शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यावर राज्य सरकारचे सूड उगवण्याचे काम : नितेश राणे यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 17:06 IST

NiteshRane Sindhudurg- राज्यातील महाविकास आघाडी सरकार रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यावर सूड उगवण्याचे काम करत आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत झालेली गुंतवणूक ही ठाणे , पालघर आणि रायगड जिल्ह्यात झालेली आहे . सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत एकही नव्या उद्योगाची पायाभरणी झालेली नाही .या सरकारने गेल्या वर्षभरात या दोन्ही जिल्ह्यात उद्योग व्यवसायासाठी एक रुपयाची ही गुंतवणूक केलेली नाही . त्यामुळे या जिल्ह्यातील बेरोजगारांनी करायचे काय ? असा प्रश्न आमदार नितेश राणे यांनी आज येथे उपस्थित केला.

ठळक मुद्दे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यावर राज्य सरकारचे सूड उगवण्याचे काम : नितेश राणे यांची टीकामॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत एक रुपयाची ही गुंतवणूक नाही

कणकवली : राज्यातील महाविकास आघाडी सरकार रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यावर सूड उगवण्याचे काम करत आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत झालेली गुंतवणूक ही ठाणे , पालघर आणि रायगड जिल्ह्यात झालेली आहे . सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत एकही नव्या उद्योगाची पायाभरणी झालेली नाही .या सरकारने गेल्या वर्षभरात या दोन्ही जिल्ह्यात उद्योग व्यवसायासाठी एक रुपयाची ही गुंतवणूक केलेली नाही . त्यामुळे या जिल्ह्यातील बेरोजगारांनी करायचे काय ? असा प्रश्न आमदार नितेश राणे यांनी आज येथे उपस्थित केला.कणकवली येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले , सी - वर्ल्ड आणि नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबतही राज्य शासनाने मौन बाळगले आहे . नवीन उद्योग धंदे नसल्याने दरडोई उत्पन्नामध्ये पाचव्या क्रमांकावर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची घसरण होऊ लागली आहे.सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून विकसित होत आहे . या पर्यटन व्यवसायातून शेकडो रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत . मात्र पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी कोणतेही पाऊल आघाडी सरकारने उचललेले नाही . जलक्रीडा प्रकारांनाही शासनाने परवानगी दिलेली नाही . सर्वच बाजूने कोंडी करण्याचे काम हे सरकार करत आहे . ठाकरे सरकार कोकणचा विकास ठाणे , रायगड, पालघर एवढ्यापुरताच मर्यादित ठेवणार आहे का ? जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार, शिवसेनेचे आमदार यांनी याबाबत काय प्रयत्न केले ? असाही सवाल राणे यांनी उपस्थित केला.नितेश राणे म्हणाले, दोडामार्ग, आडाळी या प्रकल्पासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी गुंतवणूक का आणली नाही? मुख्यमंत्री, उद्योगमंत्री शिवसेनेचे आहेत. त्यांच्याकडे शिवसेनेच्या नेत्यांनी निधीसाठी आग्रह का धरला नाही ? त्यामुळे जनतेचे हित न पहाणाऱ्या या पालकममंत्र्यांचा व खासदारांचा आम्हाला काय उपयोग आहे. नाणार प्रकल्पाबाबत यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सकारात्मक होता. आता हा पक्ष राज्यातील सत्तेत आहे. त्यामुळे त्यांनी आता आपली भूमिका स्पष्ट करावी.चिपी विमानतळ २६ जानेवारीला सुरू होणार असे सांगितले जात आहे. मात्र, तेथे उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्यांबाबत येथील तरुणांना माहिती का दिली जात नाही? त्यांना प्रशिक्षण का दिले जात नाही. येथील सर्व नोकऱ्या स्थानिकांनाच म्हणजे येथील भूमिपुत्रांना मिळायला हव्यात. बाहेरच्या जिल्ह्यातील मुलांना नोकऱ्या करायला आम्ही देणार नाही. इथल्या तरुणांना नोकऱ्या द्या. त्यांना प्रशिक्षण द्या. आम्ही त्याला सहकार्य करू.नवीन वर्ष जवळ आले तरी वॉटर स्पोर्ट्स सुरू होऊ शकत नाहीत. बार उघडतात पण कोरोनाच्या काळात तरुणांना रोजगार देणारे उद्योग सुरू होऊ शकत नाहीत. हे या राज्य सरकारचे अपयश आहे.असेही आमदार नितेश राणे यावेळी म्हणाले.सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तोंडाला पुसली पाने !मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत ४७००० कोटी गुंतवणूक कोकणात झाली आहे. मात्र, त्यापैकी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक टक्काही गुंतवणूक झालेली नाही. त्यामुळे राज्य शासनाने या दोन्ही जिल्ह्यातील जनतेच्या तोंडाला पानेच पुसली आहेत. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग