शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

Chipi Airport Inauguration: “इथे एकत्र आलेले आहेत उद्धव ठाकरे व नारायण राणे, मला आठवले महायुतीचे गाणे”: रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2021 4:55 PM

Chipi Airport Inauguration: सिंधुदुर्गात आली आहे विकासाची आंधी, म्हणून मला इथे येण्याची मिळाली संधी, असे म्हणत रामदास आठवलेंनी चिपी विमानतळावरून कवितांची विमाने उडवली.

सिंधुदुर्ग: अनेक केंद्रीय आणि राज्यातील दिग्गज मंत्र्यांच्या उपस्थितीत चिपी विमानतळाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी अगदी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत जवळपास सर्वच नेत्यांनी तुफान फटकेबाजी केली. यामध्ये केंद्रीयमंत्री सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले हेही मागे राहिले नाहीत. चिपी विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी कवितेच्या माध्यमातून रामदास आठवले यांनी टोलेबाजी केली. (ramdas athawale in chipi airport inauguration)

सिंधुदुर्गच्या विकासाची मजबूत होणार आहे कमान, कारण चिपीमध्ये आले आहे मुंबईवरून विमान, अशी कविता करत चिपी विमानतळाचे श्रेय सर्वांचेच असल्याचे सांगितले. राजकारण बाजूला ठेवून आपण सगळे येथे जमलेलो असून सगळीकडेच राजकारण आणण्याची आवश्यकता नसल्याचेही आठवले म्हणाले. 

सिंधुदुर्गसारख्या जिल्ह्याला समुद्र लाभला 

इथे एकत्र आलेले आहेत उद्धव ठाकरे व नारायण राणे, मला आठवले महायुतीचे गाणे, अशी कविता करत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या कार्यक्रमाला येण्याचा आग्रह केला. त्यामुळे या कार्यक्रमाला आलो. सिंधुदुर्गसारख्या जिल्ह्याला समुद्र लाभला आहे, सुंदर डोंगर आहेत तसेच झाडेही आहेत. विमानतळाच्या माध्यमातून येथील नागरिकांना नक्कीच रोजगाराच्या संधी निर्माण होतील. राजकीय विरोधक असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला एकाच व्यासपीठावर एकत्र आले. या विमानतळासाठी अनेकांनी प्रयत्न केलेले आहेत. केंद्रीयमंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि मीदेखील प्रयत्न केलेल आहेत, असे रामदास आठवले यांनी सांगत सिंधुदुर्गात आली आहे विकासाची आंधी, म्हणून मला इथे येण्याची मिळाली संधी, असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या. 

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपी विमानतळाचा शुभारंभ झाल्याचे जाहीर करत, आजचा क्षण हा आदळआपट करण्याचा नसून तो आनंद व्यक्त करण्याचा क्षण आहे. आजचा दिवस माझ्यासाठी सौभाग्याचा आहे. आपले कोकण महाराष्ट्राचे वैभव आहे, ते आपण जगासमोर नेत आहोत. जगातून अनेक पर्यटक इथे यावेत यासाठी सुविधा असण्याची गरज आहे. त्या सुविधांमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग हा विमानतळ असतो. शिवसेना आणि कोकणाचे नाते वेगळे सांगायला नको, असे नमूद करत चिपी विमानतळ आंतरराष्ट्रीय करण्याचा मानस असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.  

टॅग्स :Chipi airportचिपी विमानतळRamdas Athawaleरामदास आठवलेUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarayan Raneनारायण राणे