शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
2
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
3
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
4
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
5
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
6
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
7
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
8
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
9
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
10
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
11
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
12
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
13
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
14
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
15
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
16
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
17
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
18
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
19
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
20
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
Daily Top 2Weekly Top 5

अस्तित्व टिकवीण्यासाठी विरोधकांचा कृषी कायद्याला विरोध  : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 10:41 IST

Bjp chandrakant patil Sindhudurg Rally- देशातील भाजपा विरोधकांना आपल्या अस्तित्वाची चिंता आहे. नरेंद्र मोदींच्या करिष्म्यापुढे २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत आपल्या किती जागा निवडून येतील याची खात्री आता काँग्रेससह सर्वच विरोधकांना राहिलेली नाही.त्यामुळे ते शेतकर्‍यांची ढाल करून कृषि विधेयकाला विरोध करत आहेत. देशातील मूठभर शेतकऱ्यांना घेऊन दलालांच्या मदतीने मोदी विरोधक आंदोलन करत आहेत . अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

ठळक मुद्देअस्तित्व टिकवीण्यासाठी विरोधकांचा कृषी कायद्याला विरोध  : चंद्रकांत पाटील मूठभर शेतकऱ्यांना घेऊन दलालांच्या मदतीने मोदी विरोधक आंदोलन

कणकवली : देशातील भाजपा विरोधकांना आपल्या अस्तित्वाची चिंता आहे. नरेंद्र मोदींच्या करिष्म्यापुढे २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत आपल्या किती जागा निवडून येतील याची खात्री आता काँग्रेससह सर्वच विरोधकांना राहिलेली नाही.त्यामुळे ते शेतकर्‍यांची ढाल करून कृषि विधेयकाला विरोध करत आहेत. देशातील मूठभर शेतकऱ्यांना घेऊन दलालांच्या मदतीने मोदी विरोधक आंदोलन करत आहेत . अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.कणकवली येथे केंद्र शासनाच्या कृषि विधेयकाच्या समर्थनार्थ भाजपाच्यावतीने गुरुवारी शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. त्यानंतर भाजपा कार्यालयासमोर झालेल्या जाहीर सभेत चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. तसेच कृषि कायद्याचेही समर्थन केले.यावेळी माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, किसान मोर्चाचे अध्यक्ष डॉ.अनिल बोंडे, माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, प्रदेश चिटणीस प्रमोद जठार, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर,जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक,माजी आमदार ऍड. अजित गोगटे, महिला आघाडी अध्यक्षा संध्या तेरसे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, तालुकाध्यक्ष संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री आदी उपस्थित होते.चंद्रकांत पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणलेल्या कृषि कायद्याला शेतकरी नव्हे तर व्यापारी विरोध करत आहेत. व्यापार्‍यांना सगळा कृषि माल बाजार समितीमध्येच आणायचा आहे. जेणे करून दलालांचाच फायदा होईल. रूमालाखाली दर ठरेल आणि शेतकर्‍यांच्या हातात तुटपुंजी रक्कम येईल.विरोधक अफवा पसरत आहेत. कृषि समिती बाहेर माल विकला तर शेतकर्‍यांची फसवणूक होईल असे सांगत आहेत. पण मी पण शेतकर्‍याचा मुलगा आहे. आमची अडीच एकर शेती आहे. आम्हाला वेडे समजू नका. तुम्ही आतमध्ये काटा मारता. आम्ही बाजार समिती बाहेर बसून माल विकू आमचा इलेक्ट्रॉनिक काटा लावू आणि फसवणूक होऊ देणार नाही.शेतकऱ्यांच्या प्रतिसादाची विरोधकांना भीती !मोदी सरकारने वर्षाला शेतकर्‍यांना ६ हजार रूपये मिळण्याची तरतूद केली. तसेच शेतमजूरांना ३ हजार रूपये पेन्शनची व्यवस्था केली. शेतकर्‍यांच्या या प्रेमामुळे २०१४ आणि त्यानंतर २०१९ मध्ये भरभरून साथ मिळाली असून भाजपाचे सर्वात जास्त खासदार निवडून आले आहेत.

शेतकऱ्यांची आणखीन सहानुभूती भाजपाला मिळाली तर त्यापेक्षाही अधिक ताकद २०२४ मध्ये दिसेल.तसेच तीन चतुर्थांश बहुमत संसदेत भाजपाला मिळाले तर गेली अनेक वर्षे अपूर्ण राहिलेले जनतेचे स्वप्न पूर्ण होईल. त्याची भीती विरोधी पक्षाना वाटत आहे. त्यामुळेच काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष मोदींना सतत विरोध करत आहेत.असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाFarmer strikeशेतकरी संपKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग