शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यावर राज्य सरकारचे सूड उगवण्याचे काम : नितेश राणे यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 17:06 IST

NiteshRane Sindhudurg- राज्यातील महाविकास आघाडी सरकार रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यावर सूड उगवण्याचे काम करत आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत झालेली गुंतवणूक ही ठाणे , पालघर आणि रायगड जिल्ह्यात झालेली आहे . सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत एकही नव्या उद्योगाची पायाभरणी झालेली नाही .या सरकारने गेल्या वर्षभरात या दोन्ही जिल्ह्यात उद्योग व्यवसायासाठी एक रुपयाची ही गुंतवणूक केलेली नाही . त्यामुळे या जिल्ह्यातील बेरोजगारांनी करायचे काय ? असा प्रश्न आमदार नितेश राणे यांनी आज येथे उपस्थित केला.

ठळक मुद्दे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यावर राज्य सरकारचे सूड उगवण्याचे काम : नितेश राणे यांची टीकामॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत एक रुपयाची ही गुंतवणूक नाही

कणकवली : राज्यातील महाविकास आघाडी सरकार रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यावर सूड उगवण्याचे काम करत आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत झालेली गुंतवणूक ही ठाणे , पालघर आणि रायगड जिल्ह्यात झालेली आहे . सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत एकही नव्या उद्योगाची पायाभरणी झालेली नाही .या सरकारने गेल्या वर्षभरात या दोन्ही जिल्ह्यात उद्योग व्यवसायासाठी एक रुपयाची ही गुंतवणूक केलेली नाही . त्यामुळे या जिल्ह्यातील बेरोजगारांनी करायचे काय ? असा प्रश्न आमदार नितेश राणे यांनी आज येथे उपस्थित केला.कणकवली येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले , सी - वर्ल्ड आणि नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबतही राज्य शासनाने मौन बाळगले आहे . नवीन उद्योग धंदे नसल्याने दरडोई उत्पन्नामध्ये पाचव्या क्रमांकावर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची घसरण होऊ लागली आहे.सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून विकसित होत आहे . या पर्यटन व्यवसायातून शेकडो रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत . मात्र पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी कोणतेही पाऊल आघाडी सरकारने उचललेले नाही . जलक्रीडा प्रकारांनाही शासनाने परवानगी दिलेली नाही . सर्वच बाजूने कोंडी करण्याचे काम हे सरकार करत आहे . ठाकरे सरकार कोकणचा विकास ठाणे , रायगड, पालघर एवढ्यापुरताच मर्यादित ठेवणार आहे का ? जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार, शिवसेनेचे आमदार यांनी याबाबत काय प्रयत्न केले ? असाही सवाल राणे यांनी उपस्थित केला.नितेश राणे म्हणाले, दोडामार्ग, आडाळी या प्रकल्पासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी गुंतवणूक का आणली नाही? मुख्यमंत्री, उद्योगमंत्री शिवसेनेचे आहेत. त्यांच्याकडे शिवसेनेच्या नेत्यांनी निधीसाठी आग्रह का धरला नाही ? त्यामुळे जनतेचे हित न पहाणाऱ्या या पालकममंत्र्यांचा व खासदारांचा आम्हाला काय उपयोग आहे. नाणार प्रकल्पाबाबत यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सकारात्मक होता. आता हा पक्ष राज्यातील सत्तेत आहे. त्यामुळे त्यांनी आता आपली भूमिका स्पष्ट करावी.चिपी विमानतळ २६ जानेवारीला सुरू होणार असे सांगितले जात आहे. मात्र, तेथे उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्यांबाबत येथील तरुणांना माहिती का दिली जात नाही? त्यांना प्रशिक्षण का दिले जात नाही. येथील सर्व नोकऱ्या स्थानिकांनाच म्हणजे येथील भूमिपुत्रांना मिळायला हव्यात. बाहेरच्या जिल्ह्यातील मुलांना नोकऱ्या करायला आम्ही देणार नाही. इथल्या तरुणांना नोकऱ्या द्या. त्यांना प्रशिक्षण द्या. आम्ही त्याला सहकार्य करू.नवीन वर्ष जवळ आले तरी वॉटर स्पोर्ट्स सुरू होऊ शकत नाहीत. बार उघडतात पण कोरोनाच्या काळात तरुणांना रोजगार देणारे उद्योग सुरू होऊ शकत नाहीत. हे या राज्य सरकारचे अपयश आहे.असेही आमदार नितेश राणे यावेळी म्हणाले.सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तोंडाला पुसली पाने !मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत ४७००० कोटी गुंतवणूक कोकणात झाली आहे. मात्र, त्यापैकी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक टक्काही गुंतवणूक झालेली नाही. त्यामुळे राज्य शासनाने या दोन्ही जिल्ह्यातील जनतेच्या तोंडाला पानेच पुसली आहेत. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग