शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

लग्नातील बडेजावच्या आग्रहापोटी नोंदणीकृत विवाह उपेक्षित

By admin | Updated: April 2, 2015 00:45 IST

लग्नातील बडेजावच्या आग्रहापोटी नोंदणीकृत विवाह उपेक्षित

शोभना कांबळे -रत्नागिरी --समाजातील सधन व्यक्तिंपासून अगदी अल्पधन असलेल्यांनाही लग्नाचा बडेजाव हवा असतो. त्यामुळे नोंदणी पद्धतीने विवाहाची अट असलेल्या ‘शुभमंगल सामूहिक - नोंदणीकृत विवाह योजने’चा लाभ जिल्ह्यातील केवळ दोन शेतकऱ्यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी घेतला आहे. अजूनही नोंदणी पद्धतीने विवाह करण्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन उपेक्षित असल्याचे दिसून येत आहे.शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या तसेच एक लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या विधवेच्या मुलीच्या लग्नासाठी सामूहिक किंवा नोंदणी पद्धतीच्या लग्नासाठी ‘शुभमंगल’ योजनेअंतर्गत मंगळसूत्र व इतर वस्तूंच्या खरेदीसाठी १० हजार रूपये देण्यात येतात.कुठल्याही पद्धतीने सामूहिक विवाह घडवून आणणाऱ्या स्वयंसेवी संस्थेला शासनाकडून प्रतिजोडपे २ हजार रूपये देण्यात येतात. वैयक्तिक लाभासाठी विवाह झाल्यानंतर एक महिन्याच्या आत विवाह निबंधकांकडे नोंदणी करून ते प्रमाणपत्र जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयाकडे सादर केल्यास १०,००० रूपयांचा धनादेश दिला जातो. मात्र, यासाठी असलेली नोंदणी पद्धतीने विवाहाची अट लाभार्थ्यांना जाचक वाटत आहे. आजकाल लग्नासाठी ५० ते ६० हजार रूपये खर्च करण्याची मानसिकता आता धनाढ्यांबरोबरच सामान्य जनतेतही रूजलेली आहे. त्यामुळे रोजंदारीवर काम करणारे, शेतमजूर कर्ज काढून आपल्या मुलाचे वा मुलीचे थाटामाटात लग्न करून देतात, असे चित्र सर्रास आहे. त्यामुळे नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्यांचे प्रमाण अतिशय अल्प आहे.गेल्या आर्थिक वर्षात जेमतेम २५ विवाह नोंदणी पद्धतीने झाले आहेत. दरवर्षी सुमारे २० ते २५ नोंदणीकृत विवाह होत असल्याची माहिती विवाह नोंदणी कार्यालयाकडून देण्यात आली. यावरून नोंदणी पद्धतीने विवाह करण्याबाबत सर्वच सामाजिक स्तरावर उदासीनता दिसून येत आहे. ‘शुभमंगल’ योजना तळागाळात पोहोचावी, त्याचबरोबर नोंदणी पद्धतीने विवाह केल्यास अनाठायी होणारा खर्च थांबेल, याबाबत जनमानसात जागृती व्हावी, यासाठी शासनाकडून सामाजिक संस्थांनाही प्रोत्साहनात्मक अनुदान देण्यात येते. मात्र, ग्रामीण भागात अनेक सामाजिक संस्था असूनही त्यांच्याकडून याबाबत प्रबोधन होताना दिसत नाही. त्यामुळे ‘शुभमंगल सामूहिक - नोंदणीकृत विवाह योजने’सारखी शासनाची लाभदायी योजना असूनही समाजाच्या मानसिकतेमुळे आणि संस्थांच्या उदासीनतेमुळे ही योजना दुर्लक्षित राहिली आहे. या योजनेतून सामान्य विवाह इच्छुकांना खर्चाच्या दृष्टीने एक आधार होऊ शकतो. मात्र, शासनाच्या या योजनेकडे गरीब विवाह इच्छुकांचीही पाठ असल्याचे दिसून येते.सामूहिक सोहळ्याला मिळते अनुदानवैयक्तिक विवाह समारंभाबरोबरच कमीत कमी ५ ते जास्तीत जास्त १०० जोडप्यांच्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केल्यास सामाजिक संस्थांनाही प्रतिजोडपे दोन हजार रूपये देण्यात येतात. यात लग्न कुठल्याही पद्धतीने झाले असले तरी त्याची एका महिन्यात नोंदणी अधिकाऱ्यांकडे नोंदणी करून विवाहाचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. त्यानंतर हे अनुदान संबंधित संस्थेला अदा केले जाते. विवाह झालेल्या क्षेत्रानुसार विवाहाची नोंदणी ग्रामस्तरापासून पालिकास्तरावरील नियुक्त केलेल्या नोंदणी अधिकाऱ्याकडे करता येते. सामाजिक संस्थांनी सामाजिक बांधिलकीतून शासनाला सहकार्य केल्यास आर्थिक दुर्बल घटकांकरिता लाभदायी असलेली शुभमंगल सामूहिक - नोंदणीकृत विवाह योजना खेडोपाडी पोहोचविली तर नक्कीच नोंदणी विवाहाचे फायदे या घटकांपर्यत पोहोचतील आणि या योजनेचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांना घेता येईल. त्याचबरोबर या संस्थांनाही आर्थिक मदत होईल.- जे. एस. शेख महिला व बाल विकास अधिकारी