शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यावर राज्य सरकारचे सूड उगवण्याचे काम : नितेश राणे यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 17:06 IST

NiteshRane Sindhudurg- राज्यातील महाविकास आघाडी सरकार रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यावर सूड उगवण्याचे काम करत आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत झालेली गुंतवणूक ही ठाणे , पालघर आणि रायगड जिल्ह्यात झालेली आहे . सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत एकही नव्या उद्योगाची पायाभरणी झालेली नाही .या सरकारने गेल्या वर्षभरात या दोन्ही जिल्ह्यात उद्योग व्यवसायासाठी एक रुपयाची ही गुंतवणूक केलेली नाही . त्यामुळे या जिल्ह्यातील बेरोजगारांनी करायचे काय ? असा प्रश्न आमदार नितेश राणे यांनी आज येथे उपस्थित केला.

ठळक मुद्दे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यावर राज्य सरकारचे सूड उगवण्याचे काम : नितेश राणे यांची टीकामॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत एक रुपयाची ही गुंतवणूक नाही

कणकवली : राज्यातील महाविकास आघाडी सरकार रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यावर सूड उगवण्याचे काम करत आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत झालेली गुंतवणूक ही ठाणे , पालघर आणि रायगड जिल्ह्यात झालेली आहे . सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत एकही नव्या उद्योगाची पायाभरणी झालेली नाही .या सरकारने गेल्या वर्षभरात या दोन्ही जिल्ह्यात उद्योग व्यवसायासाठी एक रुपयाची ही गुंतवणूक केलेली नाही . त्यामुळे या जिल्ह्यातील बेरोजगारांनी करायचे काय ? असा प्रश्न आमदार नितेश राणे यांनी आज येथे उपस्थित केला.कणकवली येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले , सी - वर्ल्ड आणि नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबतही राज्य शासनाने मौन बाळगले आहे . नवीन उद्योग धंदे नसल्याने दरडोई उत्पन्नामध्ये पाचव्या क्रमांकावर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची घसरण होऊ लागली आहे.सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून विकसित होत आहे . या पर्यटन व्यवसायातून शेकडो रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत . मात्र पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी कोणतेही पाऊल आघाडी सरकारने उचललेले नाही . जलक्रीडा प्रकारांनाही शासनाने परवानगी दिलेली नाही . सर्वच बाजूने कोंडी करण्याचे काम हे सरकार करत आहे . ठाकरे सरकार कोकणचा विकास ठाणे , रायगड, पालघर एवढ्यापुरताच मर्यादित ठेवणार आहे का ? जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार, शिवसेनेचे आमदार यांनी याबाबत काय प्रयत्न केले ? असाही सवाल राणे यांनी उपस्थित केला.नितेश राणे म्हणाले, दोडामार्ग, आडाळी या प्रकल्पासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी गुंतवणूक का आणली नाही? मुख्यमंत्री, उद्योगमंत्री शिवसेनेचे आहेत. त्यांच्याकडे शिवसेनेच्या नेत्यांनी निधीसाठी आग्रह का धरला नाही ? त्यामुळे जनतेचे हित न पहाणाऱ्या या पालकममंत्र्यांचा व खासदारांचा आम्हाला काय उपयोग आहे. नाणार प्रकल्पाबाबत यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सकारात्मक होता. आता हा पक्ष राज्यातील सत्तेत आहे. त्यामुळे त्यांनी आता आपली भूमिका स्पष्ट करावी.चिपी विमानतळ २६ जानेवारीला सुरू होणार असे सांगितले जात आहे. मात्र, तेथे उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्यांबाबत येथील तरुणांना माहिती का दिली जात नाही? त्यांना प्रशिक्षण का दिले जात नाही. येथील सर्व नोकऱ्या स्थानिकांनाच म्हणजे येथील भूमिपुत्रांना मिळायला हव्यात. बाहेरच्या जिल्ह्यातील मुलांना नोकऱ्या करायला आम्ही देणार नाही. इथल्या तरुणांना नोकऱ्या द्या. त्यांना प्रशिक्षण द्या. आम्ही त्याला सहकार्य करू.नवीन वर्ष जवळ आले तरी वॉटर स्पोर्ट्स सुरू होऊ शकत नाहीत. बार उघडतात पण कोरोनाच्या काळात तरुणांना रोजगार देणारे उद्योग सुरू होऊ शकत नाहीत. हे या राज्य सरकारचे अपयश आहे.असेही आमदार नितेश राणे यावेळी म्हणाले.सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तोंडाला पुसली पाने !मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत ४७००० कोटी गुंतवणूक कोकणात झाली आहे. मात्र, त्यापैकी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक टक्काही गुंतवणूक झालेली नाही. त्यामुळे राज्य शासनाने या दोन्ही जिल्ह्यातील जनतेच्या तोंडाला पानेच पुसली आहेत. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग