शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

भातशेतीला करपाचा विळखा, नव्या संकटाने शेतकरी हवालदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 2:50 PM

सध्या ऊन, पाऊस आणि अतिवृष्टीमुळे कनेडी परिसरातील गावांमधील भातशेतीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. काही ठिकाणी शेतीला करपा रोगाने ग्रासले आहे. या नव्या संकटाने शेतकरी संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देभातशेतीला करपाचा विळखा, नव्या संकटाने शेतकरी हवालदीलऊन पावसाच्या खेळाने विविध रोगांचा प्रादुर्भाव

कनेडी (सिंधुदुर्ग) : सध्या ऊन, पाऊस आणि अतिवृष्टीमुळे कनेडी परिसरातील गावांमधील भातशेतीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. काही ठिकाणी शेतीला करपा रोगाने ग्रासले आहे. या नव्या संकटाने शेतकरी संकटात सापडला आहे.जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेकडो एकर भातशेती पूर्णपणे कुजली आहे. पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीतील भातशेती अजूनही सुस्थितीत होती. मात्र, अतिवृष्टी आणि ऊन-पावसाच्या खेळामुळे शेतीला विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. काही भागातील भातशेतीवर निळे भुंगेरेंचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. येथील शेती सुरूवातीला लालसर होऊन नंतर करपल्यासारखी दिसत आहे. तर काही भागात करपा, शेंडा करपा, कडा करप्याचा प्रादुर्भाव दिसत आहे.सह्याद्रीच्या पट्ट्यातील नाटळ, दिगवळे, कुंभवडे, दारिस्ते, भिरवंडे, सांगवे, शिवडाव, हरकुळ, कुपवडे, जांभवडे, घोडगे या गावांमध्ये भातशेतीवर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सध्या कडक ऊन व पावसाचे कमी झालेले प्रमाण यामुळे अशा प्रकारचे रोग शेतीवर पडत असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.कोकणातील शेतकऱ्यांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. सुरूवातीला अतिपावसामुळे भातशेती कुजून व वाहून गेली. नंतर वन्यप्राण्यांनी काही ठिकाणची भातशेती फस्त केली आहे. याचा फटका सह्याद्रीच्या पट्ट्यातील गावांना बसला असून, जंगलापासून जवळच असलेली भातशेती वन्यप्राण्यांनी फस्त केली आहे.शासनाने कायमस्वरूपी तोडगा काढावागवा, सांबर, डुक्कर, माकडे यामुळे दरवर्षी येथील शेतकऱ्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते. यावर ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे. त्यातच आता पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मानसिकता नकारार्थी होण्याची भीती बुजूर्ग शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. शासनाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

टॅग्स :floodपूरsindhudurgसिंधुदुर्ग