वह्या... नव्या मित्र-मैत्रिणी... नवीन वर्गात बसण्याची उत्सुकता... नवा युनिफार्म... काहींसाठी तर नवी शाळा... मनात थोडीशी भीतीही... शाळेचे नाव काढताच रडवेले झालेले चेहरे... रडणाऱ्या मुलांना वर्गात बसविण्यासाठी शिक्षकांची धावपळ... विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांनी केलेली जय्यत तयारी... अशा वातावरणात आणि मुलांच्या किलबिलाटात कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा सोमवारी पुन्हा एकदा बोलक्‍या झाल्या.

ठळक मुद्दे सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळांमध्ये पुन्हा मुलांचा किलबिलाट सुरू!सिंधुदुर्ग जिल्ह्यात पालकांची लगबग

सुधीर राणे कणकवली : नवी कोरी पुस्तकं, वह्या... नव्या मित्र-मैत्रिणी... नवीन वर्गात बसण्याची उत्सुकता... नवा युनिफार्म... काहींसाठी तर नवी शाळा... मनात थोडीशी भीतीही... शाळेचे नाव काढताच रडवेले झालेले चेहरे... रडणाऱ्या मुलांना वर्गात बसविण्यासाठी शिक्षकांची धावपळ... विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांनी केलेली जय्यत तयारी... अशा वातावरणात आणि मुलांच्या किलबिलाटात कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा सोमवारी पुन्हा एकदा बोलक्‍या झाल्या.जिल्हाभरातील शाळा सुरू होण्याचा सोमवारी तसा पहिला दिवस होता. त्यामुळे मुलांबरोबरच पालकांची लगबग सकाळपासूनच सुरू होती. शाळा म्हणजे आई-वडिलांपासून लांब जाणं शाळा म्हणजे कडक शिक्षक, शाळा म्हणजे फक्त अभ्यास असा विचार करीत रडविल्या चेहऱ्यांनी काही नवागत मुलांचे शाळेत पहिले पाऊल पडले. शाळेच्या पहिल्या दिवशी विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे मोठया उत्साहात स्वागत करण्यात आले. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पुष्प , चॉकलेट्‌स आणि भेटवस्तू देखील देण्यात आल्या.नवा गणवेश परिधान करून आलेल्या या मुलांनी नवे मित्र-मैत्रिणी आणि शिक्षकांशी पहील्याच दिवशी गट्टी देखील केल्याचे अनेक शाळांमध्ये दिसून आले . आई-वडिलांपासून दूर जाण्याच्या भीतीने रडू कोसळलेल्या मुलांच्या चेहऱ्यावर शाळेतील जल्लोष पाहून हसू उमलले. अवघ्या काही क्षणात रडू विसरून इयत्ता पहिलीत प्रवेश केलेली मुले शाळेतील नवे मित्र, वर्ग, शाळेचे पटांगण यामध्ये रमून गेली होती.' आम्ही यावर्षी प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत आलो आहोत. त्यामुळे आम्हाला छान वाटत आहे. नवीन शिक्षक, नवीन मित्र कसे असतील याबद्दल उत्सुकता आहे. नवीन वर्ग, नवीन विषय... हे सगळंच खूप आनंददायी आहे.' अशी प्रतिक्रिया पाचवी मध्ये प्रवेश घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यानी व्यक्त केली. ' मुलांसाठी शाळेचा पहिला दिवस खास असतो, त्यामुळे आज ऑफिसमधून सुटी घेऊन मुलाला सोडायला शाळेत आलो आहे. नवीन विषयांचा अभ्यास मुलांकडून करून घेणे, हे एक आव्हान आहे. अशा प्रतिक्रिया काही पालकांनी व्यक्त केल्या. एकंदर मुलांसाठी आणि पालकांसाठी शाळेचा पहिला दिवस तसा धावपळीचाच ठरला.....आणि गप्पांचे फड रंगले !परीक्षा संपून उन्हाळी सुट्टीवर गेलेली मुले सोमवारी पुन्हा शाळेत परतली. सुट्टीमध्ये केलेल्या गमती जमतींबाबत मित्र , मैत्रिणींना माहिती देताना अनेक मुले दिसत होती. त्यांचे गप्पांचे फड चांगलेच रंगले होते. 

 

टॅग्स :Schoolशाळाsindhudurgसिंधुदुर्ग