शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

प्रकाश आंबेडकर यांचा वंचित पक्ष फोडण्याचे आता संजय राऊत यांचे टार्गेट; नितेश राणे यांचा आरोप

By सुधीर राणे | Updated: February 13, 2024 14:05 IST

कणकवली: संजय राऊत ज्यांच्या संपर्कात जातात तो पक्ष संपतो. उद्धव ठाकरे, शरद पवार यांना अडचणीत आणल्यानंतर आता काँग्रेसला देखील ...

कणकवली: संजय राऊत ज्यांच्या संपर्कात जातात तो पक्ष संपतो. उद्धव ठाकरे, शरद पवार यांना अडचणीत आणल्यानंतर आता काँग्रेसला देखील ते संपवणार हे मी अगोदर बोललो होतो. आता संजय राऊत यांचे टार्गेट प्रकाश आंबेडकर हे आहेत. वंचित बहुजन आघाडी पक्ष त्यांना फोडायचा आहे. असा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.कणकवलीत येथे मंगळवारी नितेश राणे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, २०१९ पासून जनमताच्या विरोधात जाऊन राजकारण कोणी 'नासवल' हे राऊत यांनी आरशात पाहिले असते तर त्यांना समजले असते. आता शेवटच्या घटका मोजणाऱ्या महाविकास आघाडीच्या फलकाला जाऊन हार घालण्याचे तेव्हढेच शिल्लक राहिले आहे. आता वंचित आघाडीकडे राऊत यांनी आपला लक्ष वळविला आहे.  प्रकाश आंबेडकर यांनी वेळीच ते ओळखावे आणि आपला पक्ष वाचवावा.उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये तेव्हा अजित पवार, अशोक चव्हाण हे होते. तेव्हा ते तुम्हाला चांगले होते. आता आमच्या सोबत ते आल्यावर वाईट का वाटतात ? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.काँग्रेसच्या आमदारांना पक्षात काहीच किंमत नसते !केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काँग्रेस पक्ष सोडताना आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.त्या खऱ्या आहेत. काँग्रेस पक्षात स्वतःच्या आमदाराना किती महत्व दिले जाते, हे मी बघितले आहे. त्यावेळी कोकणातून मी एकटा काँग्रेसचा आमदार होतो. मात्र, राहुल गांधी किंवा तत्कालीन प्रदेशाध्यक्ष मला केव्हाही भेटले नाहीत. किंवा साधी चौकशी केली नाही. त्यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतलेला निर्णय अतिशय योग्य होता.तसाच  आजचा अशोक चव्हाण यांचा सुद्धा निर्णय योग्यच आहे,असेही नितेश राणे यावेळी म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSanjay Rautसंजय राऊत