शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण : प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी सर्वपक्षीयांनी काढला मूक मोर्चा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 13:24 IST

मुंबई- गोवा महामार्ग चौपदरीकरणामुळे बाधित झालेल्या कणकवली शहरातील प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होत आहे. प्रशासनाने त्यांची घोर फसवणूक केली आहे. त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी गुरुवारी (7 डिसेंबर)  कणकवलीत कडकडीत बंद पाळण्यात आला.

कणकवली (सिंधुदुर्ग) : मुंबई- गोवा महामार्ग चौपदरीकरणामुळे बाधित झालेल्या कणकवली शहरातील प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होत आहे. प्रशासनाने त्यांची घोर फसवणूक केली आहे. त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी गुरुवारी (7 डिसेंबर)  कणकवलीत कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच काळ्या फिती बांधून कणकवली शहरातून प्रकल्पबाधितांनी प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढला. या सर्वपक्षीय मूक मोर्चाला चांगला प्रतिसाद लाभला.

गुरुवारी सकाळी 9.30 वाजता काढण्यात आलेल्या मूक मोर्चाच्यावेळी प्रकल्पबाधित संघर्ष समितीचे अध्यक्ष उदय वरवडेकर, विशाल कामत, महेश नार्वेकर, संदेश पारकर, राजन तेली, अबिद नाईक, कणकवली उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, नगरसेवक समीर नलावडे, बंडू हर्णे, रूपेश नार्वेकर, विलास कोरगावकर, अनिल शेट्ये, शिशिर परुळेकर, संजय मालंडकर, सुजीत जाधव, नितिन पटेल, विठ्ठल देसाई, राजन परब,प्रदीप मांजरेकर, भुषण परुळेकर, रत्नाकर देसाई, रामदास मांजरेकर, चंदू कांबळी, बाळा बांदेकर, सचिन म्हाडगुत, यशवंत महाडिक आदींसह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कणकवली बंद आंदोलनाला विविध राजकीय पक्ष तसेच संघटनानी पाठिंबा दिला होता. यामध्ये व्यापारी महासंघ, रिक्षा संघटना, स्टॉल संघटना, बेकरी संघटना, हॉटेल मालक संघटना, कणकवली तालुका मुस्लिम संघटना, ज्येष्ठ नागरिक संघटना, विदेशी मद्य विक्रेते संघटना, जिल्हा फुटवेअर असोसिएशन, रोटरी क्लब,सुवर्णकार संघटना, टेम्पो चालक -मालक संघटना अशा विविध संघटनांचा समावेश होता. नागरिकही या बंदमध्ये सहभागी झाले होते. पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दंगल नियंत्रक पथकही तैनात करण्यात आले होते. प्रशासनाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा महामार्ग चौपदरीकरणासाठी भुसंपादन करताना चुकीची प्रक्रिया राबविणाऱ्या प्रशासनाचा निषेध करण्यासाठी कणकवली बंद ठेवून शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला. परमहंस भालचंद्र महाराज आश्रम परिसरातील श्री काशिविश्वेश्वर मंदिराकडून  पटकीदेवी मंदिर ते बाजारपेठ मार्गे पू.अप्पासाहेब पटवर्धन चौकातून प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत हा मूक मोर्चा काढण्यात आला. कणकवलीकरांना गृहीत धरून जर प्रशासनाने या लोकशाही मार्गाने केलेल्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल. तसेच कणकवलीत महामार्गाचे काम कुठल्याही परिस्थितीत करु दिले जाणार नाही. यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी पूर्णतः प्रशासन व शासनाचीच राहील, असा इशाराही यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी हातात धरलेल्या फलकांच्या माध्यमातून दिला.

टॅग्स :highwayमहामार्गgoaगोवाsindhudurgसिंधुदुर्गkonkanकोकण