शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

वीज तोडल्यास याद राखा, भाजपचा इशारा : सावंतवाडीत आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 17:19 IST

CoronavirusUnlock, Mahavitran, Bjp, Sawantwadi, Sindhudurgnews लॉकडाऊन काळामध्ये वीज वितरण कंपनीने भरमसाठ व अन्यायकारक वीज बिले काढली आहेत. या विरोधात सावंतवाडी शहर भाजपकडून येथील वीज वितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देवीज तोडल्यास याद राखा, भाजपचा इशारा सावंतवाडीत वाढीव वीज बिलांविरोधात आंदोलन

सावंतवाडी : लॉकडाऊन काळामध्ये वीज वितरण कंपनीने भरमसाठ व अन्यायकारक वीज बिले काढली आहेत. या विरोधात सावंतवाडी शहर भाजपकडून येथील वीज वितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.यावेळी अन्यायकारक वीज बिलांबाबत तोडगा निघाला पाहिजे. वीज ग्राहकांवर जबरदस्ती किंवा वीज तोडल्यास याद राखा, असा इशारा यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिला. यावेळी भाजपने जोरदार घोषणाबाजी देत राज्य सरकारचा निषेध केला. वाढीव वीज बिलांविरोधात भाजपा पक्ष आक्रमक झालेला दिसून आला.सावंतवाडी येथील वीज वितरण कार्यालयावर शहर मंडल भाजपाच्यावतीने धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी कार्यकारी उपअभियंता एस. एस. भुरे यांना जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्यासह उपस्थितांनी जाब विचारत निवेदन दिले.यावेळी नगराध्यक्ष संजू परब, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, राजू राऊळ, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, मनोज नाईक, आनंद नेवगी, नासीर शेख, नगरसेविका दीपाली भालेकर, समृद्धी विर्नोडकर, आंबोली मंडल अध्यक्ष संदीप गावडे, केतन आजगावकर, पंचायत समिती सदस्य रवींद्र मडगावकर आदी सहभागी झाले होते.यावेळी उपस्थित भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत आघाडी सरकारचा निषेध केला. तसेच अन्यायकारकच वीज बिले माफ झालीच पाहिजेत, अशी मागणी केली. यावेळी अमित परब, बंटी पुरोहित संजू विर्नोडकर, दिलीप भालेकर, महिला शहर मंडल अध्यक्षा मोहिणी मडगाव कर, प्राजक्ता मुद्राळे, ज्योती पाटणकर, सुकन्या टोपले, परिणिती वर्तक, सुमित्रा साळकर, बेला पिंटो आदी उपस्थित होते.बिलांबाबत तोडगा काढा, अन्यथा गप्प बसणार नाहीतेली पुढे म्हणाले, जिल्ह्याच्या वरिष्ठांकडून लोक अदालत घेण्याबाबत आणि त्यातून तोडगा काढण्याबाबत वक्तव्य केले होते. मात्र, अद्यापही त्यांना ही अदालत घ्यायला वेळ नाही. त्यामुळे वरिष्ठ शाखा कार्यालयाकडून आवश्यक दुरुस्त्या मागून घ्या व वीज बिलांबाबत तोडगा काढा.

अन्यथा भारतीय जनता पक्ष गप्प बसणार नाही. याठिकाणी लोकांच्या तक्रारी देण्यासाठी तक्रार निवारण कक्ष नाही. उत्तर देण्यासाठी जबाबदार व्यक्ती नाही. त्यामुळे येथील तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याबरोबरच योग्य जबाबदार व्यक्ती येणाऱ्या वीज ग्राहकांचे निराकरण करण्यासाठी बसवाव्यात, असे सांगण्यात आले. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणKankavliकणकवलीBJPभाजपाCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकsindhudurgसिंधुदुर्ग