शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

सिंधुदुर्गात पावसाचा हाहाकार; अनेक वाहने, साकव गेले वाहून 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2017 8:31 PM

जिल्ह्याच्या विविध भागात रविवारी रात्री ढगफुटीसदृश झालेल्या पावसाने हाहाकार माजविला. माणगाव खो-यात शिवापूर ते आंबेरी दरम्यान पुरस्थिती निर्माण झाली होती.

सिंधुदुर्ग : जिल्ह्याच्या विविध भागात रविवारी रात्री ढगफुटीसदृश झालेल्या पावसाने हाहाकार माजविला. माणगाव खो-यात शिवापूर ते आंबेरी दरम्यान पुरस्थिती निर्माण झाली होती. तर वैभववाडी तालुक्यात सुकनदीच्या पुरात सांगुळवाडी येथील लोखंडी साकवासह चार दुचाकी आणि एक रिक्षा वाहून गेली. त्यापैकी रिक्षा अद्याप सापडलेली नाही. गडमठमध्ये पुराच्या पाण्यात वाहून जाणा-या कासार्डे-साटमवाडी येथील दामू साटम (६९) या वृद्धाला लोरेतील सुरेंद्र पेडणेकर या युवकाने पुरात उडी मारून वाचविले.माणगाव खो-यात रविवारी रात्री झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने शिवापूर ते आंबेरीपर्यंत पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे अनेक  घरात, दुकानात पाणी घुसून शेती वाहून गेल्याने नुकसान झाले. 

वैभववाडी तालुक्यात रविवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरश: दाणादाण उडवून दिली. सुकनदीच्या पुरात सांगुळवाडी येथील लोखंडी साकवासह चार दुचाकी आणि एक रिक्षा वाहून गेली. त्यापैकी रिक्षा अद्याप सापडलेली नाही. मांगवली नरसाळेवाडीतील मंगेश राणे यांची नारळबाग पुराच्या लोंढ्यात उद्ध्वस्त झाली आहे. तर तालुक्यातील नदीकाठची शेकडो हेक्टर भातशेती पुराच्या गाळात गाडली गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. वाहून जाणा-या कासार्डेतील वृद्धाला वाचवलेकासार्डे साटमवाडी येथील दामू साटम (६९) रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गडमठ साटमवाडी पुलावरुन निघाले होते. त्याचवेळी आलेल्या पुराच्या लोंढ्या सोबत ते पुलावर वाहत जावू लागले. त्यामुळे साटम यांनी आरडाओरडा केला. त्यावेळी जवळच असलेले लोरेतील सुरेंद्र ऊर्फ बाळू पेडणेकर यांनी पाण्यात उडी टाकून काही अंतर वाहत गेलेल्या साटम यांना पाण्याबाहेर काढून जीवदान दिले. पेडणेकर हे दामू साटम यांच्या कुटुंबासाठी देवदूत ठरले. पेडणेकर यांनी अंधुक प्रकाशात पुरात उडी मारून वृद्धाला वाचविल्याबद्दल त्यांच्या साहसाचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे. निळेलीत साकव वाहून गेलामाणगाव खो-यात शनिवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे निळेली-देऊळवाडा येथील ओहोळावर ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधलेला साकव वाहून  गेला. निळेली-देऊळवाडीतील ग्रामस्थ तेथील ओहोळावर दरवर्षी श्रमदानातून साकव बांधतात. शाळेत जाणारी मुले तसेच ग्रामस्थांचीही त्याठिकाणी पावसाळ्यात ये-जा करावी लागते. पावसाळ्यात ग्रामस्थांसाठी हाच मार्ग सोयीस्कर ठरतो. शनिवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे हा साकव वाहून गेला. त्यामुळे याठिकाणी कायमस्वरूपी लोखडी साकव बांधून मिळावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.  

टॅग्स :Rainपाऊस