शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

स्वार्थी पक्षबदलू राजकारण्यांना जनतेने धडा शिकवावा, मनसे सरचिटणीस परशुराम उपरकरांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 17:45 IST

त्यावेळी राणेंच्या दहशतीचे समर्थन करून त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणारे आजच्या घडीला त्यांच्यावर टिकाटिपणी करत आहेत.

कणकवली : कोकण भूमीत जे उन्मत्त होतात ते या परशुराम भूमीत गाडले जातात. राणे काँग्रेसमध्ये असताना त्यांच्या समर्थकांनी शिवसैनिकांना मारझोड करण्याबरोबरच बाहेरून आणलेल्या गुंडांकडून दहशतही पसरवली होती. त्यावेळी जुन्या प्रामाणिक काँग्रेस कार्यकर्त्यानी पक्ष बदलला तर काहींनी कायमचेच राजकारण सोडले. 

मात्र, त्यावेळी राणेंच्या दहशतीचे समर्थन करून त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणारे आजच्या घडीला त्यांच्यावर टिकाटिपणी करत आहेत. ही टीका करणारे त्यावेळी गायब झालेल्या व्यक्तींमागचे गूढ सांगतील काय ? असा सवाल करत स्वार्थी पक्षबदलू राजकारण्यांना जनतेने मतांच्या माध्यमातून धडा शिकवावा असे आवाहन मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केले आहे. कणकवली तेलीआळी येथील मनसे संपर्क कार्यालयात आज, मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

परशुराम उपरकर म्हणाले, काही जण आता आत्मक्लेश करीत आहेत. मात्र, त्यावेळी नितेश राणेंच्या विजयासाठी स्वतः त्यांनी किती प्रयत्न केले, याचेही चिंतन करावे. प्रमोद जठार आज नारायण राणे, नितेश राणेंचे गोडवे गात उदोउदो करत आहेत. मात्र, आपल्या आमदारकीच्या निवडणुकीच्यावेळी ते त्यांच्यावर कोणते आरोप करीत होते. याचा त्यांनीच विचार करावा. 

कोकणातील जनतेला फसवण्याचा प्रयत्न करणारे सोयीनुसार व आपल्या वैयक्तिक फायद्यानुसार पक्षबदल करून एकमेकांवर टीका करीत असतात. मात्र, स्वतःच्या स्वार्थासाठी कोणी जिल्हा बँक अध्यक्ष तर कोणी महामंडळाचे उपाध्यक्ष पद मिळवणारे त्यावेळी राणेंचे गोडवे गात होते.त्यामुळे सिंधुदुर्गातील जनतेने एकमेकांवर टीका करणाऱ्या स्वार्थी राजकारण्यांना मतांच्या माध्यमातून धडा शिकवला पाहिजे. कोकण ही परशुरामाची भूमी असून या भूमीत जे करायचे ते इथेच फेडायचे आहे. याचा विचार सर्वांनीच करून तसे वागावे आणि जनहित साधण्यासाठी प्रयत्न करावेत असेही परशुराम उपरकर यावेळी म्हणाले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग