शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
2
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
3
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
4
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
5
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
6
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
7
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
8
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
9
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
10
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
11
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
12
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
13
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
14
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!
15
"शूट करुन मग सर्जरी करायची...", अपघातानंतर अलका कुबल यांना निर्मात्यांकडून आला कटू अनुभव
16
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले
17
ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली
18
Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी
19
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
20
पत्नीच्या हत्येचा आरोपी NSG कमांडो, 'ऑपरेशन सिंदूर'च्या नावाखाली बचाव करत होता, सुप्रीम कोर्ट काय म्हणाले?

शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा

By अनंत खं.जाधव | Updated: May 5, 2025 17:00 IST

Shakti Peeth Mahamarg: विकासाच्या दृष्टीने शक्तिपीठ महामार्ग हा महत्त्वाचा आहे  त्यामुळे या महामार्गाला विरोध करणाऱ्यांना योग्य त्या भाषेत उत्तर द्या असा इशारा खासदार तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिला आहे ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

सावंतवाडी - विकासाच्या दृष्टीने शक्तिपीठ महामार्ग हा महत्त्वाचा आहे  त्यामुळे या महामार्गाला विरोध करणाऱ्यांना योग्य त्या भाषेत उत्तर द्या असा इशारा खासदार तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिला आहे ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान अडाळी एमआयडीसीमध्ये पाचशेहून अधिक उद्योग आणण्यासाठी जिंदाल आणि अंबानी या अदांनी सोबत माझी चर्चा सुरू आहे लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय होईल असे ही राणे यांनी स्पष्ट केले राणे हे दोन दिवसांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असून त्यांनी सावंतवाडीत भाजप कार्यालयाला भेट दिली  जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, माजी नगरसेवक मनोज नाईक, शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर,माजी शहराध्यक्ष अजय गोदावले, प्रमोद कामत शेखर गावकर गुरु मठकर. मोहिनी मडगावकर परिमल नाईक रवी मडगावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

राणे यांना शक्तीपीठ महामार्गाला विरोध होत आहे याबाबत विचारले असता त्यांनी कठोर शब्दात उत्तर दिले ते म्हणाले या ठिकाणी विकास व्हायला पाहीजे तर शक्तीपीठ महामार्ग होणे गरजेचे आहे त्यामुळे नाहक विरोधासाठी विरोध करणाऱ्या  लोकांना त्याच भाषेत उत्तर द्या ज्यांना कोण विचारत नाही ते या महामार्गाला विरोध करत आहे. जंगले आम्ही राखली असे म्हणणाऱ्यांना नेमके जंगले राखण्यासाठी काय केले असा उलट सवाल त्यांनी केला.

आडाळी एमआयडीसी मध्ये उद्योग आणण्याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले त्या ठिकाणी 500 हून अधिक उद्योग येण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत मोठे उद्योग यावेत आणि त्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत त्या पार्श्वभूमीवर मी जिंदाल आणि अंबानी या मोठ्या उद्योगजकांशी माझी बोलणी सुरू आहेत  त्या ठिकाणी जास्तीत जास्त रोजगार यावा आणि त्या माध्यमातून येथील युवकांना रोजगार मिळावा यासाठी माझे प्रयत्न आहे आणि दिलेला शब्द मी पूर्ण करणार आहे.  

सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील 25 अधिक गावे इकोसेन्सिटिव्ह जाहीर करण्यात आली आहेत यावर राणे यांनी या ठिकाणी विकास होणे गरजेचे आहे त्यामुळे इकोसेन्सिटिव्ह सारखा प्रश्न बाजूला ठेवून त्या ठिकाणी रोजगार येण्यासाठी काही करता येऊ शकते का या संदर्भात मी केद्रीय पर्यावरण मंत्र्यांशी चर्चा करणार आहे  कासार्डे येथील सिलिका मायनिंग सारख्या उद्योगाला ज्यानी आयुष्यभर कमावले तेच आता त्याला विरोध करत आहेत हे योग्य नाही त्यामुळे लवकरच आपण संबंधित पाचही जणांची माहिती उघड करणार आहे असा इशारा त्यांनी दिला

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Shaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गsindhudurgसिंधुदुर्ग