शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

सिंधुदुर्ग : कातळ भागातील भातशेती करपली, पावसाने मारली दडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 1:03 PM

गेले दहा ते बारा दिवस पावसाने दडी मारल्याने देवगड तालुक्यातील बहुतांश कातळ भागातील भातशेती करपून वाया गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांना यावर्षी भातशेती नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.

ठळक मुद्देकातळ भागातील भातशेती करपली, पावसाने मारली दडी शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागणार

देवगड : गेले दहा ते बारा दिवस पावसाने दडी मारल्याने देवगड तालुक्यातील बहुतांश कातळ भागातील भातशेती करपून वाया गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांना यावर्षी भातशेती नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.यावर्षी मृग नक्षत्रालाच पावसाने दमदार सुरुवात केली होती. जून व जुलै महिन्यांमध्ये भातशेती लावणीच्यावेळी मुसळधार पाऊस पडल्याने यावर्षी समाधानकारक उत्पादन मिळेल असे वाटत असतानाच अखेरच्या टप्प्यात पावसाने सप्टेंबर महिन्यात दडी मारल्याने तालुक्यातील कातळ भागातील भातशेती करपून गेली आहे.जून व जुलै महिन्यांत मुसळधार तर आॅगस्ट महिन्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस यावर्षी झाला. मात्र, सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने अचानक दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या भातशेतीचे नुकसान झाले आहे.गेली तीन-चार वर्षे तालुक्यामधील भातशेती पीक समाधानकारक मिळत होते. याचे कारण गेल्या तीन-चार वर्षांमध्ये समाधानकारक पाऊस पडला होता. येथील भातशेती ही पूर्णत: पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.शेतीसाठी यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खत विकत घेतले होते. तसेच बदलत्या काळात शेतकऱ्यांनी आधुनिकतेकडे वळून भातशेती नांगरणीसाठी पॉवर टिलर कर्ज काढून खरेदी केले आहेत. विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांमधून कर्ज काढून घेतलेले खत व पॉवर टिलर यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत.

आंबा पीक समाधानकारक येण्याची अपेक्षादेवगड तालुक्यात भातशेती करणारेच बहुतांश शेतकरी हे आंबा बागायतदार आहेत. भातशेती व आंबापीक धोक्यात आल्यास येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे. आंबा तसेच मत्स्य व्यवसायावर येथील अनेक कुटुंबे अवलंबून आहेत. तसेच उदरनिर्वाहासाठी भातशेतीही केली जाते. यावर्षी भातशेतीचे नुकसान झाले तरी आंबा व मत्स्यपीक समाधानकारक व्हावे अशी आशा येथील शेतकºयांनी व्यक्त केली आहे.नाचणी शेतीही धोक्यातपुढील काही दिवसांत पाऊस पडला नाही तर मळेशेती व पानथळ जमिनीतील भातशेतीही पावसाअभावी वाया जाऊ शकते, असा अंदाज शेतकऱ्यांनी वर्तविला आहे. देवगड तालुक्यात काही प्रमाणात नाचणी शेतीही केली जाते. नाचणी शेतीला आॅक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत किमान तुरळक प्रमाणात पावसाची गरज असते. मात्र यावर्षी अचानक पावसाने दडी मारल्याने भातशेतीबरोबर नाचणी शेतीही वाया जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.नुकसान भरपाईची मागणीविशेष करून तालुक्यात पुरळ, गिर्ये, वाघोटण, मुटाट, मणचे, पेंढरी, बापर्डे, नाडण, फणसगाव, तिर्लोट व पडेल या गावांमध्ये नाचणी शेती जास्त प्रमाणात केली जात आहे. सुमारे पाच हजार हेक्टरवरती तालुक्यात भातशेती केली जात आहे. तर दीड ते दोन हजार हेक्टरवरती नाचणी शेती केली जाते.

पावसाअभावी भात व नाचणी शेतीचे नुकसान झाल्याने कृषी विभाग किंवा महसूल विभागाकडून पंचनामे करण्यात यावेत, तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणीही शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018sindhudurgसिंधुदुर्ग