शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

स्वार्थी पक्षबदलू राजकारण्यांना जनतेने धडा शिकवावा, मनसे सरचिटणीस परशुराम उपरकरांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 17:45 IST

त्यावेळी राणेंच्या दहशतीचे समर्थन करून त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणारे आजच्या घडीला त्यांच्यावर टिकाटिपणी करत आहेत.

कणकवली : कोकण भूमीत जे उन्मत्त होतात ते या परशुराम भूमीत गाडले जातात. राणे काँग्रेसमध्ये असताना त्यांच्या समर्थकांनी शिवसैनिकांना मारझोड करण्याबरोबरच बाहेरून आणलेल्या गुंडांकडून दहशतही पसरवली होती. त्यावेळी जुन्या प्रामाणिक काँग्रेस कार्यकर्त्यानी पक्ष बदलला तर काहींनी कायमचेच राजकारण सोडले. 

मात्र, त्यावेळी राणेंच्या दहशतीचे समर्थन करून त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणारे आजच्या घडीला त्यांच्यावर टिकाटिपणी करत आहेत. ही टीका करणारे त्यावेळी गायब झालेल्या व्यक्तींमागचे गूढ सांगतील काय ? असा सवाल करत स्वार्थी पक्षबदलू राजकारण्यांना जनतेने मतांच्या माध्यमातून धडा शिकवावा असे आवाहन मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केले आहे. कणकवली तेलीआळी येथील मनसे संपर्क कार्यालयात आज, मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

परशुराम उपरकर म्हणाले, काही जण आता आत्मक्लेश करीत आहेत. मात्र, त्यावेळी नितेश राणेंच्या विजयासाठी स्वतः त्यांनी किती प्रयत्न केले, याचेही चिंतन करावे. प्रमोद जठार आज नारायण राणे, नितेश राणेंचे गोडवे गात उदोउदो करत आहेत. मात्र, आपल्या आमदारकीच्या निवडणुकीच्यावेळी ते त्यांच्यावर कोणते आरोप करीत होते. याचा त्यांनीच विचार करावा. 

कोकणातील जनतेला फसवण्याचा प्रयत्न करणारे सोयीनुसार व आपल्या वैयक्तिक फायद्यानुसार पक्षबदल करून एकमेकांवर टीका करीत असतात. मात्र, स्वतःच्या स्वार्थासाठी कोणी जिल्हा बँक अध्यक्ष तर कोणी महामंडळाचे उपाध्यक्ष पद मिळवणारे त्यावेळी राणेंचे गोडवे गात होते.त्यामुळे सिंधुदुर्गातील जनतेने एकमेकांवर टीका करणाऱ्या स्वार्थी राजकारण्यांना मतांच्या माध्यमातून धडा शिकवला पाहिजे. कोकण ही परशुरामाची भूमी असून या भूमीत जे करायचे ते इथेच फेडायचे आहे. याचा विचार सर्वांनीच करून तसे वागावे आणि जनहित साधण्यासाठी प्रयत्न करावेत असेही परशुराम उपरकर यावेळी म्हणाले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग