शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

प्रकाश आंबेडकर यांचा वंचित पक्ष फोडण्याचे आता संजय राऊत यांचे टार्गेट; नितेश राणे यांचा आरोप

By सुधीर राणे | Updated: February 13, 2024 14:05 IST

कणकवली: संजय राऊत ज्यांच्या संपर्कात जातात तो पक्ष संपतो. उद्धव ठाकरे, शरद पवार यांना अडचणीत आणल्यानंतर आता काँग्रेसला देखील ...

कणकवली: संजय राऊत ज्यांच्या संपर्कात जातात तो पक्ष संपतो. उद्धव ठाकरे, शरद पवार यांना अडचणीत आणल्यानंतर आता काँग्रेसला देखील ते संपवणार हे मी अगोदर बोललो होतो. आता संजय राऊत यांचे टार्गेट प्रकाश आंबेडकर हे आहेत. वंचित बहुजन आघाडी पक्ष त्यांना फोडायचा आहे. असा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.कणकवलीत येथे मंगळवारी नितेश राणे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, २०१९ पासून जनमताच्या विरोधात जाऊन राजकारण कोणी 'नासवल' हे राऊत यांनी आरशात पाहिले असते तर त्यांना समजले असते. आता शेवटच्या घटका मोजणाऱ्या महाविकास आघाडीच्या फलकाला जाऊन हार घालण्याचे तेव्हढेच शिल्लक राहिले आहे. आता वंचित आघाडीकडे राऊत यांनी आपला लक्ष वळविला आहे.  प्रकाश आंबेडकर यांनी वेळीच ते ओळखावे आणि आपला पक्ष वाचवावा.उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये तेव्हा अजित पवार, अशोक चव्हाण हे होते. तेव्हा ते तुम्हाला चांगले होते. आता आमच्या सोबत ते आल्यावर वाईट का वाटतात ? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.काँग्रेसच्या आमदारांना पक्षात काहीच किंमत नसते !केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काँग्रेस पक्ष सोडताना आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.त्या खऱ्या आहेत. काँग्रेस पक्षात स्वतःच्या आमदाराना किती महत्व दिले जाते, हे मी बघितले आहे. त्यावेळी कोकणातून मी एकटा काँग्रेसचा आमदार होतो. मात्र, राहुल गांधी किंवा तत्कालीन प्रदेशाध्यक्ष मला केव्हाही भेटले नाहीत. किंवा साधी चौकशी केली नाही. त्यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतलेला निर्णय अतिशय योग्य होता.तसाच  आजचा अशोक चव्हाण यांचा सुद्धा निर्णय योग्यच आहे,असेही नितेश राणे यावेळी म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSanjay Rautसंजय राऊत