शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
2
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
3
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
4
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
5
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
6
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
7
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
8
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
9
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
10
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
11
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
12
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
13
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
14
Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
15
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
16
"आम्ही थांबणार नाही..", दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीच भारती सिंग करतेय तिसऱ्या बाळाचं प्लानिंग? पती हर्ष म्हणाला...
17
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
18
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी उपस्थित केलं भाजपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, म्हणाले, येथे सर्व निर्णय... 
19
जिथं वक्फचा वाद उफाळला, तिथे भाजपाला मिळाला 'ऐतिहासिक' विजय; केरळमध्ये हैराण करणारा निकाल
20
Gold-Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; १८ कॅरेट सोनंही १ लाखांच्या पार, मुंबई ते दिल्ली नवे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी-सिंधुदुर्गातील पोटखराबा जमिनी विम्यासाठी संरक्षित करा, नारायण राणेंनी केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे मांडल्या समस्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 17:52 IST

कणकवली : रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे पश्चिम घाट परिसर हा डोंगराळ आणि कठीण प्रदेशांचा आहे. अरबी समुद्र ते ...

कणकवली : रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे पश्चिम घाट परिसर हा डोंगराळ आणि कठीण प्रदेशांचा आहे. अरबी समुद्र ते सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधील अरुंद पट्टीवर तयार झालेला भूभाग आहे. डोंगराळ प्रदेशाचा भाग असल्याने या जिल्ह्यांतील जमीन खडकाळ आहेत. अशा खडकाळ जमिनीवर या बागायती पिकांची मोठ्या कष्टाने शेतकरी, बागायतदार लागवड करतात.दरम्यान, पीक विमा कंपन्यांनी या वर्षीपासून पोटखराबा जमीन विमा संरक्षणातून वगळण्यास सुरुवात केली आहे. विमा कंपन्यांच्या या कृत्यामुळे रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या पोटखराबा जमिनीचा (खडकाळ आणि कोरडा भाग) विमा क्षेत्रात समावेश करावा. यासाठी विशेष धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्याकडे खासदार नारायण राणे यांनी केली आहे.त्यांची दिल्ली येथे भेट घेत कोकणातील शेतकरी, बागायतदारांच्या समस्या खासदार नारायण राणे यांनी मांडल्या. यावेळी निवेदनही कृषिमंत्र्यांना देण्यात आले. दरम्यान, आपण कोकणातील शेतकऱ्यांसाठी लवकरच दिलासादायक निर्णय घेणार असल्याचे आश्वासन कृषिमंत्र्यांनी दिले.कृषिमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात खासदार नारायण राणे यांनी शेतकऱ्यांची भूमिका मांडली आहे.त्यात म्हटले आहे की, माझा लोकसभा मतदारसंघ रत्नागिरी - सिंधुदुर्ग हा पश्चिम घाट परिसराचा एक भाग आहे. पश्चिम घाटात डोंगराळ आणि कठीण प्रदेशांचा समावेश आहे. या दोन जिल्ह्यांतील मुख्य पिके म्हणजे आंबा, नारळ, सुपारी, काजू आणि इतर फलोत्पादन उत्पादने, डोंगराळ प्रदेशाचा भाग असल्याने या जिल्ह्यांतील जमीन खडकाळ आहे. या खडकाळ जमिनीवर बागायती पिकांची अत्यंत कष्ट घेत लागवड केली जाते.

सकारात्मक निर्णय घेण्याचे अभिवचनराज्य सरकारच्या महसूल विभागात या खडकाळ जमिनींचे वर्गीकरण प्रामुख्याने पोटखराबा म्हणजे खडकाळ आणि शेतीअयोग्य जमीन असे केले जाते. या जमिनींवर पिकणाऱ्या फळांना मोठी मागणी असते. दुर्दैवाने, पीक विमा कंपन्यांनी या वर्षापासून पोटखराबा जमीन विमा संरक्षणातून वगळण्यास सुरुवात केली आहे. विमा कंपन्यांच्या या कृत्यामुळे वरील दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली होती. याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याचे अभिवचन कृषिमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी दिले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गFarmerशेतकरीAgriculture Schemeकृषी योजनाNarayan Raneनारायण राणे